शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

मुंबई-पालघर मच्छिमारांत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 23:19 IST

मढच्या मच्छिमारांनी गुजरातपर्यंतच्या समुद्रात ठोकली कव : स्थानिक मच्छिमार संतप्त

पालघर : वसई, उत्तनसह मुंबईतील मढ भागातील कव मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी पालघर, डहाणू ते थेट गुजरात-दमणच्या समुद्रातील मासेमारी क्षेत्रात हजारो कवी (खुंटे) मारून अतिक्रमण केल्याने स्थानिक मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण बनले आहे. अनेक वर्षांपासूनच्या या प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्याने पालघर व गुजरात जिल्ह्यातील मच्छिमारांनी समुद्रात लढा उभारणारण्याचा निर्णय घेतला आहे.

समुद्रातही वसई-उत्तन विरुद्ध पालघर-डहाणू हा हद्दीचा प्रश्न मागील ४० वर्षांपासून खदखदत असून अनेक चर्चा, निवेदने, मंत्र्यांच्या भेटी घेऊनही तो निकाली काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा वाद धुमसत रहात असून समुद्रात हाणामारीच्या घटना घडत आहेत.

या वादा संदर्भात २० जानेवारी १९८३ साली २८ मच्छीमार गावातील नेमलेल्या समितीची बैठक तत्कालीन आमदार मारुतीराव मेहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. प्रत्येक भागातील मच्छीमारांनी आपल्या गावा समोरील समुद्रात मासेमारी करावी असा ठराव मंजूर झाला होता. त्या अनुषंगाने तशी अंमलबजावणी करण्यात येत होती. मात्र वंशपरंपरागत पद्धतीने ठरवून दिलेल्या मासेमारी नियमांना डावलून वसई भागातील मच्छीमारांनी अन्य भागात अतिक्र मणे करायला सुरुवात केली. त्यामुळे समुद्रात संघर्ष घडू लागल्याने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी इकबाल सिंग चहल यांच्या दालनात १८ आॅक्टोबर १९९३ रोजी सर्व मच्छिमार प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत संघर्ष टाळण्यासाठी मच्छिमारांनी आपल्या गावासमोरच कवी मारण्याचे आदेश दिले होते. पुन्हा सन २००४ मध्येही सातपाटीच्या पश्चिमेस ४२ नॉटिकलपर्यंत मारण्यात आलेल्या कवी काढण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते.

समुद्रात कोणी कुठे जाळी मारावी याबाबत कायदे, नसल्याचा फायदा उचलीत वसईतील फिलिप मस्तान व इतरांनी उच्चन्यायालायत याचिका दाखल करून जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळवली. त्याचा फायदा घेत वसई, अर्नाळा, उत्तन, मढ, गौराई आदी भागातील बोटींनी (बल्ल्याव) प्रत्येकी १८ ते २० कवी अशा २५ ते ३० हजार कवी मारल्या आहेत.

समुद्रात किनाऱयापासून ५० ते ६० नॉटिकल क्षेत्रा पर्यंतच मासेमारी केली जात असून या क्षेत्रात ओएनजीसी चे शेकडो प्लॅटफॉर्म असून त्याच्या चोहोबाजूने ८ ते १० किलोमीटर्सचा भाग हा प्रतिबंधित आहे. चुकून यात मच्छिमार बोटींनी प्रवेश केल्यास सुरक्षा रक्षकांकडून फायरिंग केली जाते. (अशा घटनेत एका मच्छिमाराचा गोळी लागून मृत्यूही झाला होता) या भागातील तीस सहकारी संस्थेची बैठक सातपाटी येथे रविवारी पार पडली. त्या आपापल्या गावासमोरील समुद्रात जाऊन इतर भागातील मच्छीमाराना रोखणार आहेत. त्यामुळे समुद्रात मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आम्ही मच्छिमारी करायची तरी कुठे?युपीए सरकारच्या काळात शरद पवार कृषिमंत्री असताना यूपी चे राज्यपाल राम नाईक ह्यांनी त्यांना पत्र लिहून समुद्रातील ईईझेड क्षेत्रात वसई विरुद्ध पालघर-डहाणू संघर्षाबाबत पत्र लिहून तात्काळ कायदे बनविण्याची मागणी केली होती.मात्र त्यात युपीए सरकारला अपयश आले आता केंद्रात आणि राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना आणि राम नाईकांच्या कानी अनेक वेळा हा मुद्दा घातला असताना त्यांना कायदे बनविण्यास का बरे अपयश येते? असा प्रश्न आहे.ओएनजीसीचे शेकडो प्लॅटफॉर्म तर दुसरीकडे उत्तन, वसई, मढ येथील मच्छीमारांच्या हजारो कवीनी मोठे क्षेत्र गिळंकृत केल्यामुळे मासेमारी साठी क्षेत्रच उरत नसल्याने मासे पकडण्यासाठी आमची जाळी मारायची कुठे? असा प्रश्न आहे.

समुद्रात चारही बाजूने कवींची खुंटे रोवल्याने एका वेळेस ८० पैकी २० जाळीही समुद्रात टाकता येत नसल्याने मासेच मिळत नसल्याने ट्रिप फुकट जात नुकसान सोसावे लागते.-विश्वास पाटील, क्रि याशील मच्छिमार

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार