शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

वसईतील मीठ व्यवसायालाही भेडसावते कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:34 IST

पारंपरिक व्यवसाय : कामगारांसोबत उद्योजक संकटात; तीन महिने उत्पादन बंद

आशीष राणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसई : जगभर व देशभरात सध्या कोरोनाचे संकट असताना त्याचा फटका वसईतील मीठ कामगार व उत्पादकांनाही बसला आहे. ऐतिहासिक वसईचा पारंपरिक व्यवसाय म्हणून गणला जाणाऱ्या मिठाचे उत्पादन मागील तीन महिने सलग बंद राहिल्याने यंदा केवळ २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे वसईतील मीठ उत्पादकांनी सांगितले.खाºया मिठाची पावसाळ्यानंतर विक्रीच होणार नसल्याने मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून येथील पापडी उमेळमान येथील खाडी किनारी ढिगारे करून त्याला गवताने झाकण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सफाळे, माकूनसार, माहीम, वसई पूर्व व पश्चिम आदी खाडी व किनारपट्टीचा ग्रामीण व शहरी भाग मिठागरांसाठी ओळखला जातो़. शेती व मासेमारीप्रमाणे वसईतही अनेक वर्षांपासून पारंपरिक मीठ उत्पादनाचा व्यवसाय केला जातो.पालघर जिल्ह्यातील वसई-डहाणू या पट्ट्यात १५ ते १८ हजार एकरांवर मिठाचे उत्पादन होते. यातील निम्मी जागा ही राज्य सरकारची तर निम्मी जागा केंद्र सरकारच्या मालकीची आहे. वसईतले अनेक स्थानिक भूमिपुत्र येथे मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. वसई-विरारमधील १५७५ एकर जागेवर मीठ उत्पादन घेतले जाते. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यात हे काम केले जाते.यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच लॉकडाउन असल्याने तयार झालेले मीठ उचलण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असून यंदा मिठाचे सर्वात कमी असे २२ ते २५ टक्केच उत्पादन झाल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे वसईतील उमेळमान ग्रामस्थ तथा अध्यक्ष मदन किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मिठागरात काम करण्यासाठी दरवर्षी विविध ठिकाणांहून मजूर येत असतात. त्यांच्या साथीने मिठागरात पाणी, मीठ खेचणे, योग्य ती मशागत करणे, तयार झालेले मीठ उचलणे अशी कामे केली जातात. मात्र या वर्षी कोरोनामुळे मिठागरात काम करणारे कामगार मार्चपासूनच निघून गेले होते. त्यामुळे वसई-विरारमधील मिठागरे ओस पडली होती.मिठावरील खर्च वाया; व्यापारी - मजुरांचे मोठे नुकसानमार्च महिन्यापासून मिठाचे उत्पादन घेणे बंद झाले होते. वसईत तयार झालेले मीठ उचलण्यास एप्रिलपासून सुरुवात करून त्याच्या राशी तयार केल्या जातात. मे महिन्यात पावसाळ्याच्या आधी या मिठाच्या ढिगाऱ्यांवर गवत आच्छादले जाते. आॅक्टोबर महिन्यात हेच मीठ गोणीत भरून व्यापाºयांपर्यंत पोहोचविले जाते. या २५ टक्के मिठाचे पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी सध्या मिठाच्या ढिगाºयांना गवताने संरक्षित केले जात आहे.वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु, त्यांना १ रुपया १० पैशांनी मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो. परंतु, व्यापाºयांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते. आधीच मिठाला भाव कमी, त्यात कोरोनाचे संकट यामुळे मिठावर केलेला खर्च यंदा पूर्णपणे वाया गेला आहे.