शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

विक्रमगडचे आदिवासी आधारकार्डापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:41 IST

आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत.

- राहुल वाडेकरविक्रमगड : आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. परंतु अदयाप अनेक आधारकार्डा पासून वंचित आहेत व आता शासनाने सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य केल्याने आता सगळेच झोपेतून जागी झाले आहेत. मात्र काही काळापासून येथील आधारकार्ड केंद्र बंद करण्यात आल्याने ते पुन्हा सुरू करण्याची मागणी होते आहे़प्रत्येक नागरिकाला आपली स्वत:ची सपूर्ण ओळख सांगणारा आधार हा बारा आकडी क्रमांक (यु़ आय़ डी़) मिळत असून तालुक्यात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रानुसार हा कार्यक्रम राबविला गेला आहे सुरुवातीला लोकांना यांची माहिती महत्व माहिती नसल्याने ज्यावेळेस ही केंद्र गावोगाव चालू झाली तेंव्हा त्याकडे दुलक्ष केले होते,परंतु जसे जसे या कार्डचे महत्व उमगू लागले तसे तसे लोक रोज दिवस केंद्रावर गर्दी करु लागले, मात्र त्यावेळेस ही केंद्र बंद झाली आणि तालुका पातळीवर फक्त सुरु राहीली आतापर्यत तालुक्यातील नव्हे तालुक्या बाहेरील लोक देखील विक्रमगडच्या आधारकेंद्रात कार्ड काढण्याकरीता येत आहेत मात्र सद्यस्थितीत हे तालुक्यात चालूु असलेले एकमेव केंद्र बंद झाले असल्याने येथील जनता आधारकार्डापासून वंचित आहे़हा आधार नंबर देण्यामागे शासनाचा उद्देश फार मोठा असून या माध्यमातून शासकीय सेवा सुविधांचा लाभ तळागाळापर्यत पोहोचावा, हा आहे. ़ स्थावर मालमत्ता,खरेदी-विक्री करतांनाही या नंबरचा उपयोग होणार आहे़ या योजनेचे अंतर्गत पहिला , दुसरा व तिसरा टप्पा घेण्यांत आला परंतु त्यामध्ये अनेकांना याची योग्य माहिती नसल्याने त्यांनी या दोन टप्प्यात खास करुन ग्रामीण भागांमध्ये अल्प प्रतिसाद दिला व अनेकजण या आधारकार्डापासून वंचित राहीलेले आहेत़ त्यामुळे शासनाने वंचित राहीलेल्या लोकांसाठी केंद्र पुन्हा सुरु केले होते़ व आता लोकांना आधार कार्डचे महत्व समजलेले आहे़ व त्यासाठी लोक गर्दी करु लागलेले आहे़त्यानुसार प्रत्येक नागरिकांला हा क्रमांक दिला जाणार आहे़ हा क्रमांक घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान रेशनकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, ग्रामपंचायत ओळखपत्र (दाखला) आदी प्रकारातील एखादे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे़ या नंबरकरीता माहिती घेतांना नागरिकांचा फोटो, त्यांच्या बुबुळांच्या प्रतिमा, व दोन्ही हातांच्या दहाही बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत़ यामुळे हा नंबर असलेला नागरिक देशातील कोणत्याही राज्यात गेल्यास त्याची ओळख सिध्द करता येईल. एकाच व्यक्तींना दोन राज्यांत आधार क्रमांक घेता येणार नाही़ ज्यांनी पहिल्या दोन टप्प्यांमध्ये आधार कार्ड घेतले आहे त्यांना पुन्हा आधार कार्डसाठी जाण्याची गरज नाही़ व ज्यांचेकडे आधार नोंदणी पावती असेल त्यांनी ते केंद्रावर दाखवून ती सलग्न करुन घेता येणार आहे़ असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर बंद पडलेली आधारकार्ड केंद्रे तातडीने पुन्हा सुरू करण्याची गरज जाणवते आहे.शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे पगार,बँकेमध्ये खाते उघडणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृृत्तीची रक्कम जमा होणे,जेष्ठ नागरिकांच्या पेन्शन योजना, शासकीय निराधार योजना, शासनाच्या सबसिडी योजना आदीकामी आधारकार्डची आवश्यकता आहे़ त्यामुळे सध्या बंद असलेले विक्रमगड तालुक्यासाठीचे आधार केंद्रे सुरु करावे़-निलेश भगवान सांबरे, सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगडसर्वच कामा करीता आता आधारकार्ड लिंक केले जात आहेत. परंतु पूर्वी ज्यांनी आधारकार्ड घेतलेले आहे़ त्यावर अनेकांच्या जन्म तारखा या अर्धवट असल्याने व अनेकांचे हातांच्या बोटांचे अंगठे(ठसे) आॅनलाईनला लिंक होत नसल्याने अडचणी उद्भवत आहेत़ याकरीता त्यांना आता नविन आधारकार्ड काढण्याशिवाय पर्याय नसल्याने विक्रमगडला पुन्हा आधारकार्ड केंद्र सुरु करावे़-अमोल सांबरे, सुशिक्षित बेरोजगार

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड