शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:48 IST

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

- आशीष राणे वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई -विरार शहर हद्दीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीनही धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.एप्रिल-मे महिना उजाडला की धरणांची पाणी-पातळी खालावते आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव अशी चार शहरे व ग्रामीण भाग मिळून वसई-विरार महापालिका हद्दीत मोडतात. या चारही शहरांची किमान पुढील तीन महिन्यांसाठी काळजी मिटली आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट व सतत हात धुण्याने मुबलक साठा असूनदेखील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. पालघरसह वसई तालुक्यातील या तीन धरणांचा सरासरी एकूण साठा मिळून ३९.३७ टक्के इतका असल्याने जुलैअखेरपर्यंत किंवा त्याही पुढे वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. या प्रयोगात पालिका यंदाही बºयापैकी यशस्वी झाल्याने धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हार मधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन पुरवले जाते.मागील वर्षी पाण्याची टंचाई थोडीफार भासली होती, मात्र जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गतवर्षी जुलै-आॅगस्ट व सप्टेंबरनंतर देखील समाधानकारक पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी पालिकेने पाण्याचे उचित नियोजन केल्याने व अमृत योजनाही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने या वेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दररोज १८० एमएलडी पाणीपुरवठावसई-विरार शहराला मुख्यत: सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील वर्षापासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद केले. मात्र, त्याचा फार फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य तीन धरणांतून अजूनही पुढील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच जुलैअखेरपर्यंत नियोजन पद्धतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार महापालिका दररोज या तीन धरणांतून १८० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी विविध भागांतून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोहोचवले जाते. दरम्यान, कडक उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांत पाण्याची मोठी पंचाईत निर्माण होऊ लागली आहे.तीन धरणांतील ८ मेपर्यंतची स्थितीसूर्या व सूर्या टप्पा-३ म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १०८.७९१ घनमिलिमीटर इतका असून अद्याप एकूण ३९.३७ टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. उसगाव धरणात १.५८७ घनमिलिमीटर म्हणजेच ३१.९९ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात ०.६२२ घनमिलिमीटर म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार