शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
4
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
5
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
6
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
9
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
10
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
11
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
12
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
13
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
14
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
15
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
16
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
17
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
18
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
19
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
20
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'

पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 00:17 IST

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत ...

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षतेचा भार रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर असतो. असे असतानाही मागील २० वर्षापासून हे पोलीस कर्मचारी मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकातच रेल्वे पोलिसांसाठी अधिकृत पोलीस चौक्या आहेत. बाकी इतर स्थानकांत चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात. रेल्वे स्थानकांत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करीत आपली कर्तव्ये बजावावी लागत आहेत.पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात मागील २० वर्षात एकही साधी पोलीस चौकी बांधण्यात आलेली नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत. शासकीय सेवेत असल्याने त्यांना तक्रारी करण्याची मुभा नाही. यामुळे मुग गिळून गप्प बसून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाºयांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन कोणतीही तसदी घेताना दिसत नाही.वसई रेल्वे पोलिसांच्या अधिपत्याखाली मीरा रोड ते वैतरणा अशी ७ रेल्वे स्थानके येतात. यात मीरा रोड, वसई, भाईंदर, नालासोपारा आणि विरार ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांना सतत पाळत ठेवावी लागत आहे. यासाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी काम पाहत आहेत. यात ३४ महिला कर्मचारी आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहेत. बाकी इतर स्थानकात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांचे शौचालये वापरावी लागतात. त्यातही त्यांना रांगेत उभे राहावे लागते. याहून दयनीय अवस्था महिला कर्मचाºयांची आहे. त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाहीत, शौचालये नाहीत, पिण्याचे पाणी नाही. शौचालये नसल्याने आम्ही दिवसभर पाणीच पीत नसल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर एका पोलिसाने सांगितले.रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचाºयांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेºया माराव्या लागतात. अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशा वेळी चौकी नसल्याने रेल्वे स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आम्ही रेल्वेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणतीही दखल रेल्वेने घेतलेली नाही. लवकरच याबाबत चर्चा होऊन यावर काही तोडगा निघणे गरजेचे आहे.- यशवंत निकम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वेदुसºयाची सुरक्षा करणाºया पोलिसांसाठी शौचालय किंवा चेंजिंग रूम तसेच कामानिमित्त आॅफिस नसल्याने लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस बलासाठी त्वरित स्वतंत्र कार्यालय देणे गरजेचे आहे.- होशियार सिंह ऊर्फ राज दसोनी, सामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस