शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

मुदतीआधी दुरूस्ती, पूल खुला, वरसावे ब्रीज ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 03:37 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नाताळ व थर्टी फर्स्टच्या आधीच तो खुला झाल्याने पोलीस, नागरिक व परिसरातील हॉटेलचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. प्राधिकरण व आयआरबीने मुदतीआधीच पुलाच्या दुरु स्तीचे काम पूर्ण केले आहे.मुंबई-ठाण्याच्या दिशेने वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन पुलाच्या चार जॉइंट प्लेट्स नादुरु स्त झाल्याने त्यांच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह ठाणे जिल्हा प्रशासनाकडे दोन वर्शांपासून पाठपुरावा सुरू होता. पुलाची दुरु स्ती महत्त्वाची असली तरी, या पुलावरून रोज हजारो वाहनांची वाहतूक होत असल्याने प्रशासनानेसुद्धा चालढकल चालवली होती. महामार्ग प्राधिकरणाने पुलाची दुरु स्ती अत्यावश्यक असल्याचे सांगून दुर्घटना झाल्यास जबाबदार तुम्ही असाल, असे जिल्हा प्रशासनाला खडसावल्याने अखेर पालघर जिल्हा प्रशासनाने दुरुस्तीची अधिसूचना काढली. २६ नोव्हेंबरपासून एक महिन्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक मनोर, चिंचोटीमार्गे भिवंडीतून वळवण्यात आली. नवीन पुलावरून एका मार्गिकेची वाहतूक हलक्या वाहनांसाठी खुली ठेवण्यात आली. दुसरी मार्गिका खोदून दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले. परंतु मनोर, चिंचोटी व पुलाच्या सुरुवातीला पाच ओव्हरहेड गेंटरी पोस्ट बसवण्याच्या कामात काही दिवस वाया गेले. कधी ओव्हरहेड गेंटरीची उंची, तर कधी ती लांबूनच वाहनचालकास दिसली पाहिजे, अशा कारणांवरून पोलिसांकडून चालढकल करण्यात आली. प्राधिकरणाने पोलिसांच्या आडमुठेपणाला त्रासून दुरुस्तीकाम सुरू केले असता पोलिसांनी ते बंद पाडले.शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी सकाळपासून पुलाच्या दुरुस्तीकामास सुरुवात झाली. नवीन पुलावरून एक मार्गिका लहान वाहनांसाठी खुली असली, तरी दुरुस्तीमुळे वाहने सावकाश चालवावी लागत होती. त्यामुळे वसईच्या दिशेने थेट ससुनवघर, मालजीपाड्यापर्यंत चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या. पुलापर्यंत यायला तीन ते चार तास लागत होते. वरसावेपासून थेट ठाण्यापर्यंत अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होत होती. या दुरुस्तीचा परिणाम भिवंडी आणि ठाण्यातील वाहतुकीवर झाला होता.वसईच्या दिशेने वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने पालघर पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांशी चर्चा करून जुना पूल १० ते १५ मिनिटे मुंबई-ठाण्याहून जाणाºया वाहनांसाठी बंद करून वसईवरून येणारी वाहने सोडून कोंडी कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळाला. दुरु स्तीचे काम २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार होते. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला १२ दिवस विलंब झाल्याने अधिसूचनेच्या कालावधीत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्राधिकरणासमोर होते. परंतु, प्राधिकरणाचे अधिकारी दिनेश अग्रवाल, शशिभूषण यांच्यासह आयआरबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेऊन अवघ्या १५ दिवसांत दुरु स्तीचे काम पूर्ण केले. पुलावरील चार एक्स्पॉन्शन जॉइंट्स प्लेट्स दुरु स्त करण्यात आल्या. पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी सातत्याने खडी-डांबराचा थर टाकण्यात आल्याने रस्ता ओबडधोबड झाला होता. येथील अवास्तव खडी-डांबर खोदून काढून रस्त्याची दुरु स्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरील रस्ता समतल झाला असून आता वाहने सुसाट धावू शकणार आहेत. दुरु स्तीकामामुळे आता येणारी काही वर्शे नवीन पुलावरील वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही, असे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांगितले.सगळ्याच ठिकाणची कोंडी संपणार२५ डिसेंबरचा नाताळ व थर्टी फर्स्टमुळे वाहनांची वाढती संख्या पाहता प्राधिकरणाने दुरु स्तीकाम लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पूल सुरू झाल्याने पोलिसांसह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करणारे डम्पर व पाणीविक्र ीचा व्यवसाय करणारे टँकरमाफिया आहेत. त्यांच्यासह महामार्गावरील बार व लॉजचालकांचेसुद्धा पूल लवकर सुरू झाल्याने उखळ पांढरे होणार आहे. या वाहतूककोंडीचा परिणाम कल्याण, भिवंडी चौफुलीवरील वाहतुकीवर व्हायचा. तिथेही प्रचंड रांगा लागायच्या आता तिथलीही वाहतूककोंडीची समस्या दूर होणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार