शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

डहाणूकरांच्या नशिबी वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 02:44 IST

डहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे.

अनिरुद्ध पाटीलडहाणू/बोर्डी: ३१ डिसेंबर रविवारी आल्याने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना डहाणूकरांना करावा लागणार आहे. मात्र परगावातील पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थेबाबत स्थानिक प्रशासन टोलवा-टोलवी करीत असल्याने नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आहे.या वर्षी शनिवारी आणि रविवारला जोडून नाताळ आल्याने सलग तीन दिवसाच्या सुट्टीमुळे डहाणूला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे डहाणू बोर्डी आणि डहाणू जव्हार या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली होती. येथील बोर्डी घोलवड, चिखले, नरपड आणि आगर या समुद्रकिनारी वाहन पार्किंगसाठी मुबलक जागा आहे. बोर्डी ग्रामपंचायतीने कर आकारून वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. मात्र पारनाका बीच शहरी भागात असल्याने तेथे पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय या भागात बहुतेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्स असून येथे येणारे परगावातील पर्यटक डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गालगतच्या शेजारी बेशिस्त पार्किंग करतात. त्यामुळे विशेषत: सायंकाळच्या वेळेस गर्दी वाढते. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असून वाहन पार्किंग तर सोडाच चालणेही कठीण होत असल्याने वाद-विवादाचे प्रसंग उद्भवतात. नगर पालिका क्षेत्रातील या हॉटेल्सचे बार पुन्हा सुरू झाल्यानंतर हे प्रमाण कमालीचे वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.परंतु या नियमबाहय पार्किंग व्यवस्थेविषयी हॉटेल्स मालकांना जाब विचारण्यात स्थानिक प्रशासन धजावताना दिसत नाही. या बाबत डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी डवले यांना विचारले असता, ही बाब आमच्या अखत्यारीत येत नसून वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही जबाबदारी ढकलली. तर दुसरीकडे डहाणू सा. बा. विभागाने नियमांचा हवाला देत सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय देण्यासाठी आण ित्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना आखताना पोलिसांनाच कंबर कसावी लागणार आहे.>कार्यक्रमांमुळे वाढणार गर्दी३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिबे्रशनसाठी काही हॉटेल्सनी गल्ला जमविण्यासाठी कार्यक्र मांचे आयोजन केले असून तेथे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या वाहनांच्या गर्दीमुळे अपघात घडून निष्पाप जीव वाचवायचा असल्यास वाहतूक नियमनाचे गणित स्थानिक प्रशासनालाच सोडवावे लागणार आहे.