शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:34 IST

पारंपरिक व्यवसाय : कामगारांसोबत उद्योजक संकटात; तीन महिने उत्पादन बंद

आशीष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : जगभर व देशभरात सध्या कोरोनाचे संकट असताना त्याचा फटका वसईतील मीठ कामगार व उत्पादकांनाही बसला आहे. ऐतिहासिक वसईचा पारंपरिक व्यवसाय म्हणून गणला जाणाऱ्या मिठाचे उत्पादन मागील तीन महिने सलग बंद राहिल्याने यंदा केवळ २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे वसईतील मीठ उत्पादकांनी सांगितले.खाºया मिठाची पावसाळ्यानंतर विक्रीच होणार नसल्याने मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून येथील पापडी उमेळमान येथील खाडी किनारी ढिगारे करून त्याला गवताने झाकण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सफाळे, माकूनसार, माहीम, वसई पूर्व व पश्चिम आदी खाडी व किनारपट्टीचा ग्रामीण व शहरी भाग मिठागरांसाठी ओळखला जातो़. शेती व मासेमारीप्रमाणे वसईतही अनेक वर्षांपासून पारंपरिक मीठ उत्पादनाचा व्यवसाय केला जातो.पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्ट्यात १५ ते १८ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा ही राज्य सरकारची तर निम्मी जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले अनेक स्थानिक भूमिपुत्र येथे मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधील १५७५ एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात हे काम केले जाते.यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन असल्याने तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असून यंदा मिठाचे सर्वात कमी असे २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे वसईतील उमेळमान ग्रामस्थ तथा अध्यक्ष मदन किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी विविध ठिकाणांहून मजूर येत असतात. त्यांच्या साथीने मिठागरात पाणी, मीठ खेचणे, योग्य ती मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे मिठागरात काम करणारे कामगार मार्चपासूनच निघून गेले होते. त्यामुळे वसई-विरारमधील मिठागरे ओस पडली होती.मिठावरील खर्च वाया; व्यापारी - मजुरांचे मोठे नुकसानमार्च महिन्यापासून मिठाचे उत्पादन घेणे बंद झाले होते. वसईत तयार झालेले मीठ उचलण्यास एप्रिलपासून सुरुवात करून त्याच्या राशी तयार केल्या जातात. मे महिन्यात पावसाळ्याच्या आधी या मिठाच्या ढिगाऱ्यांवर गवत आच्छादले जाते. आॅक्टोबर महिन्यात हेच मीठ गोणीत भरून व्यापाºयांपर्यंत पोहोचविले जाते. या २५ टक्के मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी सध्या मिठाच्या ढिगाºयांना गवताने संरक्षित केले जात आहे.वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु, त्यांना १ रुपया १० पैशांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो. परंतु, व्यापाºयांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. आधीच मिठाला भाव कमी, त्यात कोरोनाचे संकट यामुळे मिठावर केलेला खर्च यंदा पूर्णपणे वाया गेला आहे.