शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती नुकसान पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:03 IST

वसईत ६० ते ७५ टक्के नुकसानीचा अंदाज : शेतकरी झाले हवालदिल; डहाणू तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष

पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून सहा. कृषी अधिकारी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसत आहेत. तालुक्यात साधारणपणे ६० ते ७५ टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.

यंदा वसई तालुक्यात साधारण पाच महिने पाऊस पडला असून आजही आभाळ भरलेच आहे. हंगामात ऐन कापणीच्या वेळेलाही पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे लांबलेल्या कापण्यांमुळे शेतातील तयार पिकाच्या वजनदार कणसांवर पडणारे पाणी कणसांना अधिक वजनदार बनवत असल्याने उभी पिके आडवी पडली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान हे भाताला पुन्हा कोंब फुटल्याने, चिखलात दाणे नष्ट झाल्याने, तसेच पाण्यात जास्त वेळ राहून कुजल्याने झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती लागावे म्हणून शेतात ओले सुकलेले ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीत त्याची कापणी करून अंगणात, ओट्यावर, घरात आणले, मात्र रचलेल्या उडव्यांमधील ओलाव्यामुळे भाताच्या भाऱ्यांत प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि दाणे वाफल्यानेही नुकसान झाले आहे. भात नुकसानी बरोबरच झोडणीनंतर मजुरी खर्चाला हातभार लावणारे भात पिकाची पावली काळी पडल्याने त्याला ग्राहक नाही. तसेच पावसाच्या सुरवातीला वापरण्यात येणार गुरांचा चारा म्हणजेच पावली चारा म्हणून ठेवता येणार नसल्याने दोन्ही बाजूंनी शेतकºयांचे नुकसान आहे.भातशेती नुकसानीची पाहणी आम्ही थेट शेतात जाऊन करत असून भात, पेंढा, व पावली असे नुकसान झाले आहे. कापणी लांबल्याने काही भातपीक हाती लागले तरी दळताना कणी किंवा पीठ होण्याची शक्यता असून जेमतेम २० ते २५ टक्के पीक कामी येऊ शकेल. सुरू असलेले पंचनामे आम्ही पुढील कारवाईसाठी लकरात लवकर वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत-अनिल मोरे, के टी संखेकृषी सहाय्यक अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार