शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:55 IST

शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे.

मीरारोड - शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. त्यामुळे शहरात पुरेसं पाणी असल्याचा सत्ताधारी भाजपाच्या दाव्याला गळती लागली आहे. 

शिवसेना नगरसेवकांनी शहरातील पाणी टंचाई व सूर्या योजनेचे पाणी लवकर आणा, म्हणून महापौर डिंपल मेहता यांना रिकामी घागर भेट दिली होती. भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर, नवघर भागातील महिलांनी देखील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना घेराव घातला होता . व पाणी खूपच कमी मिळत असल्या बद्दल संताप व्यक्त केला होता. काँग्रेसनेदेखील पाणी टंचाई मुळे नागरिक त्रासले असल्याच्या तक्रारी चालवल्या आहे . 

परंतु मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना पाणी पुरेसं असून पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा भाजपाच्या प्रमुख मंडळींकडून सतत केला जात होता. महापौर डिंपल मेहता यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पाणी टंचाई व सेनेच्या आंदोलना बद्दल विचारणा केली असता त्यावेळी शहरात पाणी पुरेसं येत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास नसल्याचे सांगण्यात आले होते . स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी तर पत्रकारांनाच, तुमच्याकडे आहे पाणी येतं की नाही सांगा ? असा सवाल केला होता .   

परंतु महापौर मेहता सह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या प्रभागातील हाटकेश , कनकिया ,   मंगल नगर , गौरव सिटी , रामदेव पार्क आदी भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत.  नगरसेवक संजय थेराडे , अनिता मुखर्जी व रुपाली मोदी यांनी तर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याची तक्रार वाकोडे यांना भेटून लेखी स्वरूपात केली आहे . उपमहापौर वैती यांच्या दालनातच वाकोडेंना बोलावून पाणी टंचाई वर चर्चादेखील करण्यात आली .  

२४ तासांनी येणारे पाणी आता नागरिकांना ३६ तासाने मिळत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले . या भागातील नागरिकांच्या प्रामुख्याने पाणी टंचाईच्या तक्रारी असल्याचे मांडण्यात आले .  वाकोडे यांनी पाणी टंचाई चे कारण सांगताना नदी पात्रातून पाणी उचलणारे पंप कचरा अडकून बंद पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले . येत्या काही दिवसात पाणी पुन्हा सुरळीत होईल असे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले . 

टॅग्स :Waterपाणी