शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती नुकसान पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:03 IST

वसईत ६० ते ७५ टक्के नुकसानीचा अंदाज : शेतकरी झाले हवालदिल; डहाणू तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष

पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून सहा. कृषी अधिकारी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसत आहेत. तालुक्यात साधारणपणे ६० ते ७५ टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.

यंदा वसई तालुक्यात साधारण पाच महिने पाऊस पडला असून आजही आभाळ भरलेच आहे. हंगामात ऐन कापणीच्या वेळेलाही पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे लांबलेल्या कापण्यांमुळे शेतातील तयार पिकाच्या वजनदार कणसांवर पडणारे पाणी कणसांना अधिक वजनदार बनवत असल्याने उभी पिके आडवी पडली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान हे भाताला पुन्हा कोंब फुटल्याने, चिखलात दाणे नष्ट झाल्याने, तसेच पाण्यात जास्त वेळ राहून कुजल्याने झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती लागावे म्हणून शेतात ओले सुकलेले ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीत त्याची कापणी करून अंगणात, ओट्यावर, घरात आणले, मात्र रचलेल्या उडव्यांमधील ओलाव्यामुळे भाताच्या भाऱ्यांत प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि दाणे वाफल्यानेही नुकसान झाले आहे. भात नुकसानी बरोबरच झोडणीनंतर मजुरी खर्चाला हातभार लावणारे भात पिकाची पावली काळी पडल्याने त्याला ग्राहक नाही. तसेच पावसाच्या सुरवातीला वापरण्यात येणार गुरांचा चारा म्हणजेच पावली चारा म्हणून ठेवता येणार नसल्याने दोन्ही बाजूंनी शेतकºयांचे नुकसान आहे.भातशेती नुकसानीची पाहणी आम्ही थेट शेतात जाऊन करत असून भात, पेंढा, व पावली असे नुकसान झाले आहे. कापणी लांबल्याने काही भातपीक हाती लागले तरी दळताना कणी किंवा पीठ होण्याची शक्यता असून जेमतेम २० ते २५ टक्के पीक कामी येऊ शकेल. सुरू असलेले पंचनामे आम्ही पुढील कारवाईसाठी लकरात लवकर वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत-अनिल मोरे, के टी संखेकृषी सहाय्यक अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार