शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसचा स्वत:च्या पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:14 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत

अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत असताना महाराष्टÑात मात्र काँग्रेसने आपल्या पायावर स्वत:च्या हाताने धोंडा पाडून घेतला आहे. देशभर इतरत्र झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले. तसे करणे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शक्य असतानाही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शक्ती नसताना पक्षाचा उमेदवार देऊन नामुष्की ओढवून घेतली आहे.पालघरची जागा भाजपाने जिंकली पण काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेण्यात घातलेल्या घोळामुळे ही वेळ आली आहे. पालघर पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्या, असे म्हणत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटले. दया याचना केली मात्र तुम्ही निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही दामोदर शिंगडा यांनाच उमेदवारी देऊ असा आग्रह काही नेत्यांनी धरला. आता परिस्थिती बदलली आहे, शिंगडा निवडून येणार नाहीत, असे सांगूनही राजेंद्र गावित यांचे ऐकले नाही. गावित भाजपाकडे गेल्यानंतर त्यांना तिकीट नाकारणाऱ्यांनी; आमचा उमेदवार पळवला, भाजपाकडे उमेदवार नाहीत, त्यांना उमेदवार आयात करावे लागतात, अशी हाकाटी सुरु केली.उमेदवार अंतिम करण्याच्या काळात; आपण बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन टाकू असा प्रस्ताव राष्टÑवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र तो ही काँग्रेसने नाकारला. ती सल निकालानंतर काँग्रेस लेना बँक आहे, देना बँक नाही... अशा शब्दातबहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी बोलून दाखवली. जर बहुजन विकास आघाडीला दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर काँग्रेसची ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ राहीली असती. मात्र निवडणूक लढवून, आपल्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होणे व पक्ष चौथ्या नंबरवर जाणे यामुळे प्रदेश काँग्रेसच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाने देशभरात भाजपाला जोरदार धक्का दिला. भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री व अन्य अनेक मंत्री विदर्भात आहेत, ज्या ठिकाणी संघाचे मुख्यालय आहे, त्या विदर्भात; भंडारा-गोंदियात भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसच्या ‘स्वमग्न’ नेत्यांनी मात्र हात दाखवून अवलक्षण करुन घेतले. एवढे चांगले वातावरण सरकारविरोधी असताना, पालघरमध्येआपल्याला यश मिळणार नाही हे कळत असतानाही आमच्या नेत्यांनी केलेल्या कृतीचा फटका राज्यभर बसू शकेल, याचेही भान आमच्या नेत्यांना राहीले नाही, अशा शब्दातअनेकांनी भावनांना वाट करुन दिली. 

टॅग्स :palgharपालघरPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस