शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

काँग्रेसचा स्वत:च्या पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:14 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत

अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत असताना महाराष्टÑात मात्र काँग्रेसने आपल्या पायावर स्वत:च्या हाताने धोंडा पाडून घेतला आहे. देशभर इतरत्र झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले. तसे करणे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शक्य असतानाही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शक्ती नसताना पक्षाचा उमेदवार देऊन नामुष्की ओढवून घेतली आहे.पालघरची जागा भाजपाने जिंकली पण काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेण्यात घातलेल्या घोळामुळे ही वेळ आली आहे. पालघर पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्या, असे म्हणत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटले. दया याचना केली मात्र तुम्ही निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही दामोदर शिंगडा यांनाच उमेदवारी देऊ असा आग्रह काही नेत्यांनी धरला. आता परिस्थिती बदलली आहे, शिंगडा निवडून येणार नाहीत, असे सांगूनही राजेंद्र गावित यांचे ऐकले नाही. गावित भाजपाकडे गेल्यानंतर त्यांना तिकीट नाकारणाऱ्यांनी; आमचा उमेदवार पळवला, भाजपाकडे उमेदवार नाहीत, त्यांना उमेदवार आयात करावे लागतात, अशी हाकाटी सुरु केली.उमेदवार अंतिम करण्याच्या काळात; आपण बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन टाकू असा प्रस्ताव राष्टÑवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र तो ही काँग्रेसने नाकारला. ती सल निकालानंतर काँग्रेस लेना बँक आहे, देना बँक नाही... अशा शब्दातबहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी बोलून दाखवली. जर बहुजन विकास आघाडीला दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर काँग्रेसची ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ राहीली असती. मात्र निवडणूक लढवून, आपल्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होणे व पक्ष चौथ्या नंबरवर जाणे यामुळे प्रदेश काँग्रेसच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाने देशभरात भाजपाला जोरदार धक्का दिला. भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री व अन्य अनेक मंत्री विदर्भात आहेत, ज्या ठिकाणी संघाचे मुख्यालय आहे, त्या विदर्भात; भंडारा-गोंदियात भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसच्या ‘स्वमग्न’ नेत्यांनी मात्र हात दाखवून अवलक्षण करुन घेतले. एवढे चांगले वातावरण सरकारविरोधी असताना, पालघरमध्येआपल्याला यश मिळणार नाही हे कळत असतानाही आमच्या नेत्यांनी केलेल्या कृतीचा फटका राज्यभर बसू शकेल, याचेही भान आमच्या नेत्यांना राहीले नाही, अशा शब्दातअनेकांनी भावनांना वाट करुन दिली. 

टॅग्स :palgharपालघरPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस