शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची लावतात विल्हेवाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:45 IST

विळखा प्रदूषणाचा : मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे आहे बंधनकारक

पंकज राऊत  लोकमत न्यूज नेटवर्क बोईसर : तारापूर एमआयडीसीतील बहुसंख्य उद्योगांमधून उत्पादन प्रक्रियेनंतर विविध प्रकारच्या  प्रचंड मोठ्या प्रमाणात घातक कचऱ्याची निर्मिती होत असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार हा कचरा विल्हेवाटीसाठी  तळोजा  येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे बंधनकारक असतानाही तारापूरमध्ये कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावली जात असल्याच्या  अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक औषध, स्टील, बल्क ड्रग्ज  इत्यादी विविध प्रकारचे उत्पादन घेणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या घातक घनकचऱ्यापैकी बहुसंख्य कचरा हा मानवी आरोग्याला आणि पर्यावरणालाही प्रचंड धोका पोहोचविणारा असल्याने सर्व घातक कचरा हा केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विल्हेवाट नियमानुसार काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. मात्र काही उद्योजक उत्पादन खर्च व विल्हेवाटीसाठी येणारा खर्च वाचविण्यासाठी वारंवार चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत असूनही त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण  मंडळाला अजूनही  फारसे यश न आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या  वाहनांमधूनच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक  कचरा विल्हेवाटीसाठी तळोजा येथे नेणे बंधनकारक आहे, परंतु काही उद्योगांमधून घातक कचरा औद्योगिक क्षेत्रातील किंवा परिसरातील गावांतील निर्जन किंवा सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे प्लास्टिक गोणींत भरून किंवा सुटा टाकला जातो, तर काही उद्योगांमध्येच  साठवणूक करून संधी मिळताच अशा पद्धतीने बेजबाबदारपणे विल्हेवाट लावून मानवी आरोग्याशी  अक्षरशः खेळ खेळला जात आहे.मागील चार-पाच दशकांमध्ये अनधिकृतपणे घातक घनकचऱ्याच्या विल्हेवाटीच्या अनेक घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापूर १ व २ च्या विभागाचे अधिकारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर किंवा माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट देतात. त्या घातक घनकचऱ्याचा पंचनामा करून नमुना  प्रयोगशाळेत तपासणीकरिता  पाठवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुठल्या  उद्योगाचा कचरा असावा, यासंदर्भात  चौकशीचे कागदी घोडे नाचविले जातात. मात्र हे भयंकर कृत्य करणारे फारसे पारदर्शकपणे समोर न आल्याने ते मोकाटच राहत आहेत. कारवाई होत नसल्याने आणि कायद्याची भीती न राहिल्याने वारंवार कायदे धाब्यावर बसविले जात आहेत.वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घातक कचऱ्याची वाहतूक घातक कचरा नियमानुसार व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाली पाहिजे, असे काही वर्षांपूर्वी सांगितले होते.त्यामुळे अतिशय सक्षमपणे व  परिणामकारक पद्धतीने घातक कचऱ्यासारखा गंभीर प्रश्न हाताळणे गरजेचे आहे, परंतु दोषींविरुद्ध सक्त व कठोर कारवाईअभावी  प्रति वर्ष हजारो टन निर्मित होणाऱ्या घातक कचऱ्यापैकी काही कचऱ्याची अवैद्य मार्गे विल्हेवाट लावली जात आहे,  हे अनेक घटनांवरून समोर आले आहे.  

सुरक्षितपणे विल्हेवाट लागणे गरजेचे nऔषध प्रक्रिया व उत्पादनापासून तयार झालेली गुणवत्तारहित औषधे ही घातक कचरा प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळे अशा प्रकारचा सर्व कचरा शास्त्रीय प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावण्यासाठी, घातक कचरा प्रक्रिया केल्या जाणाऱ्या सामायिक सुविधांमध्ये पाठवणे, तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवैधपणे टाकलेल्या घातक कचऱ्याचे सर्वोच्च न्यायालय समितीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कठोर पावले खंबीरपणे उचलून अंमलबजावणीही केली गेली पाहिजे. 

घातक कचऱ्यातील प्रदूषक  घटक, अपघात प्रतिबंधक तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम मर्यादित ठेवून पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे. अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात घातक कचरा साठवणे किंवा विल्हेवाट करणे हे म.प्र.नि. मंडळाच्या घातक कचरा नियमाचे ज्या उद्योगाकडून उल्लंघन केले जाईल, अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात दंड व दीर्घ काळ उत्पादन बंद यासारखी करवाई केली गेली तरच असे गैरकृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.