शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:17 IST

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत ...

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षतेचा भार रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर असतो. असे असतानाही मागील २० वर्षापासून हे पोलीस कर्मचारी मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकातच रेल्वे पोलिसांसाठी अधिकृत पोलीस चौक्या आहेत. बाकी इतर स्थानकांत चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात. रेल्वे स्थानकांत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करीत आपली कर्तव्ये बजावावी लागत आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात मागील २० वर्षात एकही साधी पोलीस चौकी बांधण्यात आलेली नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत. शासकीय सेवेत असल्याने त्यांना तक्रारी करण्याची मुभा नाही. यामुळे मुग गिळून गप्प बसून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाºयांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन कोणतीही तसदी घेताना दिसत नाही.वसई रेल्वे पोलिसांच्या अधिपत्याखाली मीरा रोड ते वैतरणा अशी ७ रेल्वे स्थानके येतात. यात मीरा रोड, वसई, भाईंदर, नालासोपारा आणि विरार ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांना सतत पाळत ठेवावी लागत आहे. यासाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी काम पाहत आहेत. यात ३४ महिला कर्मचारी आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहेत. बाकी इतर स्थानकात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांचे शौचालये वापरावी लागतात. त्यातही त्यांना रांगेत उभे राहावे लागते. याहून दयनीय अवस्था महिला कर्मचाºयांची आहे. त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाहीत, शौचालये नाहीत, पिण्याचे पाणी नाही. शौचालये नसल्याने आम्ही दिवसभर पाणीच पीत नसल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर एका पोलिसाने सांगितले.रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचाºयांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेºया माराव्या लागतात. अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशा वेळी चौकी नसल्याने रेल्वे स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आम्ही रेल्वेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणतीही दखल रेल्वेने घेतलेली नाही. लवकरच याबाबत चर्चा होऊन यावर काही तोडगा निघणे गरजेचे आहे.- यशवंत निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वेदुसºयाची सुरक्षा करणाºया पोलिसांसाठी शौचालय किंवा चेंजिंग रूम तसेच कामानिमित्त आॅफिस नसल्याने लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस बलासाठी त्वरित स्वतंत्र कार्यालय देणे गरजेचे आहे.- होशियार सिंह ऊर्फ राज दसोनी, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस