शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

डहाणूचा विकास राष्ट्रवादीनेच केला!, भाजपाचा भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:15 IST

पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा

डहाणू : पंचरंगी लढत असलेल्या डहाणू नगर परिषदेसाठीच्या प्रचारात राष्टÑवादी कॉँग्रेसकडून शहराचा विकास आम्हीच केल्याचा दावा करण्यात आल्याने नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिहीर शहा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांनी आपण गत पाच वर्षामध्ये केलेल्या विकासाचा ग्राफच मांडून प्रमुख विरोधी पक्ष भाजपाला पेचात टाकले आहे. त्यामुळे भाजपाकडून काय भूमिका मांडली जाते हे सुद्धा उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे.शहरात नगर परिषद हददीत गेल्या पाच वर्षात नागरिकांसाठी सोयी-सुविधा, रस्ते, वीज, पाणी आदी मुलभूत सुविधांबरोबर विविध विकासकामे राष्ट्रवादीनेच केल्याने आज शहर सुशोभित दिसत आहे. विरोधकाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते भ्रष्टाचाराचाचा बिनबुडाचा आरोप करीत असा टोला शहा यांनी लगावला. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पाच वर्षात सुजल निर्मल योजने अंतर्गत पाण्याची सोय केली आहे. सागर नाका येथील तारपा चौकाचे सुशोभिकरण, बालोद्यान, शहरात एलईडी दिवे बसवून डहाणू सुंदर केले, भुयारी गटार, रस्ते काँक्र ीटकरण, डांबरी करण, इत्यादी कामे राष्ट्रवादीच्या काळामध्ये झालेली असल्याचा ग्राफच त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मांडला.येथे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस, बविआ याच्यात पंचरंगी लढत असली तरी खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच असल्याचे दिसू लागले आहे. या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीकडून विरोधकांना लक्ष करण्यापेक्षा केलेल्या कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहचवून मतांचा जोगवा मागण्याचे तंत्र अवलंबले आहे. आमदार आनंद ठाकुर, राजेश पारेख, करण ठाकुर, रमेश कर्नावट मतदारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका व विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले आहे.प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची हजेरी लागणारजव्हार : निवडणूकीचा दिवस जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणनिती आखून स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन करण्याची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, भाई जगताप, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तर भाजप कडून विनोद तावडे, विष्णू सावरा आणि चिंतामण वनगा यांच्या सभा निश्चित केल्या जाणार असल्याची माहिती पक्षीय प्रतिनिधींनी दिली आहे. पालघर जिल्हयातील जव्हार नगरपंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेचे ठरत आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कमी अवधी मिळाला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरच भर दिला आहे. हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने, नेत्यांच्या सभांच्या तारखांची जुळवाजुळव सुरू केली आहे. दरम्यान, कमी कालावधी आणि हिवाळी अधिवेशनामुळे ८ ते १० डिसेंबरच्या दरम्यान, स्टार प्रचारकांच्या सभा होतील, असा अंदाज आहे. या सभांमुळे या निवडणुकांमधील वातावरण बदलणार असल्याचा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस