शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानासहित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 18:03 IST

तेरावे घालून शेकडो आदिवासींच्या सहभागाने मंगळवारी सकाळी वसई तहसीलदार कार्यालयाच्या आवारात अभिनव आंदोलन केले.

खावटी अनुदान वाटप व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपात होत असलेल्या दिरंगाईबाबत पालघर जिल्ह्यातील श्रमजीवी संघटनेने आदिवासी विकास विभागाचे अक्षरशः तेरावे घालून शेकडो आदिवासींच्या सहभागाने मंगळवारी सकाळी वसई तहसीलदार कार्यालयाच्या आवारात अभिनव आंदोलन केले.

या प्रसंगी वसई तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर श्रमजीवी संघटना व त्यांच्या शेकडो आदिवासी बंधू-भगिनी व पदाधिकाऱ्यांनी वसई तहसील अगदी दुमदुमून सोडले, या ठिकाणी वंचित लाभार्थी आदिवासी बांधवांनी अक्षरशः सरकारच्या आदिवासी विकास विभागाचे तेरावे करून सरकारला जेरीस आणले. यासंदर्भात यापूर्वीच श्रमजीवी संघटना- महाराष्ट्र यांच्यातर्फे के. सी. पाडवी, मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना निवेदन देण्यात आले होते, मंगळवारी दुपारी यासंदर्भात श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला पुन्हा एकदा आठवण म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार उमाजी हेळकर यांनी एक निवेदन सादर केलं.

दरम्यान कोविड-19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आदिवासींना आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी सरकारने त्यावेळी आदिवासी विकास विभागाने उशिरा का होईना 9 सप्टेंबर,2020 रोजी शासन निर्णय काढून खावटी कर्ज न देता अनुदान योजना जाहीर केली होती, परिणामी यापूर्वी 24 मार्च 2020पासूनच्या लॉकडाऊन व त्यानंतरच्या अनलॉकच्या संपूर्ण 4 ही काळात आजतागायत आदिवासी विकास विभागाने राज्यात उपासमार असलेल्या आदिवासींसाठी कुठलाही खर्च न करता त्यांना जगविण्याबाबत अत्यंत उदासीनता दाखविली. 

तर आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या भुकेकडे व शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, सद्यातरी हा विभाग मृतावस्थेत गेला असल्याचे श्रमजीवीने म्हटले. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी व या उदासीन भूमिकेचा जाहीर व तीव्र निषेध व्यक्त करीत वसई तहसीलदार व इतरत्र जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाच्या आवारात श्रमजीवीने हे आंदोलन करीत सरकारचे मंगळवारी तेरावे पार पाडले.

एकूणच या आंदोलनाविषयी बोलताना आमच्या मागण्यांची पूर्तता तात्काळ करावी अन्यथा आदिवासींचं मोठं आंदोलन उभं राहील, असे ही श्रमजीवी संघटनेचे  कार्याध्यक्ष केज्शव नानकर यांनी लोकमतला सांगितले. शेवटी सरकारला निवेदन देताना वसई तहसीलदार उज्वला भगत अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार उमाजी हेळक लर यांनी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी तालुकाध्यक्ष आत्माराम ठाकरे, जि. सरचिटणीस- गणेश उंबरसाडा, माजी जिल्हाध्यक्षा विमल परेड आदी शेकडो आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. "श्रमजीवी संघटनेचे आंदोलन याठिकाणी संपन्न झाले सरकारचे निवेदन स्वीकारून संघटनेस विश्वास दिला आहे की, लवकरच वसई तालुक्यातील लाभार्थी म्हणून आदिवासी बांधवांच्या खावटी अनुदान प्रक्रियेसाठी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली जाईल व  तसे आदेश होण्यासाठी वसई तहसीलदार यांच्याकडे डहाणू - जव्हार एकात्मिक योजनेसाठी पत्र निघेल.

- उमाजी हेळकरनायब तहसीलदार, वसई