शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

बोगस कागदपत्रांच्या आधारे ठेके

By admin | Updated: March 24, 2017 00:55 IST

विक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम

हितेन नाईक / पालघरविक्रमगड तालुक्यातील केव येथील सर्व्हे नंबर २५७ ह्या बागायती क्षेत्रात डांबर प्लँट असल्याचे खोटे कागदपत्र सादर करु न सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक ठेके एका कंत्राटदाराने मंजूर करवून घेतले असून त्या ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल वसईकर चालढकल करीत आहेत.केव गावातील सर्व्हे नंबर २५७ हि जमीन विकास पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर असून पूर्णत: बागायती क्षेत्र आहे.मात्र ह्या क्षेत्रामध्ये डांबर प्लँट असल्याचे खोटे पुरावे सादर करून नाशिकच्या आर के सावंत यांनी अनेक ठेके मिळविले आहेत. केव, शिळशेत, नालशेत, ह्या ग्रुप ग्रामपंचयातींनीही आमच्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा डांबर प्लॅन्ट अस्तित्वात नसल्याचा दाखल दिला आहे. या बेकायदेशीर कंत्राटात जव्हारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील यांत्रिकी विभागाचे काही अधिकारी सामील आहेत. ह्या खोट्या बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन आजही अनेक ठेके मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे.या प्रकरणात पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांनी २ जानेवारी २०१७ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला लिहिलेल्या पत्रात विक्रमगड (आलोंडे) येथील मे. हार्दिक कन्स्ट्रक्शनने केलेल्या तक्र ारींचा उल्लेख करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर व जव्हार यांच्याकडून कोट्यवधी रु पयांची कंत्राटे मिळविल्याचे नमूद करून. या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागा कडून मिळविलेल्या ठेक्यांची चौकशी करण्याचे पालक मंत्र्यांनी सुचविले आहे. तरीही कार्यकारी अभियंत्यांनी कारवाई केलेली नाही.सार्वजनिक विभागाच्या हलगर्जी मुळे जव्हार विभागात येणाऱ्या विक्रमगड आणि इतर तालुक्यातील जवळपास ५५ विकासकामे मान्यते अभावी रखडली असून बोगस कागदपत्रे दाखवून या निविदा भरण्यात आल्या आहेत. आर के सावंत (नाशिक) या नावाने वेगळ्याच ठेकेदारांनी कामे मिळवली असून निविदाहि मंजूर झाल्या आहेत. परंतु या निविदांसोबतची कागदपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले असतांनाही दुसऱ्या क्रमांकाच्या ठेकेदाराला कंत्राट देणे क्रमप्राप्त असताना अजूनही तो देण्यात आलेला नाही.किंवा फेर निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार असल्याने कामे तातडीने सुरु करणे गरजेचे असतांनाही ती सुरु केली जात नाहीत. बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यालाच ठेका देण्याचा अट्टाहास सां.बां.चे काही अधिकारी करीत असल्याचे दिसून येते.