शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

By admin | Updated: March 24, 2017 00:55 IST

विक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम

हितेन नाईक / पालघरविक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक ठेके एका कंत्राटदाराने मंजूर करवून घेतले असून त्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर चालढकल करीत आहेत.केव गावातील सर्व्हे नंबर २५७ हि जमीन विकास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असून पूर्णत: बागायती क्षेत्र आहे.मात्र ह्या क्षेत्रामध्ये डांबर प्लँट असल्याचे खोटे पुरावे सादर करून नाशिकच्या आर के सावंत यांनी अनेक ठेके मिळविले आहेत. केव, शिळशेत, नालशेत, ह्या ग्रुप ग्रामपंचयातींनीही आमच्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा डांबर प्लॅन्ट अस्तित्वात नसल्याचा दाखल दिला आहे. या बेकायदेशीर कंत्राटात जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील यांत्रिकी विभागाचे काही अधिकारी सामील आहेत. ह्या खोट्या बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन आजही अनेक ठेके मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.या प्रकरणात पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांनी २ जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात विक्रमगड (आलोंडे) येथील मे. हार्दिक कन्स्ट्रक्शनने केलेल्या तक्र ारींचा उल्लेख करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर व जव्हार यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची कंत्राटे मिळविल्याचे नमूद करून. या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मिळविलेल्या ठेक्यांची चौकशी करण्याचे पालक मंत्र्यांनी सुचविले आहे. तरीही कार्यकारी अभियंत्यांनी कारवाई केलेली नाही.सार्वजनिक विभागाच्या हलगर्जी मुळे जव्हार विभागात येणाऱ्या विक्रमगड आणि इतर तालुक्यातील जवळपास ५५ विकासकामे मान्यते अभावी रखडली असून बोगस कागदपत्रे दाखवून या निविदा भरण्यात आल्या आहेत. आर के सावंत (नाशिक) या नावाने वेगळ्याच ठेकेदारांनी कामे मिळवली असून निविदाहि मंजूर झाल्या आहेत. परंतु या निविदांसोबतची कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असतांनाही दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला कंत्राट देणे क्रमप्राप्त असताना अजूनही तो देण्यात आलेला नाही.किंवा फेर निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार असल्याने कामे तातडीने सुरु करणे गरजेचे असतांनाही ती सुरु केली जात नाहीत. बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यालाच ठेका देण्याचा अट्टाहास सां.बां.चे काही अधिकारी करीत असल्याचे दिसून येते.