शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पालघरमध्ये काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: July 9, 2015 23:34 IST

भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते

पालघर : भाजपा सरकारने सत्ता मिळविण्यासाठी मतदारांना अनेक खोटी आश्वासने देताना आपण भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ असे सांगितले होते. मात्र चिक्की घोटाळा, बोगस पदव्या घोटाळा, व्यापम घोटाळा प्रकरणामुळे भाजप सरकारचा खरा चेहरा सर्वांसमोर उघडला पडला असल्याची टीका माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांनी आज केली.पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युती शासनाच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचार व ज्वलंत समस्या उभ्या राहत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही वाढत असल्याने या सर्व समस्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासठी पालघर रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत, मायकल फुटयार्डो, मोहन शर्मा, केदार काळे, जिल्हाध्यक्ष मनिष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, सुरेंद्र शेट्टी, पांडुरंग बेलकर, विश्वास पाटील, निलेश राऊत इ. मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्र्रकरणात मोठी वाढ होत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना पीककर्जाचा पहिला हप्ता मे महिन्यात मिळणे अपेक्षित असताना तो अजूनही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. तसेच आघाडी सरकारने बंद केलले लोडशेडींग युती सरकारने पुन्हा सुरू केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शासनाने या संदर्भात तत्काळ उपाययोजना आखाव्यात, आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर युती सरकारने पालघर जिल्ह्याला सोयीसुविधा पुरविण्यात चालढकल केली आहे. नोकर भरतीत स्थानिकांना संधी द्यावी, पालघरचा बिल्डरधार्जिणा प्रारुप विकास आराखडा रद्द करावा , तारापूर अणुशक्ती केंद्रातून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, आयटीआयमधून शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणिक सवलत पुन्हा सुरु करावी, सातपाटी, नवापूर, मुरबे, दांडी इ. खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी बंद करावे व त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, इ. मागण्यांसाठी काढलेल्या या मोर्चात असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)