शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:17 IST

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत ...

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षतेचा भार रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर असतो. असे असतानाही मागील २० वर्षापासून हे पोलीस कर्मचारी मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकातच रेल्वे पोलिसांसाठी अधिकृत पोलीस चौक्या आहेत. बाकी इतर स्थानकांत चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात. रेल्वे स्थानकांत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करीत आपली कर्तव्ये बजावावी लागत आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात मागील २० वर्षात एकही साधी पोलीस चौकी बांधण्यात आलेली नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत. शासकीय सेवेत असल्याने त्यांना तक्रारी करण्याची मुभा नाही. यामुळे मुग गिळून गप्प बसून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाºयांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन कोणतीही तसदी घेताना दिसत नाही.वसई रेल्वे पोलिसांच्या अधिपत्याखाली मीरा रोड ते वैतरणा अशी ७ रेल्वे स्थानके येतात. यात मीरा रोड, वसई, भाईंदर, नालासोपारा आणि विरार ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांना सतत पाळत ठेवावी लागत आहे. यासाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी काम पाहत आहेत. यात ३४ महिला कर्मचारी आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहेत. बाकी इतर स्थानकात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांचे शौचालये वापरावी लागतात. त्यातही त्यांना रांगेत उभे राहावे लागते. याहून दयनीय अवस्था महिला कर्मचाºयांची आहे. त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाहीत, शौचालये नाहीत, पिण्याचे पाणी नाही. शौचालये नसल्याने आम्ही दिवसभर पाणीच पीत नसल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर एका पोलिसाने सांगितले.रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचाºयांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेºया माराव्या लागतात. अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशा वेळी चौकी नसल्याने रेल्वे स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आम्ही रेल्वेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणतीही दखल रेल्वेने घेतलेली नाही. लवकरच याबाबत चर्चा होऊन यावर काही तोडगा निघणे गरजेचे आहे.- यशवंत निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वेदुसºयाची सुरक्षा करणाºया पोलिसांसाठी शौचालय किंवा चेंजिंग रूम तसेच कामानिमित्त आॅफिस नसल्याने लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस बलासाठी त्वरित स्वतंत्र कार्यालय देणे गरजेचे आहे.- होशियार सिंह ऊर्फ राज दसोनी, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस