शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पालघर जिल्ह्यात काळ्या तिळाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 22:22 IST

प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प । औषधी गुणधर्म असूनही केले दुर्लक्ष

पालघर : जिल्ह्यातील ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टर क्षेत्रावर औषधी समजल्या जाणाऱ्या काळ्या तिळाची लागवड करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात काळ्या तिळाचा असा प्रकल्प राबविणारा पालघर तालुका एकमेव ठरणार असून काळ्या तिळाच्या उत्पादनासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे सरासरी क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष विविध पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. भातपिक लागवडीसाठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रापैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागलीचे पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शक्यतो भात, नागली, वरई, उडीद, तूर, भुईमूग, कुळीथ, मूग, चवळी, खुरासनी आदी पिके घेतली जात असली तरी तिळाच्या लागवडीच्या ६०० हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी तिळाची लागवडच केली नसल्याचे दिसून आले आहे. या पीक लागवडीच्या संदर्भातील शेतकºयांची उदासीनता दूर करण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत.पालघर तालुक्यातील बहाडोली, चहाडे, सागावे, गिरनोली, लालठाणे, तांदूळवाडी, पारगाव या सूर्या नदीच्याजवळच्या इतर काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळ््या तिळाची १५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड केली जात आहे. मात्र येथील शेतकरी या काळ्या तिळापासून घरगुती वापरासाठी तेल तयार करत असतात.तालुक्यातील रब्बी लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले असून केंद्र सरकारच्या भात पड क्षेत्र विकास लागवड कार्यक्र मांतर्गत बहाडोली व परिसरात असलेल्या काळ््या तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून शेतकºयांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्यात येणार आहे.सूर्या नदीजवळ असलेल्या या शेती बागायती पट्ट्यांमध्ये काळ््या तिळाची लागवड केली जात असून त्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असूननही उत्पादनाकडे हवे तसे लक्ष दिले गेले नव्हते. पालघर तालुका कृषी विभागाने केंद्र सरकारच्या टी.आर.एफ.एल या पड क्षेत्रात रब्बी लागवड करण्याच्या योजनेअंतर्गत सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरहून अधिक क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काळा तीळ लागवडीचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.सातत्याने नवीन प्रयोग शेतकºयांनी करणे गरजेचे आहे असे सातत्याने कृषी विभागाकडून सांगितले जाते. मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.मंजुरीसाठी अंतिम टप्प्यातयेथील शेतकºयांना बियाणे देण्यात येणार असून सरकारी योजनेअंतर्गत त्यांना आवश्यक ती द्रव्य रूपातील खत व इतर सामग्री पुरवण्यात येणार आहे. याकरिता शेतकºयांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना या पिकाद्वारे रब्बी हंगामात अधिक प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी