शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

coronavirus : आम्ही काय आतंकवादी आहोत काय?; 'त्या' कामगारांचा मोदींना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 18:17 IST

आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

पालघर/बोर्डी:- ना वेळेवर जेवण, ना आरोग्याची तपासणी, ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क फक्त आपापल्या ट्रॉलर्समध्ये ठेवलेल्या फर्स्ट एडच्या डब्यातील औषधांवर जिल्ह्यातील हजारो खलाशी कामगार कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराशी वेरावल येथे सामना करीत आहेत. आम्हाला अशी क्रूर वागणूक देताना आम्ही काय आतंकवादी आहोत काय?, असा थेट सवाल या कामगाराांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.पालघर जिल्ह्यातून पोरबंदर, वेरावल येथील मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर खलाशी कामगार म्हणून काम करणाऱ्या सुमारे 1 हजार 800 कामगारांना 4 एप्रिल रोजी झाई-बोर्डीजवळील नारगोल बंदरात उतरविण्यात आले होते. यापैकी 1122 कामगारांना गुजरात सरकारने तर अन्य 100 ते 150 कामगारांना दमण-सिल्वासा प्रशासनाने स्वीकारले होते.उर्वरित पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोर्डी, चिखला, तलासरी आदी भागातील 700 कामगारांना महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनाला त्यांना स्वीकारण्याचे कुठलेही लेखी आदेश न दिल्याने त्या कामगारांना गुजरात पोलिसांनी जबरदस्तीने पुन्हा पोरबंदर, वेरावलच्या दिशेने पळवून लावले, या कामगारांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे ह्यांच्याकडे आम्हाला जिल्ह्यात प्रवेश द्या, अशी मोबाईलवरून मनधरणी केल्यानंतर ही राज्यशासन, पालकमंत्र्यांकडून कुठलेही आदेश न मिळाल्याने जिल्हाधिकारी हतबल ठरले होते. गुजरात सरकार, चेन्नईचे सरकार आपल्या राज्यातील कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील असताना आमचे मायबाप महाराष्ट्र सरकार मात्र आमच्याकडे ढुंकूनही बघत नसल्याची नकारात्मक, उद्रेकाची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस