शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Coronavirus : कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका, टोमॅटोला कवडीमोलाचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:16 IST

Coronavirus : लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत. 

 

वाडा - वाडा तालुक्यात या वषी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली असून त्यात उत्पन्न ही भरपूर आले आहे. मात्र  लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत. टोमॅटो शेती करण्यासाठी सेवासहकारी सोसायट्यांकडून रब्बी पिकासाठी घेतलेले कर्ज फेडणार कसे या चिंतेने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

तालुक्यातील देवघर ,बुधावली, गुंज,काटी, सारसी, या गावातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी ८०० एकर शेतजमीनीत टोमॅटोची शेती केली असून त्यात पीकही चांगल्याप्रकारे आले आहे. जेव्हा केव्हा नवी मुंबई येथील वाशी मार्केर्ट चालू असेल तेव्हाच फक्त दोन ते तीन व्यापारी येथे टोमॅटो खरेदीसाठी येतात ते पण सर्वच शेतकऱ्यांचा माल उचलत नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो घेतात तोपण काटीमोल भावाने एक नंबरचा टोमॅटो 3 रूपये किलो दराने तर दोन नंबरचा टोमॅटो 2 रूपये दराने व तीन नंबरचा टोमॅटो फेकून दिला जातो. त्यामुळे अशा मातीमोल दराने विक्री झाली आणि बाकीचे टोमॅटो शेतातच सडू लागली आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतीचा यशस्वी पयोग करूनही आजच्या घडीला शेतकरी अडचणीत सापडत आहे.

वाड्यातील शेतकऱ्यांना भातपीकाला पर्याय म्हणून टोमॅटोची उत्तम प्रकारे शेती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकीक कायम राखला आहे. मात्र या वर्षीही उत्पादन चांगले आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उत्पादन अडचणीत सापडले आहे. त्यामुळे टोमॅटोची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वत्र ताळेबंदी सुरू आहे. त्यामुळे शेतात पिकलेला टोमॅटो विकला जात नसल्याने तो शेतातच सडू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतीसाठी घेतलेले सोसायटीचे रब्बी कर्ज फेडणार कसे या चिंतेत येथील शेतकरी सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी  सरकारची मदत मिळावी अन्यथा यातून बाहेर पडणे कठीण.

- किशोर पाटीलटोमॅटो उत्पादक शेतकरी-देवघर

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेवण मागवणं पडलं महागात, बसला तब्बल 50 हजारांचा फटका

Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला

Coronavirus : चिंताजनक! दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३५२ वर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीagricultureशेती