शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पोस्टात ठणाणा; एटीएम कोरडी, सर्वत्र बोंबाबोंब!

By admin | Updated: November 12, 2016 06:23 IST

शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती

शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती. सराफांनी जुन्या नोटा घेऊन अव्वाच्या सव्वा दराने सोने विक्री केल्याने त्यांची चांदी झाली. परंतु रोजंदारी आणि आठवडी तत्वावर ज्यांना मजुरी अथवा पगार दिला जातो व ज्यांचे पोट हातावर असते त्यांचा खिसा मात्र कोरडाच राहिला. आता आठवडाभर खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. रांगेत उभे असलेल्यांपैकी निम्म्याच व्यक्तींना पैसे मिळाल्याने बाकीच्यांवर दिवसही फुकट गेला आणि पैसेही मिळाले नाहीत म्हणून जळफळाट करण्याची वेळ आली. बाजारपेठात सर्वत्र शुकशुकाटच होता. असेच चित्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात होते.शशी करपे, वसईवसई विरार नालासोपाऱ्यात नव्या नोटा मिळवण्यासाठी दुसऱ्यादिवशीही सकाळपासूनची ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी बंद असलेली एटीएम दुपारी सुरु होती. येथील पोस्टात दुसऱ्या दिवशीही रक्कम दिली गेली नाही. जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिका कार्यालयांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी रांगा लागल्या. सायंकाळी ६.३० पर्यंत ४ कोटींहून अधिक घरपट्टी केवळ शुक्रवारी जमा झाली होती. पेट्रोलपंपांवर मात्र ग्राहकांची अडवणूक होत होती. पहाटेपासूनच बँकांच्या दाराजवळ नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. विरार आणि वसईमधील अनेक बँकांमधील रोकड दुपारी दोन वाजता संपल्याने लोक ताटकळत उभे होते. तालुक्यातील बहुतेक एटीएम मशीन्स आजही बंद होत्या. काही एटीएम मशीन दुपारपासून सुुरु करण्यात आल्या होत्या. सर्वसामान्यांचा पगार दहा तारखेपर्यंत होतो. हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही १० तारखेलाच पगार किंवा खर्ची दिली जाते. त्यानंतर विज बिल, वाण्याचे बिल, घराचे मेटेंनन्स, दुधवाला, पेपरवाला,लाँन्ड्रीवाला,मोलकरीण,यांची बिले वा पगार चुकता केला जातो. मात्र ही बिले चुकते करण्यासाठी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. ८ तारखेला मध्यरात्रीपासून मोदी सरकारने पाचशेच्या आणि हजाराच्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यामुळे ९ तारखेपासून कोणीही या नोटा घेण्याचे कटाक्षाने टाळले. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका सुरवातीला मात्र, सर्वसामान्यांनाच बसू लागला आहे.पगारातून आलेल्या पाचशेच्या किंवा हजाराच्या नोटा सर्वांची देणी फेडण्यासाठी सोप्या ठरतात.याच नोटावर बंदी घातल्यामुळे कोणाचीही देणी न फेडता, त्या बदलून स्वखर्चासाठी शंभराच्या नोटा घेण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून किंवा आॅफिसला दांडी मारून रांगा लावण्यासाठी पाळी हजारो लोकांवर आली आहे. त्यातच महावितरणाने पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विजेचे बिले हजारो ग्राहकांना मुदतील भरता आले नाही. महापालिकेनेही हीच नकार घंटा काल वाजवल्यामुळे मालमत्ता कर न भरताच नागरिकांना परतावे लागत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महावितरणला जुन्या नोटा घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वसईतील वीज बिल भरणा केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. महापालिकेनेही शुक्रवारी जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी एका दिवसात दुपारपर्यंत करापोटी पालिकेच्या तिजोरीत तीन कोटीहून अधिक रुपये जमा झाले होते. दरम्यान, सुट्टेच नसल्यामुळे दैनंदीन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची मोठी अडचण नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. तर याच कारणास्तव ग्राहक फिरकत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची दुकानेही ओस पडली आहेत. बंदी घातलेल्या नोटा वापरून सोने खरेदी करण्याची शक्कल लढवण्यात आल्यामुळे सराफांनी सोन्याच्या किंमतीत वाढ करून संधी साधली. तर सुट्टे नसल्याचे कारण देवून पेट्रोलपंप चालकांनी किमान पाचशेचे पेट्रोल भरण्याची सक्ती केली.