शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:27 IST

प्रवाशांना दिलास; अनेक महिन्यांपासून खड्ड्यांतून करावा लागत होता प्रवास

पालघर : राजकीय हेवेदावे, कुणाच्या मतांची बेगमी तर कुठे एसटी महामंडळाची नकारघंटा आदी समस्यांनी घेरलेल्या शिवाजी चौक ते हनुमान मंदिर या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला अखेर ११ डिसेंबरचा मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून खड्ड्यातून प्रवासाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

शिवाजी चौक पालघर ते हुतात्मा स्तंभ या दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाली होती. या कामापैकी हुतात्मा स्तंभ ते हनुमान मंदिर या दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र हनुमान मंदिर ते पुढे शिवाजी चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण अनेक कारणांनी अडले होते.

सद्यस्थितीत ५ मीटर असलेल्या या रस्त्याची रुंदी वाढवून ती ७ मीटर्स करण्यात येणार आहे. या रस्त्याची खोदाई करून नव्याने काँक्रिटीकरण करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार होता. परंतु या रस्त्याच्या खाली असलेल्या नगरपरिषदेच्या नळाच्या पाण्याच्या जलवाहिनी स्थलांतरित करणे गरजेचे होते. तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत असलेली गटारे बाजूला सरकवणे आवश्यक होते.

मात्र नगरपरिषदेने आपली जीर्ण झालेली जलवाहिनी स्थलांतरित करण्याऐवजी नव्याने जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पुढे आणला होता. तर गटार बाजूला सरकविण्याच्या कामासाठी हा रस्ता दोन महिन्यांसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र त्याला राज्य परिवहन महामंडळ (एसटी) विभागाने आडकाठी आणली होती. यानंतर काही राजकीय लोकांनी रस्त्यावरील काही खाजगी लोकांच्या मालमत्तेचा प्रश्न उपस्थित केल्याने काम रखडले होते.

पालघर-मनोर-बोईसर असा वाहतुकीचा मोठा भार असलेल्या या रस्त्यावरील वाहतूक अन्य पर्यायी रस्त्यावरून वळविणे अशक्य असल्याचे पालघर पोलिसांनी कळविल्यानंतर सदर काँक्रिटीकरण रस्ता बनविताना एकेरी वाहतूक सुरू ठेवूनच बनविण्यात यावा, असा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून ११ डिसेंबरपासून काँक्रिटीकरणाला सुरुवात होणार आहे.

नवीन रस्ता हा ७ मीटर्स लांबीचा बनविणे अपेक्षित असले तरी भूसंपादन करण्याची कुठलीही तरतूद या कामात नसल्याने जेवढी जागा उपलब्ध असेल तेवढ्या जागेवर काँक्रिटीकरण करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे अभियंते महेंद्र किणी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

पालघर-मनोर-बोईसर हा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने हा रस्ता ७ मीटरऐवजी ९ मीटरचा बनवावा असा प्रस्ताव आम्ही काही नागरिकांनी बांधकाम विभागाला दिला होता. त्यासाठी आमच्या भागातील जागा मिळवून देण्यास आम्ही तयार होतो.- बाबा कदम, माजी नगरसेवक.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाVasai Virarवसई विरारpalgharपालघर