शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू तालुका तीन दिवसांपासून अंधारात खितपत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:17 IST

डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील बंदरपट्टी भागातील चिंचणी, वरोर, वानगांव, साखरे, इत्यादी फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ गावे तसेच तीस ते चाळीस खेडोपाड्यात गेल्या तीन दिवसांपासून वीज बेपत्ता झाली आहे. तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातील वीज रविवार सकाळपासून ते दुपारपर्यंत बेपत्ता होती. देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली गेली चार महिने म्हणजेच दर शुक्रवारी आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडीत केला जात होता. त्यामुळे पावसाळयात वीज पुरवठा सुरळीत राहील असे वाटले होते, परंतु पहिल्या पावसाच्या हलक्या सरीतच वीज महावितरणची अब्रू चव्हाटयावर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. १५ जून रोजी आठ तास, १६ जून रोजी रमजान ईद असतांना देखील सकाळी देदाळे सब स्टेशन मध्ये बिघाड झाला. त्यानंतर बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये बिघाड झाल्याने सहा तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू राहिल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तर रविवारी सकाळपासून १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यांने संध्याकळ पर्यंत वीज आली नव्हती. परिणामी साखरे धरणाची मोटार बंद पडून २९ गावांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून बंदरपट्टी भागांत वीज नसल्याने येथील गावांतील काम, धंदे, विशेषत: डायमेकिंग व्यवसाय बंद पडून नागरिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे.>उच्च वाहिन्या नादुरस्त तरी रेल्वेचा वीजपुरवठा सुरूपॉवरग्रीड कॉरपोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडच्या उच्चदाब वाहिन्या नादुरु स्त झाल्याने पालघर जिल्हयातील ७० भागाचा वीजपुरवठा रविवारी सकाळी १० ते ४.३० वाजेपर्यंत खंडित झाला होता. २२० केव्ही खैराफाटक वाहिनी क्र . १ व २ नादुरस्त झाल्याने पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, विक्र मगड, मोखाडा, तलासरी या तालुक्यातील वीज खंडित झाली. परंतु संध्याकाळी ४.३०ला ती सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. रेल्वेचा वीज पुरवठा सुरळीत ठेवून दुपार पर्यंत काही भागाचा वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले तर पहिल्याच पावसाने दणका दिल्याने वीज यंत्रणेचे पितळ उघडे पडले. बोईसर येथील खैरापाडा येथे असलेल्या २२० के व्ही क्षमतेच्या सब स्टेशनला कोलशेत-पडघा, बोरिवली -तारापूर व पॉवर ग्रीडच्या टॉवरने वीजपुरवठा होत असून तेथून विविध भागात सर्वत्र वीजपुरवठा होतो. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास बोरिवली -तारापूर तर आज सकाळी १०च्या सुमारास पॉवर ग्रीडच्या अशा दोन्ही वीजवाहिनीवर वेगवेगळ्या कारणाने ट्रिपिंग झाल्याने सुमारे १२०० उद्योगा सह लाखो वीजग्राहकांना त्याचा फटका बसला.>पहिल्याच पावसात तलासरीची बत्ती गुलतलासरी : या भागात शनिवारी पडलेल्या पहिल्याच पावसाने वीज मंडळाची पोल खोल झाली, वाºया सह पडलेल्या पावसाने भागातील बत्ती गुल झाली ती पूर्ववत करण्यास महावितरणच्या कर्मचाºयांना २४ तासानंतरही यश आले नसल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. अंधार, गर्मी त्यातच डासांचा उपद्रव या मुळे नागरिक कमालीचे हैराण झाले.