शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

सीआरझेड ऑनलाइन सुनावणी ३० सप्टेंबरला, मच्छीमारांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 02:38 IST

आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे.

- हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील सीआरझेड प्रारूप किनारा व्यवस्थापनासंबंधी जनसुनावणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाने ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर केल्याने किनारपट्टी भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आॅनलाइनद्वारे सुनावणीची कायद्यात कुठेही तरतूद नसताना कमीतकमी आक्षेप नोंदविण्यात येतील, असा छुपा डाव रचण्यात आल्याचा आरोप मच्छीमार संघटनांमधून केला जात आहे. ही जनसुनावणी कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी ममकृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय नवी दिल्ली यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी नवीन सीआरझेड अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेच्या तरतुदीनुसार केंद्र शासन प्राधिकृत संस्थेमार्फत सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे अद्ययावत करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने हे काम राज्य शासनाने नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट, चेन्नई या केंद्र शासन प्राधिकृत संस्थेत दिले होते. या संस्थेने पालघर जिल्ह्याचे प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. त्या अनुषंगाने सीआरझेड अधिसूचना २०१९ नुसार पालघर जिल्ह्याचे मुक्त प्रारूप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना, हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने२२ जानेवारी २०२० रोजी ँ३३स्र२://ेू९ें.ॅङ्म५.्रल्ल/ या संकेत-स्थळावर प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये सुनावणीबाबत तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या, परंतु २१ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली सुनावणी कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली होती. ही सुनावणी संचालक व सदस्य सचिव पर्यावरण विभाग एमसीझेडएमए यांच्याकडील २५ आॅगस्ट २०२० रोजीच्या पत्रान्वये ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. यामुळे या सुनावणीमध्ये सहभागी होण्याकरिता लिंक २८ सप्टेंबर रोजीच्या वर्तमानपत्रात ६६६.स्रं’ॅँं१.ॅङ्म५.्रल्ल व ६६६.ेस्रूु.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यातयेणार आहे.ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार प्रदान करण्यात आल्याचे केंद्र व राज्य शासन एके ठिकाणी सांगत असताना ग्रामसभांनी विरोधातील एकमताने घेतलेल्या ठरावाला न जुमानता वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी आदीसारखे प्रकल्प लादले जात असून बुलेट ट्रेनसाठी पोलीस बळाचा वापर करीत जबरदस्तीने जमीन सर्वेक्षण आणि भरपाईची प्रक्रिया राबवली जात आहे. ३० सप्टेंबर रोजी होणारी जनसुनावणी ही आॅनलाईन घेण्याची कायद्यात कुठेही तरतूद नसून आॅनलाईन पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाला आपला आक्षेप नोंदविण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे पर्यावरण अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांचे म्हणणे आहे. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेला असून या भागात नेहमीच मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या असते. त्यामुळे जनसुनावणीदरम्यान मोबाईल नेटवर्क निघून गेल्यास अनेक घटकांना मोठ्या प्रमाणात आपले आक्षेप नोंदविण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच कमी कालावधीत प्रत्येकाला आपला आक्षेप नोंदविण्यास पुरेसा वेळ मिळणार नसल्याची भीती मच्छीमारांमधून व्यक्त केली जात आहे.नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदाज्या नागरिकांना आणि जेष्ठ नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही, अशांना आपले आक्षेप नोंदविता येणार नाही. तसेच बाहेरील व्यक्ती यात सहभाग घेत याला वेगळे वळण लागण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.वरील सर्व बाबी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून संविधानाने आम्हाला दिलेल्या नागरी अधिकारांचा भंग करणाºया असल्याने या जनसुनावणीस आमचा तीव्र विरोध असल्याचे ठाणे जिल्हा मच्छीमार सहकारी संघ, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा समाज संघ आदी मच्छीमार संघटनांनी जाहीर केले आहे.एक तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून एका बंद सभागृहात सुनावणी आयोजित करावी किंवा जनजीवन सुरळीत झाल्यानंतरच पुढे सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ममकृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती मेहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :palgharपालघर