शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ऐन मार्चमध्ये वसई-विरारला वाढली पाणी टँकरची मागणी! दरातही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:48 PM

बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा

प्रतीक ठाकूरविरार : मार्च महिना अर्धा संपत नाही तोच वसई-विरारच्या शहरी भागांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. परिणामी टँकरने पाणी विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने टँकरची मागणी आणि त्याच्या दरातही वाढ झाली आहे.

वसई-विरार शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो; परंतु काही ठिकाणच्या भागात पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी अपुऱ्या प्रमाणात येत आहे, तर काही भागांत अजूनही पाणी उपलब्ध झालेले नाही. येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी टँकरची मागणी वाढत आहे.

वसई-विरार शहरात एक हजारांहून अधिक टँकर आहेत. हे टँकर विरार पूर्व-पश्चिम, नालासोपारा पूर्व, वसई पूर्व, नायगाव यासह विविध ठिकाणच्या भागात पाणीपुरवठा करतात. जेथे एका टँकरची गरज होती त्या ठिकाणी दोन टँकर मागवावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जे टँकर १ हजार २०० रुपयांना मिळत होते; तेच टँकर आता १५०० ते १७०० रुपयाने विकले जाऊ लागले आहेत. काही ठिकाणी दोन हजारांहून अधिक रक्कम त्यासाठी मोजावी लागत आहे. जेथे पाणी उपसा होतो; अशा ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल यांची भूजल पातळी खालावली आहे. आधीच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने जे पाणी विक्री करतात; तेथे पाण्याचे दर वाढतात. त्यामुळे टँकरचे दरही वाढले असल्याचे टँकरमालकांनी सांगितले.

ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करा !महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मधील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई (सातिवली) या परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गिदराईपाडा येथील ग्रामस्थांनी नळकनेक्शनसाठी पैसे भरूनही नळकनेक्शन दिले जात नाही. कामण दलित वस्ती योजना एक वर्षापासून बंद आहे. येथील लघुपाटबंधारे (ग्रामपंचायत काळातील) पाणीपुरवठा योजना बंद आहे. कामण, चिंचोटी, देवदळ येथे दोन महिन्यांपासून रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. परंतु पाणीपुरवठा केला जात नाही. पालिकेने येथील पाणीप्रश्न मार्गी लावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी पालिकेला दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी