शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

coronavirus: नालासोपारा डेपोमध्ये गावी जाणाऱ्यांची गर्दी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 02:46 IST

सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला.

नालासोपारा : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी राज्य सरकार एसटीमार्फत सोय करणार असल्याची बातमी सर्वत्र वाºयासारखी पसरल्यानंतर नालासोपारा पश्चिमेकडील बस डेपोमध्ये चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच लोक या ठिकाणी जमू लागले होते. हळूहळू गर्दी वाढून शेकडो लोक जमा झाले. मात्र गाडी सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नालासोपारा पोलीस एसटी डेपोमध्ये पोहचले आणि त्यांनी सर्वांना समजावून घरी पाठवले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या ४८ दिवसांपासून देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तेव्हापासून अनेक मजूर, कामगार, चाकरमानी अडकून पडले आहेते. कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जाणारे चाकरमानी गावाला जाण्यासाठी प्रयत्न करत होते, पण लॉकडाऊनमुळे आणि पोलीस प्रशासन दाखल करत असलेल्या गुन्ह्यांमुळे नागरिक हतबल झाले आहेत. त्याच वेळी परिवहन मंत्र्यांनी एसटी सोडण्याची घोषणा केल्यामुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या चाकरमान्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातूनच हे लोक नालासोपारा एसटी स्थानकात जमा झाले.लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले गंभीर प्रश्न उपस्थित करत, लोकांनी आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला. मात्र पोलिसांनी त्यांना सर्वांना समजावून घरी जाण्यास सांगितले. पोलिसांनी प्रसंगावधान राखल्यामुळे येथे कोणतीही गडबड झाली नाही.आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, येथे आता असह्य होत आहे, असे काही चाकरमानी डेपो कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना सांगत होते. परप्रांतीय लोकांना मोफत त्यांच्या गावी पाठवण्यात आले, परदेशांतून श्रीमंत लोकांना मायदेशात आणले. सरकारने राज्यातील लोकांना एसटीने सोडू असे सांगितले, परंतु त्यासाठी भरपूर अटी घातल्या आहेत. एवढ्या अटी का, असा सवाल लोकांनी केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार