शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

डहाणू तालुक्यात घोर नृत्योत्सवाची गौरवी परंपरा, तारपानंतरचे आदिवासींचे घोर हे महत्वाचे वाद्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 02:46 IST

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात दिवाळीनिमित्त धनत्रयोदशी ते बलिप्रतिपदा या काळात घोर या नृत्योत्सवाची थोर परंपरा आहे. . येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात त्याला मानाचे स्थान असून त्यासाठी पर्यटकही दाखल होतात.तालुक्यातील किनारी भागात वसलेल्या माच्छी, भंडारी, बारी या गुजराती भाषिक समाजात दिवाळी सणानिमित्त हा नृत्योत्सव केला जातो. धनत्रयोदशीपासून नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेपर्यंत समाजबांधवाच्या अंगणात, मंदिर आणि ग्रामदैवतांच्या ठिकाणी मंडली मातेला(सरस्वती देवी) प्रसन्न करण्यासाठी हा नाच केला जातो. घोर हे लोखंडी सळईच्या गोल रिंगणात घुंगरू गुंफून तयार केले जाते. ते हाताच्या मुठीत घेऊन लयबद्धरित्या वाजवून हा नाच केला जातो. तो पुरुषीप्रधान असून १२ ते १५ जोड्या त्याच्या तालावर दोन ते तीन प्रकारचा फेर धरून नाचतात. डोक्यावर फेटा, अंगात बनीयन तर छातीवर लुगड्यांच्या(नऊवारी) साह्याने नक्षीदार विणकाम केले जाते. त्यावर झेंडू फुलांच्या माळांची सजवट तर कमरेला घुंगरांची माळ बांधतात. पांढर्या धोतरामुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसते. शिवाय डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्य खुलून दिसते. एका हातात दांडिया आणि दुसऱ्या हातात मोरपंखाचा गुच्छ घेतलेल्या नर्तकाला घोरया म्हणतात. त्यांना दैवतांप्रमाणे सवाशिणींकडून पुजले जाते. बगळी(बगळा) मंडली मातेचे वाहन कापडाने बनविले जाते. ते ८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर बांधून मध्यभागी धरले जाते. कवया(गायक) हा पारंपरिक रामायण, महाभारत तसेच गणपती, राम-कृष्ण यांच्या पौराणिक कथांची आणि विविध ग्राम व कुलदैवतांची कवणं (गीतं) गातो. पारतंत्र्य काळात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्याने शाहिराची भूमिका बजावल्याचा इतिहास आहे. दरवर्षीप्रमाणे हा पारंपरिक नृत्यप्रकार पाहण्यासाठी स्थांिनकांप्रमाणेच, पर्यटक आणि नृत्य अभ्यासकांची गर्दी जमते. चिखले, घोलवड, आगर आदी गावतील कवये प्रसिद्ध आहेत.सीमा भागातील माच्छी, भंडारी या गुजराती भाषिक समाजाचा हा पारंपरिक नृत्यप्रकार आहे. त्याद्वारे या समाजाचा सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होत आहे. त्याच्या संवर्धनासाठी तारपानृत्या प्रमाणेच शासन मान्यता मिळायला हवी.- मनीष जोंधळेकर (समाजधुराणी, माच्छी समाज चिखले, वडकतीपाडा)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार