शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

डहाणू तालुका तीन दिवसांपासून अंधारात खितपत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:17 IST

डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे. तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील वीज रविवार सकाळपासून ते दुपारपर्यंत बेपत्ता होती. देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार महिने म्हणजेच दर शुक्रवारी आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडीत केला जात होता. त्यामुळे पावसाळयात वीज पुरवठा सुरळीत राहील असे वाटले होते, परंतु पहिल्या पावसाच्या हलक्या सरीतच वीज महावितरणची अब्रू चव्हाटयावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. १५ जून रोजी आठ तास, १६ जून रोजी रमजान ईद असतांना देखील सकाळी देदाळे सब स्टेशन मध्ये बिघाड झाला. त्यानंतर बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये बिघाड झाल्याने सहा तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू राहिल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तर रविवारी सकाळपासून १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यांने संध्याकळ पर्यंत वीज आली नव्हती. परिणामी साखरे धरणाची मोटार बंद पडून २९ गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बंदरपट्टी भागांत वीज नसल्याने येथील गावांतील काम, धंदे, विशेषत: डायमेकिंग व्यवसाय बंद पडून नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.>उच्च वाहिन्या नादुरस्त तरी रेल्वेचा वीजपुरवठा सुरूपॉवरग्रीड कॉरपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडच्या उच्चदाब वाहिन्या नादुरु स्त झाल्याने पालघर जिल्हयातील ७० भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी १० ते ४.३० वाजेपर्यंत खंडित झाला होता. २२० केव्ही खैराफाटक वाहिनी क्र . १ व २ नादुरस्त झाल्याने पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, विक्र मगड, मोखाडा, तलासरी या तालुक्यातील वीज खंडित झाली. परंतु संध्याकाळी ४.३०ला ती सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. रेल्वेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवून दुपार पर्यंत काही भागाचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले तर पहिल्याच पावसाने दणका दिल्याने वीज यंत्रणेचे पितळ उघडे पडले. बोईसर येथील खैरापाडा येथे असलेल्या २२० के व्ही क्षमतेच्या सब स्टेशनला कोलशेत-पडघा, बोरिवली -तारापूर व पॉवर ग्रीडच्या टॉवरने वीजपुरवठा होत असून तेथून विविध भागात सर्वत्र वीजपुरवठा होतो. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बोरिवली -तारापूर तर आज सकाळी १०च्या सुमारास पॉवर ग्रीडच्या अशा दोन्ही वीजवाहिनीवर वेगवेगळ्या कारणाने ट्रिपिंग झाल्याने सुमारे १२०० उद्योगा सह लाखो वीजग्राहकांना त्याचा फटका बसला.>पहिल्याच पावसात तलासरीची बत्ती गुलतलासरी : या भागात शनिवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने वीज मंडळाची पोल खोल झाली, वाºया सह पडलेल्या पावसाने भागातील बत्ती गुल झाली ती पूर्ववत करण्यास महावितरणच्या कर्मचाºयांना २४ तासानंतरही यश आले नसल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. अंधार, गर्मी त्यातच डासांचा उपद्रव या मुळे नागरिक कमालीचे हैराण झाले.