शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

जातप्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुश्की; आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:34 IST

शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे.

बोर्डी : शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा विनाकारण भोगावी लागत असून आर्थिक भुर्दंडासह शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शासना तर्फे जातीचे प्रमाणपत्र देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानेही जात जशी आहे तशी ती वाचण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. याकरिता शासनाच्या जात यादीत उल्लेख असल्या प्रमाणेच जातीचा उल्लेख करून जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. मात्र ही प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे, की बºयाच प्रकरणातील जात प्रमाणपत्रे ही मूळ जात व कंसात पोटजाती दर्शविण्यात आल्या आहेत. तसेच ज्या जाती पोटजाती किंवा तत्सम जातीमध्ये दर्शविलेल्या आहेत. अशा स्वतंत्र जातीचा उल्लेख मूळ जातीच्या सोबत कंसामध्ये केलेला आढळला आहे. त्याचा फटका कुटुंबिय तसेच नातेवाईकांकरिता जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलेल्या बोर्डी येथील राकेश सावे यांना बसला आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी काढलेल्या जात प्रमाणपत्रावर माळी (पाचकळशी) १२८ असा उल्लेख आहे. मात्र जात यादीत क्रमांक १२८ मध्ये माळी (वाडवळ), माळी (पाचकळशी), माळी (चौकळशी) असा उल्लेख नसून माळी नंतर स्वल्पविराम व पुढे तत्सम जाती व पोटजाती म्हणून पाचकळशी, चौकळशी, वाडवळ अशा स्वतंत्र नोंदी आहेत. त्यामुळे अर्जदाराने माळी या जातीचे जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल व त्यांचे माळी जातीचे पुरावे असल्यास माळी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येईल. किंवा पुरावे पाचकळशी, चौकळशी, वाडवळ असे असल्यास तसे प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वारसदारांकरिता जात प्रमाणपत्र काढतांना आजोबा, वडील, काका यांचे वरील उल्लेख केलेले प्रमाणपत्र जोडता येणार नसून पूर्वीची जात प्रमाणपत्र बदलावी लागतील असे सांगण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रमाणपत्राकरिता सोबत कागदपत्र जोडावी लागतात त्यामध्ये शाळा सोडल्याच्या दाखल्याचा समावेश आहे. हा दाखला प्राथमिक शाळेतील नोंदीनुसार देण्यात येत असून त्यामध्ये माळी (पाचकळशी) असा उल्लेख आहे. मात्र दस्ताऐवजा मध्ये खाडाखोड करता येत नाही. दरम्यान अन्य जातीतील उमेदवारांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती महाईसेवा केंद्र चालकाने लोकमतशी बोलताना दिली.कुटुंबिय व नातेवाईकांकरीता जात प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलो असता माळी (पाचकळशी) १८२ असा जात प्रमाणपत्रात उल्लेख असल्याने, हे प्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुष्की असंख्य जातबांधवांवर येणार आहे. या नव्या प्रक्रि येकरिता महसूल विभागाने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे.- राकेश सावे, ग्रामस्थ, बोर्डी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार