शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:44 IST

डहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे. मात्र परगावातील पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थेबाबत स्थानिक प्रशासन टोलवा-टोलवी करीत असल्याने नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आहे.या वर्षी शनिवारी आणि रविवारला जोडून नाताळ आल्याने सलग तीन दिवसाच्या सुट्टीमुळे डहाणूला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे डहाणू बोर्डी आणि डहाणू जव्हार या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. येथील बोर्डी घोलवड, चिखले, नरपड आणि आगर या समुद्रकिनारी वाहन पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. बोर्डी ग्रामपंचायतीने कर आकारून वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र पारनाका बीच शहरी भागात असल्याने तेथे पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय या भागात बहुतेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असून येथे येणारे परगावातील पर्यटक डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गालगतच्या शेजारी बेशिस्त पार्किंग करतात. त्यामुळे विशेषत: सायंकाळच्या वेळेस गर्दी वाढते. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून वाहन पार्किंग तर सोडाच चालणेही कठीण होत असल्याने वाद-विवादाचे प्रसंग उद्भवतात. नगर पालिका क्षेत्रातील या हॉटेल्सचे बार पुन्हा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.परंतु या नियमबाहय पार्किंग व्यवस्थेविषयी हॉटेल्स मालकांना जाब विचारण्यात स्थानिक प्रशासन धजावताना दिसत नाही. या बाबत डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी डवले यांना विचारले असता, ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसून वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही जबाबदारी ढकलली. तर दुसरीकडे डहाणू सा. बा. विभागाने नियमांचा हवाला देत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आण ित्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना आखताना पोलिसांनाच कंबर कसावी लागणार आहे.>कार्यक्रमांमुळे वाढणार गर्दी३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिबे्रशनसाठी काही हॉटेल्सनी गल्ला जमविण्यासाठी कार्यक्र मांचे आयोजन केले असून तेथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या गर्दीमुळे अपघात घडून निष्पाप जीव वाचवायचा असल्यास वाहतूक नियमनाचे गणित स्थानिक प्रशासनालाच सोडवावे लागणार आहे.