शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती नुकसान पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:03 IST

वसईत ६० ते ७५ टक्के नुकसानीचा अंदाज : शेतकरी झाले हवालदिल; डहाणू तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष

पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून सहा. कृषी अधिकारी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसत आहेत. तालुक्यात साधारणपणे ६० ते ७५ टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.

यंदा वसई तालुक्यात साधारण पाच महिने पाऊस पडला असून आजही आभाळ भरलेच आहे. हंगामात ऐन कापणीच्या वेळेलाही पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे लांबलेल्या कापण्यांमुळे शेतातील तयार पिकाच्या वजनदार कणसांवर पडणारे पाणी कणसांना अधिक वजनदार बनवत असल्याने उभी पिके आडवी पडली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान हे भाताला पुन्हा कोंब फुटल्याने, चिखलात दाणे नष्ट झाल्याने, तसेच पाण्यात जास्त वेळ राहून कुजल्याने झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती लागावे म्हणून शेतात ओले सुकलेले ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीत त्याची कापणी करून अंगणात, ओट्यावर, घरात आणले, मात्र रचलेल्या उडव्यांमधील ओलाव्यामुळे भाताच्या भाऱ्यांत प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि दाणे वाफल्यानेही नुकसान झाले आहे. भात नुकसानी बरोबरच झोडणीनंतर मजुरी खर्चाला हातभार लावणारे भात पिकाची पावली काळी पडल्याने त्याला ग्राहक नाही. तसेच पावसाच्या सुरवातीला वापरण्यात येणार गुरांचा चारा म्हणजेच पावली चारा म्हणून ठेवता येणार नसल्याने दोन्ही बाजूंनी शेतकºयांचे नुकसान आहे.भातशेती नुकसानीची पाहणी आम्ही थेट शेतात जाऊन करत असून भात, पेंढा, व पावली असे नुकसान झाले आहे. कापणी लांबल्याने काही भातपीक हाती लागले तरी दळताना कणी किंवा पीठ होण्याची शक्यता असून जेमतेम २० ते २५ टक्के पीक कामी येऊ शकेल. सुरू असलेले पंचनामे आम्ही पुढील कारवाईसाठी लकरात लवकर वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत-अनिल मोरे, के टी संखेकृषी सहाय्यक अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार