शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

जातप्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुश्की; आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:34 IST

शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे.

बोर्डी : शासनाच्या जात यादीत एखाद्या जातीसमोर कंसातील पोटजातीचा जात प्रमाणपत्रात उल्लेख करायचा नाही असा नियम असताना, त्या जातीचं प्रमाणपत्रं दिल्याने उमेदवारांना पुन्हा नव्याने जातीचा दाखला काढण्याची वेळ ओढवली आहे. दरम्यान महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा विनाकारण भोगावी लागत असून आर्थिक भुर्दंडासह शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.शासना तर्फे जातीचे प्रमाणपत्र देण्यात येते. सर्वोच्च न्यायालयानेही जात जशी आहे तशी ती वाचण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. याकरिता शासनाच्या जात यादीत उल्लेख असल्या प्रमाणेच जातीचा उल्लेख करून जात प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. मात्र ही प्रमाणपत्र पडताळणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे, की बºयाच प्रकरणातील जात प्रमाणपत्रे ही मूळ जात व कंसात पोटजाती दर्शविण्यात आल्या आहेत. तसेच ज्या जाती पोटजाती किंवा तत्सम जातीमध्ये दर्शविलेल्या आहेत. अशा स्वतंत्र जातीचा उल्लेख मूळ जातीच्या सोबत कंसामध्ये केलेला आढळला आहे. त्याचा फटका कुटुंबिय तसेच नातेवाईकांकरिता जात प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलेल्या बोर्डी येथील राकेश सावे यांना बसला आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वी काढलेल्या जात प्रमाणपत्रावर माळी (पाचकळशी) १२८ असा उल्लेख आहे. मात्र जात यादीत क्रमांक १२८ मध्ये माळी (वाडवळ), माळी (पाचकळशी), माळी (चौकळशी) असा उल्लेख नसून माळी नंतर स्वल्पविराम व पुढे तत्सम जाती व पोटजाती म्हणून पाचकळशी, चौकळशी, वाडवळ अशा स्वतंत्र नोंदी आहेत. त्यामुळे अर्जदाराने माळी या जातीचे जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल व त्यांचे माळी जातीचे पुरावे असल्यास माळी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येईल. किंवा पुरावे पाचकळशी, चौकळशी, वाडवळ असे असल्यास तसे प्रमाणपत्र देण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे वारसदारांकरिता जात प्रमाणपत्र काढतांना आजोबा, वडील, काका यांचे वरील उल्लेख केलेले प्रमाणपत्र जोडता येणार नसून पूर्वीची जात प्रमाणपत्र बदलावी लागतील असे सांगण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रमाणपत्राकरिता सोबत कागदपत्र जोडावी लागतात त्यामध्ये शाळा सोडल्याच्या दाखल्याचा समावेश आहे. हा दाखला प्राथमिक शाळेतील नोंदीनुसार देण्यात येत असून त्यामध्ये माळी (पाचकळशी) असा उल्लेख आहे. मात्र दस्ताऐवजा मध्ये खाडाखोड करता येत नाही. दरम्यान अन्य जातीतील उमेदवारांनाही या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याची माहिती महाईसेवा केंद्र चालकाने लोकमतशी बोलताना दिली.कुटुंबिय व नातेवाईकांकरीता जात प्रमाणपत्र काढण्याकरिता गेलो असता माळी (पाचकळशी) १८२ असा जात प्रमाणपत्रात उल्लेख असल्याने, हे प्रमाणपत्र नव्याने काढण्याची नामुष्की असंख्य जातबांधवांवर येणार आहे. या नव्या प्रक्रि येकरिता महसूल विभागाने दाखले वाटप शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे.- राकेश सावे, ग्रामस्थ, बोर्डी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार