शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आदिवासीपाड्यांचा विकास हरवलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:27 PM

डहाणूतील आदिवासींचा मूलभूत गरजांसाठी संघर्ष : महामार्गाच्या थापा मारून लाटल्या जमिनी; शासनाच्या योजना फक्त कागदावरच

- शौकत शेख

डहाणू : डहाणूमधील दापचरी घोरखणपाडा, गड चींचले, दाभाडी, रायपुर, नागझरी, धनीवरी, सायवन, केंजविरा, आंबोली, शीसणे, हळद पाडा, खुबाले, ओसरविरा, एना , दभोन या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांत विकासाची गंगा अद्याप न पोहोचल्याने वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा प्राथमिक गरजांसाठी त्यांचा संघर्ष आजही सुरु आहे.

जुन्या मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या पूर्वेकडे डहाणूपासून सुमारे १५ किमी अंतरावर हे आदिवासी पाडे आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने या मार्गाचा अवलंब करु नय असा सल्ला वाहनधारकांना ग्रामस्थ देतात. महामार्ग आल्यास रोजगार उपलब्ध होईल, असा खोटा आशावाद दाखवून हातावर पोट असलेल्या आदिवासींच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, रोजगार तर दूरच पाणी, वीज, रस्ते अशा मुलभूत प्रश्नांची सोडवणूक होवू न शकल्याने वाडीवरल्या वाटांवर राहणाºया आदिवासींना विकास काय असतो रे बुवा, हेच उमगले नसल्याचे जाणवत आहे.

डहाणू तालुक्यात ५ आक्टोंबर रोजी झालेल्या वादळात तब्बल ५२९ कुटुंबीयांच्या घरांचे नुकसान झाले होते. यामध्ये धरमपुर, शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील आदिवासी कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये बहुतांश कुटुंब अद्याप मदतीपासून वंचित आहेत.

त्याच प्रमाणे डहाणू तालुक्यातील पावन, तवा, धरंपुर येथील जि.प. शाळांमध्ये वादळामुळे पत्रे उडून नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही दुरु स्तीसाठी शासनस्तरावर पाठवलेला त्यांचा प्रस्ताव पडून असल्याने शाळा छपराविना झाल्या आहेत. शेनासरी वराठा पाडा ,सायवन ,दह्याले, बुजाडी येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आल्या आहेत. अशा धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.सर्वशिक्षा अभियानाच्या चौकशीची गरजदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी पाड्यामध्ये शिक्षणाची गंगा पोहचून या समाजाचा विकास व्हावा, या हेतूने सरकारकडून जवळपास १७ वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियानाची संकल्पना पुढे आली होती. तिला कृतीत उतरवण्यासाठी सरकारकडून आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, शालोपयोगी वस्तुंसाठी सरकारकडून पुरवण्यात आलेला हा निधी आदिवासींच्या शिक्षणासाठी नक्की खर्च झाला का, असा प्रश्न पडतो.

डहाणू तालुक्यातील ८५ ग्रामपंचायती अंतर्गत असणाºया आदिवासी पाड्यांत नजर फिरवताच शासनाच्या योजना व सर्व शिक्षा अभियान येथे पांगुळगाडीनेच पोहले असेल असे चित्र दिसते. सर्व शिक्षा अभियानानुसार शालेय बांधकाम, शौचालये, पाठ्यपुस्तके इत्यादी गोष्टींवर लक्ष पुरवले जाते.

मात्र तालुक्यातील बहुतांश शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष घालता गळके छप्पर, डागडुज्जीअभावी ढासळत चाललेल्या शाळेच्या भिंती, विजेची सोय नसल्याने शाळांतील खोल्यांत पसरलेला अंधार यामूळे आदिवासींच्या जीवनात शिक्षणाचा दिवा लावून त्यांना पकाश वाटांकडे घेवून जाणाºया या अभियानाचे काय झाले? हा प्रश्न आजही तसाच आहे.डहाणू रेल्वे स्टेशनलगत आदिवासी पाड्यांची आहे. वीज, पाणी, रस्ते अशा काही सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असल्या तरी आरोग्य, शिक्षणाच्या नावाची बोंब येथे सुरु असल्याचे दिसत आहे. हलदपाडा, केनाड, वाकी, झरली, घोळ अशा दुर्गम आदिवासी भागात कुपोषणाबळींचे प्रमाण वाढतच असून रखरखीत उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठीची वणवणही सुरु च असल्याची भीषण परिस्थिती पहायला मिळत आहे.