शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हयात प्रमाणपत्रासाठी निराधारांची कोरोनाकाळात बँकांसमोर होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 00:40 IST

प्रतिमाह १ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. दरवर्षी या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागत असते.

हुसेन मेमनलोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील आदिवासी आणि इतर समाजातील निराधारांना राज्य शासनाकडून पेन्शन मिळत असते. त्यावर कशीबशी या व्यक्ती गुजराण करीत आहेत. जानेवारीपासून ते मार्चपर्यंत आपले हयात प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी श्रावण बाळ, संजय गांधी निराधार आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना आपापले हयात प्रमाणपत्र तहसील कार्यालयात जमा करणे बंधनकारक आहे. परंतु हयात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोरोना काळ असूनदेखील, शहरातील स्टेट बँक, महाराष्ट्र बँकेसमोर या लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. 

प्रतिमाह १ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे. दरवर्षी या लाभार्थीना हयात प्रमाणपत्र बँकेला सादर करावे लागत असते. हयातीचा दाखला मिळविण्यासाठी कोरोना काळातही या निराधार लाभार्थ्यांच्या लांबच लांब रांगा शहरातील बँकेसमोर लागत आहेत. त्यामुळे एकीकडे शासन, प्रशासन कोरोना काळात ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करीत आहे; तर दुसरीकडे या योजनांचा लाभ घेऊन आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी हे निराधार जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी बँक प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे या निराधारांची ससेहोलपट सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ज्येष्ठांनी या वयात घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे असताना त्यांना घराबाहेर पडून बँकेच्या दारात गर्दीत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोना काळात या निराधार लाभार्थ्यांना हयात दाखला घरपोच देण्यासाठी प्रयत्न करावेत. बँक व तालुका प्रशासनाच्या समन्वयातून निराधार लाभार्थ्यांच्या हयात प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

कोरोनाबाबतची व्यवस्था बँकांमध्ये अपुरी  ज्येष्ठांना साथरोगाच्या काळात काळजी घ्यावी लागते. बाधित होण्याचे प्रमाण ज्येष्ठांमध्ये अधिक आहे. बँकांकडून सॅनिटायझरची व्यवस्था अपुरी पडत आहे. तसेच ऑनलाइन प्रमाणपत्र नाही त्यांनी तहसील कार्यालयातून लेखी पत्र दिल्यास बँकांकडून अनुदान दिले जाते.  

नियम पाळण्यात लोकांमध्ये बेफिकिरीलाभार्थ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाइन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. निराधारांना ते शक्य होत नाही. तसेच बँकांसमोर होत असलेल्या गर्दीमध्ये अनेक जण मास्कबाबत बेफिकीर असल्याचेही दिसते.