शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

By admin | Updated: June 15, 2016 00:53 IST

नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला.

विक्रमगड : नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला. या वेळी मराठी पत्रकार संघाची पालघर जिल्ह्याच्या विकासाची भूमिका संघटनेचे पदाधिकारी संजीव जोशी यांनी विषद केली,माझे लक्ष पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यावर राहणार असून,पत्रकाराचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन नव्या पालघर जिल्ह्याला राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सवरा यांनी सागितले.आपल्या सरकारने दीड वर्षाच्या काळात सामान्य नागरिक, शेतकरी,आदिवासी, छोटे व्यवसायीक या सर्वासाठी उत्तम कार्य केले असून केंद्र-आणि राज्य सरकारच्या योजना लोकाभिमुख करण्यावर माझा भर होता. पेसा कायद्या अंतर्गत अनुसूचित क्षेत्रासाठी पाच टक्के निधी देऊन ग्रामीण विकासाला गती देण्यात आली आहे. विकास कामात आचारसंहिता आड येत गेल्याने काम दिसत नाही.त्यात नामांकित शाळांमध्ये २५ हजार विद्यारर्थ्यांना मोफत प्रवेश,जात-पडताळणी आॅनलाइन, कुपोषण निर्मूलनासाठी अमृत आहार योजना,आदिवासी कला-परंपरा साठी आदिवासी हाट योजना, एकलव्य क्रीडा योजना, आदर्श ग्राम योजना, शासकीय आश्रम शाळा बांधकाम विभागासाठी स्वतंत्र कक्ष, विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी ४४० हेक्टर जागा आधिग्रहित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील परिवहनासाठी रस्त्याचे जाळे, अनेक पुलांची निर्मिती, उधोग क्षेत्रासाठी ५२ कोटी रु. मंजूर,जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी अधिक कार्य अशी त्यांनी कामांची जंत्री सादर केली.मी वसुरी हे गाव दत्तक घेतले असून या बाबतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी पत्रकार संघाकडून एक गाव दत्तक घेण्यात येणार आहे, आश्रमशाळासाठी स्वतंत्र बांधकाम विभागाची स्थापना केली आहे. सध्या पालघर जिल्यात ५५ कार्यालये नाहीत, पॅटर्न तयार आहे.त्या साठी लवकरात लवकर कर्मचारी भरती होणार आहे, बोईसर येथे २६ एकारात क्रीडा प्रबोधिनी साकारणार आहोत. पालघर जिल्ह्याकडे जाणारे रस्ते चौपदरी करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)कोणती कामे मंजूर, त्यासाठी निधी किती?- पालघर जिल्ह्यासाठी २०१५ -१६ अर्थसंकल्पीय ३८२ कामांसाठी ९७ कोटी मंजूर. ६९९ मंजूर कामासाठी १५६ कोटीच्या वर निधी प्राप्त.- २०१६-१७ मध्ये आदिवासी विकास विभागासाठी ४०८ कामे मंजूर त्या साठी ११५ कोटी निधी प्राप्त, ३४८ कामे मंजूर त्यासाठी ३८ कोटी निधी प्राप्त. - ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत ८५५ कामे मंजूर त्यासाठी ८६ कोटीचा निधी प्राप्त, सा.बां कामासाठी ११२ कामे मंजूर, ५१३ कोटी निधी प्राप्त पालघर जिल्ह्यासाठी एकूण २४२२ कामे मंजूर त्याकरीता ९११ कोटी ९ लाखाचा निधी प्राप्त झाल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आदीवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सागितले.