शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 03:53 IST

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध तुरुंगांत असलेल्या कैद्यांना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आले असून एकूण ११ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथे दिली.

पालघर येथील गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या घटनेच्या आढावाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यातील अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्यातील विविध तुरुंगांपैकी आठ तुरुंगांमध्ये लॉकडाऊन काळात विशेष व्यवस्था केली आहे. या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. तसेच सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या अन्य ५ हजार ५०० अशा एकूण ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगांतील अकरा हजार कैद्यांची संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले. मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या एका स्वयंपाकीला लागण झाली. त्याच्या संसर्गाने ७२ कैद्यांना लागण झाल्याचा अहवाल आल्याने राज्यातील आठ तुरुंगांत कुणालाही भेटण्यासाठी आत सोडले जात नाही, तसेच कुठल्याही कैद्याला तुरुंगाच्या बाहेर सोडले जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात साडेतीन कोटींचा दंड वसूलराज्यात २ लाख २४ हजार २२९ रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले असून ४४९ क्वारंटाइन रुग्ण पळून गेले आहेत. त्यांच्यावर आणि भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केलेल्या अन्य ९६ हजार २३१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या ५३ हजार ३३० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPrisonतुरुंग