शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

मुंबई-पालघर मच्छिमारांत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:19 IST

मढच्या मच्छिमारांनी गुजरातपर्यंतच्या समुद्रात ठोकली कव : स्थानिक मच्छिमार संतप्त

पालघर : वसई, उत्तनसह मुंबईतील मढ भागातील कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी पालघर, डहाणू ते थेट गुजरात-दमणच्या समुद्रातील मासेमारी क्षेत्रात हजारो कवी (खुंटे) मारून अतिक्रमण केल्याने स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण बनले आहे. अनेक वर्षांपासूनच्या या प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्याने पालघर व गुजरात जिल्ह्यातील मच्छिमारांनी समुद्रात लढा उभारणारण्याचा निर्णय घेतला आहे.

समुद्रातही वसई-उत्तन विरुद्ध पालघर-डहाणू हा हद्दीचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून खदखदत असून अनेक चर्चा, निवेदने, मंत्र्यांच्या भेटी घेऊनही तो निकाली काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा वाद धुमसत रहात असून समुद्रात हाणामारीच्या घटना घडत आहेत.

या वादा संदर्भात २० जानेवारी १९८३ साली २८ मच्छीमार गावातील नेमलेल्या समितीची बैठक तत्कालीन आमदार मारुतीराव मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. प्रत्येक भागातील मच्छीमारांनी आपल्या गावा समोरील समुद्रात मासेमारी करावी असा ठराव मंजूर झाला होता. त्या अनुषंगाने तशी अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र वंशपरंपरागत पद्धतीने ठरवून दिलेल्या मासेमारी नियमांना डावलून वसई भागातील मच्छीमारांनी अन्य भागात अतिक्र मणे करायला सुरुवात केली. त्यामुळे समुद्रात संघर्ष घडू लागल्याने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी इकबाल सिंग चहल यांच्या दालनात १८ आॅक्टोबर १९९३ रोजी सर्व मच्छिमार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी मच्छिमारांनी आपल्या गावासमोरच कवी मारण्याचे आदेश दिले होते. पुन्हा सन २००४ मध्येही सातपाटीच्या पश्चिमेस ४२ नॉटिकलपर्यंत मारण्यात आलेल्या कवी काढण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते.

समुद्रात कोणी कुठे जाळी मारावी याबाबत कायदे, नसल्याचा फायदा उचलीत वसईतील फिलिप मस्तान व इतरांनी उच्चन्यायालायत याचिका दाखल करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळवली. त्याचा फायदा घेत वसई, अर्नाळा, उत्तन, मढ, गौराई आदी भागातील बोटींनी (बल्ल्याव) प्रत्येकी १८ ते २० कवी अशा २५ ते ३० हजार कवी मारल्या आहेत.

समुद्रात किनाऱयापासून ५० ते ६० नॉटिकल क्षेत्रा पर्यंतच मासेमारी केली जात असून या क्षेत्रात ओएनजीसी चे शेकडो प्लॅटफॉर्म असून त्याच्या चोहोबाजूने ८ ते १० किलोमीटर्सचा भाग हा प्रतिबंधित आहे. चुकून यात मच्छिमार बोटींनी प्रवेश केल्यास सुरक्षा रक्षकांकडून फायरिंग केली जाते. (अशा घटनेत एका मच्छिमाराचा गोळी लागून मृत्यूही झाला होता) या भागातील तीस सहकारी संस्थेची बैठक सातपाटी येथे रविवारी पार पडली. त्या आपापल्या गावासमोरील समुद्रात जाऊन इतर भागातील मच्छीमाराना रोखणार आहेत. त्यामुळे समुद्रात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आम्ही मच्छिमारी करायची तरी कुठे?युपीए सरकारच्या काळात शरद पवार कृषिमंत्री असताना यूपी चे राज्यपाल राम नाईक ह्यांनी त्यांना पत्र लिहून समुद्रातील ईईझेड क्षेत्रात वसई विरुद्ध पालघर-डहाणू संघर्षाबाबत पत्र लिहून तात्काळ कायदे बनविण्याची मागणी केली होती.मात्र त्यात युपीए सरकारला अपयश आले आता केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना आणि राम नाईकांच्या कानी अनेक वेळा हा मुद्दा घातला असताना त्यांना कायदे बनविण्यास का बरे अपयश येते? असा प्रश्न आहे.ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म तर दुसरीकडे उत्तन, वसई, मढ येथील मच्छीमारांच्या हजारो कवीनी मोठे क्षेत्र गिळंकृत केल्यामुळे मासेमारी साठी क्षेत्रच उरत नसल्याने मासे पकडण्यासाठी आमची जाळी मारायची कुठे? असा प्रश्न आहे.

समुद्रात चारही बाजूने कवींची खुंटे रोवल्याने एका वेळेस ८० पैकी २० जाळीही समुद्रात टाकता येत नसल्याने मासेच मिळत नसल्याने ट्रिप फुकट जात नुकसान सोसावे लागते.-विश्वास पाटील, क्रि याशील मच्छिमार

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार