शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:34 IST

पारंपरिक व्यवसाय : कामगारांसोबत उद्योजक संकटात; तीन महिने उत्पादन बंद

आशीष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : जगभर व देशभरात सध्या कोरोनाचे संकट असताना त्याचा फटका वसईतील मीठ कामगार व उत्पादकांनाही बसला आहे. ऐतिहासिक वसईचा पारंपरिक व्यवसाय म्हणून गणला जाणाऱ्या मिठाचे उत्पादन मागील तीन महिने सलग बंद राहिल्याने यंदा केवळ २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे वसईतील मीठ उत्पादकांनी सांगितले.खाºया मिठाची पावसाळ्यानंतर विक्रीच होणार नसल्याने मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून येथील पापडी उमेळमान येथील खाडी किनारी ढिगारे करून त्याला गवताने झाकण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सफाळे, माकूनसार, माहीम, वसई पूर्व व पश्चिम आदी खाडी व किनारपट्टीचा ग्रामीण व शहरी भाग मिठागरांसाठी ओळखला जातो़. शेती व मासेमारीप्रमाणे वसईतही अनेक वर्षांपासून पारंपरिक मीठ उत्पादनाचा व्यवसाय केला जातो.पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्ट्यात १५ ते १८ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा ही राज्य सरकारची तर निम्मी जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले अनेक स्थानिक भूमिपुत्र येथे मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधील १५७५ एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात हे काम केले जाते.यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन असल्याने तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असून यंदा मिठाचे सर्वात कमी असे २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे वसईतील उमेळमान ग्रामस्थ तथा अध्यक्ष मदन किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी विविध ठिकाणांहून मजूर येत असतात. त्यांच्या साथीने मिठागरात पाणी, मीठ खेचणे, योग्य ती मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे मिठागरात काम करणारे कामगार मार्चपासूनच निघून गेले होते. त्यामुळे वसई-विरारमधील मिठागरे ओस पडली होती.मिठावरील खर्च वाया; व्यापारी - मजुरांचे मोठे नुकसानमार्च महिन्यापासून मिठाचे उत्पादन घेणे बंद झाले होते. वसईत तयार झालेले मीठ उचलण्यास एप्रिलपासून सुरुवात करून त्याच्या राशी तयार केल्या जातात. मे महिन्यात पावसाळ्याच्या आधी या मिठाच्या ढिगाऱ्यांवर गवत आच्छादले जाते. आॅक्टोबर महिन्यात हेच मीठ गोणीत भरून व्यापाºयांपर्यंत पोहोचविले जाते. या २५ टक्के मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी सध्या मिठाच्या ढिगाºयांना गवताने संरक्षित केले जात आहे.वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु, त्यांना १ रुपया १० पैशांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो. परंतु, व्यापाºयांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. आधीच मिठाला भाव कमी, त्यात कोरोनाचे संकट यामुळे मिठावर केलेला खर्च यंदा पूर्णपणे वाया गेला आहे.