शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात काळ्या तिळाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 22:22 IST

प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प । औषधी गुणधर्म असूनही केले दुर्लक्ष

पालघर : जिल्ह्यातील ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टर क्षेत्रावर औषधी समजल्या जाणाऱ्या काळ्या तिळाची लागवड करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात काळ्या तिळाचा असा प्रकल्प राबविणारा पालघर तालुका एकमेव ठरणार असून काळ्या तिळाच्या उत्पादनासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र हे लागवडीचे सरासरी क्षेत्र असून त्यापैकी १ लाख १ हजार ००१ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष विविध पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. भातपिक लागवडीसाठी एकूण ७६ हजार ३८८ क्षेत्रापैकी ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. तर ११ हजार २०५ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ११ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रावर नागलीचे पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात शक्यतो भात, नागली, वरई, उडीद, तूर, भुईमूग, कुळीथ, मूग, चवळी, खुरासनी आदी पिके घेतली जात असली तरी तिळाच्या लागवडीच्या ६०० हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी तिळाची लागवडच केली नसल्याचे दिसून आले आहे. या पीक लागवडीच्या संदर्भातील शेतकºयांची उदासीनता दूर करण्याचे प्रयत्न कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहेत.पालघर तालुक्यातील बहाडोली, चहाडे, सागावे, गिरनोली, लालठाणे, तांदूळवाडी, पारगाव या सूर्या नदीच्याजवळच्या इतर काही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळ््या तिळाची १५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर लागवड केली जात आहे. मात्र येथील शेतकरी या काळ्या तिळापासून घरगुती वापरासाठी तेल तयार करत असतात.तालुक्यातील रब्बी लागवड क्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले असून केंद्र सरकारच्या भात पड क्षेत्र विकास लागवड कार्यक्र मांतर्गत बहाडोली व परिसरात असलेल्या काळ््या तिळाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून शेतकºयांना त्यादृष्टीने प्रोत्साहित करण्यात येणार आहे.सूर्या नदीजवळ असलेल्या या शेती बागायती पट्ट्यांमध्ये काळ््या तिळाची लागवड केली जात असून त्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असूननही उत्पादनाकडे हवे तसे लक्ष दिले गेले नव्हते. पालघर तालुका कृषी विभागाने केंद्र सरकारच्या टी.आर.एफ.एल या पड क्षेत्रात रब्बी लागवड करण्याच्या योजनेअंतर्गत सुमारे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी १०० हेक्टरहून अधिक क्षेत्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काळा तीळ लागवडीचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.सातत्याने नवीन प्रयोग शेतकºयांनी करणे गरजेचे आहे असे सातत्याने कृषी विभागाकडून सांगितले जाते. मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.मंजुरीसाठी अंतिम टप्प्यातयेथील शेतकºयांना बियाणे देण्यात येणार असून सरकारी योजनेअंतर्गत त्यांना आवश्यक ती द्रव्य रूपातील खत व इतर सामग्री पुरवण्यात येणार आहे. याकरिता शेतकºयांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना या पिकाद्वारे रब्बी हंगामात अधिक प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी