शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:48 IST

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

- आशीष राणे वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई -विरार शहर हद्दीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीनही धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.एप्रिल-मे महिना उजाडला की धरणांची पाणी-पातळी खालावते आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव अशी चार शहरे व ग्रामीण भाग मिळून वसई-विरार महापालिका हद्दीत मोडतात. या चारही शहरांची किमान पुढील तीन महिन्यांसाठी काळजी मिटली आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट व सतत हात धुण्याने मुबलक साठा असूनदेखील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. पालघरसह वसई तालुक्यातील या तीन धरणांचा सरासरी एकूण साठा मिळून ३९.३७ टक्के इतका असल्याने जुलैअखेरपर्यंत किंवा त्याही पुढे वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. या प्रयोगात पालिका यंदाही बºयापैकी यशस्वी झाल्याने धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हार मधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन पुरवले जाते.मागील वर्षी पाण्याची टंचाई थोडीफार भासली होती, मात्र जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गतवर्षी जुलै-आॅगस्ट व सप्टेंबरनंतर देखील समाधानकारक पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी पालिकेने पाण्याचे उचित नियोजन केल्याने व अमृत योजनाही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने या वेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दररोज १८० एमएलडी पाणीपुरवठावसई-विरार शहराला मुख्यत: सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील वर्षापासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद केले. मात्र, त्याचा फार फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य तीन धरणांतून अजूनही पुढील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच जुलैअखेरपर्यंत नियोजन पद्धतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार महापालिका दररोज या तीन धरणांतून १८० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी विविध भागांतून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोहोचवले जाते. दरम्यान, कडक उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांत पाण्याची मोठी पंचाईत निर्माण होऊ लागली आहे.तीन धरणांतील ८ मेपर्यंतची स्थितीसूर्या व सूर्या टप्पा-३ म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १०८.७९१ घनमिलिमीटर इतका असून अद्याप एकूण ३९.३७ टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. उसगाव धरणात १.५८७ घनमिलिमीटर म्हणजेच ३१.९९ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात ०.६२२ घनमिलिमीटर म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार