शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मीरा भाईंदर : अखेर टेंबा रुग्णालयाचा करारनामा झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 20:28 IST

मीरा भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा) शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी करारनाम्याचा सोपस्कार तब्बल दीड वर्षांनी उरकण्यात आला

मीरा रोड - मीरा भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा) शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी करारनाम्याचा सोपस्कार तब्बल दीड वर्षांनी उरकण्यात आला. कागदोपत्री रुग्णालय शासनाकडे वर्ग झाले असले तरी डॉक्टर, कर्मचारी आदींचा वर्षभर पगार तसेच देखभालीचा खर्च पालिकेलाच करावा लागणार आहे. ४ शस्त्रक्रिया गृहांसह अतिदक्षता विभाग आदी बांधून देणं अजूनही बाकीच आहे. त्यामुळे रुग्णालय शासनाकडून पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी किती महिने लागतील हे अनिश्चित आहे. तर पालिकेला दरम्यानच्या काळात रुग्णालय चालवण्यासाठी काही कोटींचा खर्च सोसावा लागणार आहे. 

शासनाच्या टेंबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेत २०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी २००६ साली तत्कालिन जनता दल नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्या नंतर वेळकाढुपणा करत का होईना सत्ताधारी व प्रशासनाला रुग्णालय उभारुन नावासाठी तरी सुरू करावे लागले.न्यालयाच्या धास्तीने शस्त्रक्रिया गृहासह अनेक महत्त्वाच्या बाबी नसताना देखील सत्ताधारी भाजपा युती व प्रशासनाने जानेवारी २०१६ मध्ये मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन उरकले. मात्र शस्त्रक्रियागृहापासून आवश्यक डॉक्टर आदी नसताना देखील सुरु केलेल्या रुग्णालयामुळे गंभीर वा चिंताजनक अवस्थेतील रुग्णांचे जीवघेणे हाल झाले. यातून काही रुग्णांना जीव गमवावा लागला .३० नोव्हेंबर २०१६ रोजी शासनाने आदेश काढुन रुग्णालय हस्तांतरणाचा निर्णय घेतला. रुग्णालयासाठी २५ कोटींची तरतुद शासनाने केल्याचे सांगीतले गेले. मात्र जमिनीसह रुग्णालय इमारत, आतील सर्व यंत्र साहित्य आदी पालिकेने विनामूल्य हस्तांतरीत करायचे ठरले होते. करारनाम्यातील अटिशर्तिंच्या खेळात दीड वर्ष वायफळ गेले. पदनिर्मितीस मान्यता मिळून भरती होत नाही तो पर्यंत रुग्णालय पालिकेने चालवावे या अटीने रखडलेला करारनामा अखेर शासनाने भरतीची जाहिरात काढल्याने मार्गी लागला.२४ मे रोजी आरोग्य विभागाच्या उपसंचालक रत्ना रावखंडे व पालिका उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यात भार्इंदर येथील नोंदणी कार्यालयात करार करण्यात आलाय. महसुल नोंदी शासनाचे नाव नोंदवले जाणार आहे. रुग्णालयातील ४४ पैकी ३६ डॉक्टर, कर्मचारी आदिंनी शासन सेवेत वर्ग होण्यास मान्यता दिली आहे. पण वर्षभराचा पगार पालिकेलाच द्यावा लागणार आहे. शिवाय रुग्णालयातले हाउस किपींग , लॉण्ड्री , सिक्युरीटी , औषधं , वीज बील , स्टेशनरी आदी सर्व खर्च सुध्दा पालिकेला करायचा आहे.या सोबतच रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर ४ शस्त्रक्रिया गृह , दक्षता व अतिदक्षता विभाग उभारण्याचा खर्च पालिकेलाच करायचा आहे. उपकरणां पासून अन्य खर्च सुद्ध पालिकेलाच सोसावा लागगणार आहे. आधीच कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारलेल्या या २०० खाटांच्या रुग्णालयात केवळ बाह्यरुग्ण विभाग, प्रसुती व प्राथमिक उपचार तसेच किरकोळ शस्त्रक्रिया आदी नाममात्र वैद्यकिय सुविधा मिळत आहेत. उपचारा अभावी रुग्णांच्या मृत्यूचे प्रसंग घडले आहेत. एकंदर चांगल्या व माफक वैद्यकिय सेवेपासून शहरातील सर्वसामान्य नागरिक मात्र वंचितच आहेत.