शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

Coronavirus : पालघरमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांना पुन्हा उतरवले, आठवड्यातील दुसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 01:04 IST

गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते.

पालघर : थायलंडवरून मुंबईत आलेल्या व कच्छ एक्सप्रेस ट्रेनने आपल्या घरी वापी येथे जाणाऱ्या दोन नवदाम्पत्यासह अन्य एका सहकारी जोडप्याला गुरुवारी पालघर स्थानकात उतरविण्यात आले. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.गुजरात राज्यातील वापी येथील रहिवासी असलेले व नुकतेच लग्न झालेले जोडपे आपल्या अन्य एका सहकारी मित्र असलेल्या जोडप्यासोबत थायलंड येथे फिरण्यासाठी गेले होते. थायलंडची टूर आटोपून हे चार लोक १८ मार्च रोजी मुंबई विमानतळावर उतरले. तेथून त्यांनी ठाणे येथील आपल्या नातेवाईकांकडे एक दिवसाचा मुक्काम आटोपून त्यांनी आॅनलाईन पद्धतीने बांद्रा टर्मिनसवरून सुटणाºया कच्छ एक्सप्रेस ट्रेनची तिकिटे बुक केली. १९ मार्च (गुरुवारी) रोजी दोन्ही जोडप्यांनी एक्सप्रेसने वापीकडे जाणारा आपला सुरू केला. ट्रेनमध्ये चढल्यानंतर आपल्या जवळ बसलेल्या काही प्रवाशांनी त्यांच्याकडील असलेल्या मोठ्या बॅग्स आणि लगेज पाहता त्यांची चौकशी सुरू केली. ते थायलंडवरून आल्याची माहिती कळल्यानंतर काही प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या वेबसाईटवर आॅनलाइन तक्रार केली. आरक्षित डब्यातील तिकीट तपासनीसांनी त्यांचा शोध घेत एक्सप्रेस पालघर येथे थांबवून त्यांना पोलीस आणि रेल्वे अधीक्षकांच्या ताब्यात दिले. रेल्वे प्रशासनाने पालघरच्या आरोग्य पथकाला याची माहिती पुरविल्यानंतर त्यांनी त्यांची तपासणी केली. विमानतळावर त्या चारही जणांची तपासणी न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे नाहीतया प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याने त्यांना खाजगी वाहनाने वापी येथे रवाना करण्यात आले. १८ मार्चला जर्मनीवरून आलेल्या चार विद्यार्थ्यांना बांद्रा-दिल्ली गरीब रथ एक्सप्रेसमधून पालघरला उतरविण्यात आल्यानंतर लगेच गुरुवारी दुसºयाच दिवशी या दोन जोडप्यांना उतरविण्यात आल्याची घटना घडली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसwestern railwayपश्चिम रेल्वेpalgharपालघर