शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

CoronaVirus: भारत गॅसमुळे संपूर्ण गाव 'गॅस'वर; कोरोना होण्याच्या भीतीनं चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 15:52 IST

CoronaVirus: कंपनीतील कामगारांचा गावात वावर; ग्रामस्थ भयभीत 

वाडा: वाडा तालुक्यातील हमरापूर गावाच्या हद्दीत 'भारत गॅस' ही कंपनी असून अत्यावश्यक सेवा म्हणून ही कंपनी सुरूच आहे.कंपनीत गॅस भरण्यासाठी बाहेरून टॅकर येत असून दुर्दैर्वाने वाहनचालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास तो कामगारांना पर्यायाने ग्रामस्थांना होईल या भीतीने येथील ग्रामस्थांची झोप उडाली आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून अत्यावश्यक सेवा असलेल्या कंपन्यांना सुरू राहण्याची मुभा देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने हमरापूर येथील भारत गॅस कंपनी सुरू आहे. या ठिकाणी गॅस भरण्यासाठी मुंबई ठाणे या शहरांतून तसेच बाहेरगावाहून टँकर येत असतात. या टँकरच्या वाहनचालकांना दुर्दैर्वाने कोरोना विषाणूची लागण झाल्यास पर्यायाने कामगार व नंतर ग्रामस्थांना संसर्ग होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

भारत गॅस या कंपनीतील सुमारे बारा कामगार हे हमरापूर गावात वास्तव्यास असून कंपनी सुटल्यानंतर ते गावात येऊन भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये राहतात. त्यांचा गावकऱ्यांशी दररोज संपर्क येत असून दुर्दैर्वाने एखाद्या कामगाराला संसर्ग झाल्यास त्याचा विपरित परिणाम गावावर होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कामगारांची कंपनीतच व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाकडे केली आहे. 

ग्रामस्थांच्या मनात भीतीभारत गॅस ही कंपनी सुरू असून या कंपनीतील बारा कामगार आमच्या गावात वास्तव्यास आहेत. या कंपनीत मुंबई, ठाणे या शहरातून गॅस भरण्यासाठी टॅकर येत असून या वाहनातील  चालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास पर्यायाने कामगार व नंतर ग्रामस्थांना होऊ शकतो.त्यामुळे कामगारांना कंपनीत राहण्याची व्यवस्था करावी. - बाळू केणी, ग्रामस्थ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस