शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

तारापूरमधील उद्योगांवर संकट; उत्पादन होणार ठप्प?, बेरोजगारीची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 22:51 IST

सीईटीपीवर एमपीसीबीची बंदची कारवाई

पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून निघणारे घातक रासायनिक सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर (सीईटीपी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदची कारवाई केली आहे. या प्रक्रिया केंद्राचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असले तरी सोमवारी (दि. ९) दुपारी एमपीसीबीच्या तारापूर एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन सोसायटीच्या (टीईपीएस) बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्याबरोबर होणाºया बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे तारापूरमधील शेकडो उद्योगांमधील उत्पादन ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तारापूरमधील या कारवाईमुळे सुमारे दोन लाख कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. एमपीसीबीची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई समजली जात असली तरी वास्तविक अशी करवाई कधीच होणे गरजेचे होते. त्यामुळे आता उशिरा का होईना केलेल्या कारवाईची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहेत. मात्र त्याच वेळी या कारवाईमुळे तारापूरमध्ये औद्योगिक भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रांमध्ये लघु, मध्यम व मोठे असे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी २५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमता असलेल्या तारापूरमधील या जुन्या सीईटीपीमध्ये सांडपाणी पाठविणाºया उद्योगांची सदस्य संख्या ६०० च्या वर असून एमआयडीसीमध्ये ४० टक्के पाणी कपातीपूर्वी सुमारे ४० ते ५० एमएलडी सांडपाणी प्रतिदिन येत होते. या अतिरिक्त येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते नवापूरच्या खाडीत सरळ सोडण्यात येत होते.सांडपाणी प्रक्रियेविना नवापूर खाडीतमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाºया तारापूूर एन्व्हायरन्मेंट प्रोटेक्शन सोसायटीला (टीईपीएस) बजावलेल्या क्लोजर नोटिशीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पॅरामीटरप्रमाणे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसून सीओडीचे प्रमाण जिथे २५० पाहिजे तेथे ३००० मिलीग्राम पर लिटर पोचल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे, तर सीईटीपीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी येत असल्यामुळे ते प्रक्रियेविना नवापूर खाडीत सोडले जाते, तर काही सांडपाणी नाल्यावाटे ओसंडून वाहत जाते.आउटलेटच्या सांडपाण्याच्या तपासणीनंतर असे निदर्शनास आले आहे की, सीईटीपीचे व्यवस्थापन प्रदूषण रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्याचप्रमाणे सीईटीपीची देखभाल व दुरुस्ती आणि सुधारणांकडे ही दुर्लक्ष झाल्याने अति प्रदूषित रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे गंभीर प्रदूषण होते म्हणून उद्योगांकडून येणारे रासायनिक सांडपाणी पूर्णपणे थांबवून दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास पर्यावरण अधिनियमाच्या तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे अनेक ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.