शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसई-विरारकरांची पाण्याची चिंता मिटली, धरणांत ४० टक्के पाणीसाठा,तीन महिने पुरेल इतका मुबलक साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 02:48 IST

यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. 

- आशीष राणे वसई : पालघर जिल्ह्यातील एकमेव महापालिका असलेल्या वसई -विरार शहर हद्दीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी, उसगाव व पेल्हार या तीनही धरणांत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा मुबलक व समाधानकारक साठा असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.एप्रिल-मे महिना उजाडला की धरणांची पाणी-पातळी खालावते आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदा तर संपूर्ण जग व देशावर कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून सतत हात धुण्याच्या केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या पाणी वापरात गतवर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. मात्र, मुबलक साठ्यामुळे आता ही चिंता मिटली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव अशी चार शहरे व ग्रामीण भाग मिळून वसई-विरार महापालिका हद्दीत मोडतात. या चारही शहरांची किमान पुढील तीन महिन्यांसाठी काळजी मिटली आहे. मात्र तरीही कोरोनाचे संकट व सतत हात धुण्याने मुबलक साठा असूनदेखील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. पालघरसह वसई तालुक्यातील या तीन धरणांचा सरासरी एकूण साठा मिळून ३९.३७ टक्के इतका असल्याने जुलैअखेरपर्यंत किंवा त्याही पुढे वसईकर नागरिकांची पाण्याची मोठी चिंता मिटलेली असेल, असेही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.वाढते नागरिकीकरण आणि त्या गरजेनुसार पाण्याचे नियोजन केले जात आहे. या प्रयोगात पालिका यंदाही बºयापैकी यशस्वी झाल्याने धरणात मुबलक साठा असल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांकडून सांगण्यात आले. वसई-विरार शहराला सूर्या-धामणी धरणातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा-३ मधून ५० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हार मधून १० एमएलडी पाणी प्रतिदिन पुरवले जाते.मागील वर्षी पाण्याची टंचाई थोडीफार भासली होती, मात्र जूनमध्ये पावसाला सुरुवात झाली आणि गतवर्षी जुलै-आॅगस्ट व सप्टेंबरनंतर देखील समाधानकारक पाऊस पडला होता. परंतु यंदाच्या वर्षी पालिकेने पाण्याचे उचित नियोजन केल्याने व अमृत योजनाही बºयापैकी कार्यान्वित झाल्याने या वेळी धरणात पाण्याचा साठा समाधानकारक आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.दररोज १८० एमएलडी पाणीपुरवठावसई-विरार शहराला मुख्यत: सूर्या प्रकल्प म्हणजेच धामणी, उसगाव आणि पेल्हार धरणांद्वारे पाणीपुरवठा होतो. मागील वर्षापासून विरार पूर्वेतील पापडखिंड धरण बंद केले. मात्र, त्याचा फार फरक पडणार नाही. त्यामुळे या मुख्य तीन धरणांतून अजूनही पुढील तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ म्हणजेच जुलैअखेरपर्यंत नियोजन पद्धतीने वसईतील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. वसई-विरार महापालिका दररोज या तीन धरणांतून १८० एमएलडी पाणी उचलते. हे पाणी विविध भागांतून मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांना पोहोचवले जाते. दरम्यान, कडक उन्हाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांत पाण्याची मोठी पंचाईत निर्माण होऊ लागली आहे.तीन धरणांतील ८ मेपर्यंतची स्थितीसूर्या व सूर्या टप्पा-३ म्हणजेच धामणी धरणातील सध्याचा पाण्याचा साठा १०८.७९१ घनमिलिमीटर इतका असून अद्याप एकूण ३९.३७ टक्के पाणी धरणात शिल्लक आहे. उसगाव धरणात १.५८७ घनमिलिमीटर म्हणजेच ३१.९९ टक्के इतका पाण्याचा साठा शिल्लक असून पेल्हार धरणात ०.६२२ घनमिलिमीटर म्हणजे १७.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार