शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 03:53 IST

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध तुरुंगांत असलेल्या कैद्यांना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आले असून एकूण ११ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथे दिली.

पालघर येथील गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या घटनेच्या आढावाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यातील अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्यातील विविध तुरुंगांपैकी आठ तुरुंगांमध्ये लॉकडाऊन काळात विशेष व्यवस्था केली आहे. या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. तसेच सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या अन्य ५ हजार ५०० अशा एकूण ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगांतील अकरा हजार कैद्यांची संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले. मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या एका स्वयंपाकीला लागण झाली. त्याच्या संसर्गाने ७२ कैद्यांना लागण झाल्याचा अहवाल आल्याने राज्यातील आठ तुरुंगांत कुणालाही भेटण्यासाठी आत सोडले जात नाही, तसेच कुठल्याही कैद्याला तुरुंगाच्या बाहेर सोडले जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात साडेतीन कोटींचा दंड वसूलराज्यात २ लाख २४ हजार २२९ रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले असून ४४९ क्वारंटाइन रुग्ण पळून गेले आहेत. त्यांच्यावर आणि भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केलेल्या अन्य ९६ हजार २३१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या ५३ हजार ३३० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPrisonतुरुंग