शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

डहाणू तालुक्यात घोर नृत्योत्सवाची गौरवी परंपरा, तारपानंतरचे आदिवासींचे घोर हे महत्वाचे वाद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 02:46 IST

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे. . येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात त्याला मानाचे स्थान असून त्यासाठी पर्यटकही दाखल होतात.तालुक्यातील किनारी भागात वसलेल्या माच्छी, भंडारी, बारी या गुजराती भाषिक समाजात दिवाळी सणानिमित्त हा नृत्योत्सव केला जातो. धनत्रयोदशीपासून नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेपर्यंत समाजबांधवाच्या अंगणात, मंदिर आणि ग्रामदैवतांच्या ठिकाणी मंडली मातेला(सरस्वती देवी) प्रसन्न करण्यासाठी हा नाच केला जातो. घोर हे लोखंडी सळईच्या गोल रिंगणात घुंगरू गुंफून तयार केले जाते. ते हाताच्या मुठीत घेऊन लयबद्धरित्या वाजवून हा नाच केला जातो. तो पुरुषीप्रधान असून १२ ते १५ जोड्या त्याच्या तालावर दोन ते तीन प्रकारचा फेर धरून नाचतात. डोक्यावर फेटा, अंगात बनीयन तर छातीवर लुगड्यांच्या(नऊवारी) साह्याने नक्षीदार विणकाम केले जाते. त्यावर झेंडू फुलांच्या माळांची सजवट तर कमरेला घुंगरांची माळ बांधतात. पांढर्या धोतरामुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसते. शिवाय डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्य खुलून दिसते. एका हातात दांडिया आणि दुसऱ्या हातात मोरपंखाचा गुच्छ घेतलेल्या नर्तकाला घोरया म्हणतात. त्यांना दैवतांप्रमाणे सवाशिणींकडून पुजले जाते. बगळी(बगळा) मंडली मातेचे वाहन कापडाने बनविले जाते. ते ८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर बांधून मध्यभागी धरले जाते. कवया(गायक) हा पारंपरिक रामायण, महाभारत तसेच गणपती, राम-कृष्ण यांच्या पौराणिक कथांची आणि विविध ग्राम व कुलदैवतांची कवणं (गीतं) गातो. पारतंत्र्य काळात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्याने शाहिराची भूमिका बजावल्याचा इतिहास आहे. दरवर्षीप्रमाणे हा पारंपरिक नृत्यप्रकार पाहण्यासाठी स्थांिनकांप्रमाणेच, पर्यटक आणि नृत्य अभ्यासकांची गर्दी जमते. चिखले, घोलवड, आगर आदी गावतील कवये प्रसिद्ध आहेत.सीमा भागातील माच्छी, भंडारी या गुजराती भाषिक समाजाचा हा पारंपरिक नृत्यप्रकार आहे. त्याद्वारे या समाजाचा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होत आहे. त्याच्या संवर्धनासाठी तारपानृत्या प्रमाणेच शासन मान्यता मिळायला हवी.- मनीष जोंधळेकर (समाजधुराणी, माच्छी समाज चिखले, वडकतीपाडा)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार