शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: July 9, 2015 23:34 IST

भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते

पालघर : भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते. मात्र चिक्की घोटाळा, बोगस पदव्या घोटाळा, व्यापम घोटाळा प्रकरणामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडला पडला असल्याची टीका माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी आज केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युती शासनाच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार व ज्वलंत समस्या उभ्या राहत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत असल्याने या सर्व समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासठी पालघर रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, मायकल फुटयार्डो, मोहन शर्मा, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, सुरेंद्र शेट्टी, पांडुरंग बेलकर, विश्वास पाटील, निलेश राऊत इ. मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्र्रकरणात मोठी वाढ होत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पीककर्जाचा पहिला हप्ता मे महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच आघाडी सरकारने बंद केलले लोडशेडींग युती सरकारने पुन्हा सुरू केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शासनाने या संदर्भात तत्काळ उपाययोजना आखाव्यात, आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर युती सरकारने पालघर जिल्ह्याला सोयीसुविधा पुरविण्यात चालढकल केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना संधी द्यावी, पालघरचा बिल्डरधार्जिणा प्रारुप विकास आराखडा रद्द करावा , तारापूर अणुशक्ती केंद्रातून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, आयटीआयमधून शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक सवलत पुन्हा सुरु करावी, सातपाटी, नवापूर, मुरबे, दांडी इ. खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी बंद करावे व त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, इ. मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)