शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:55 IST

शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे.

मीरारोड - शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. त्यामुळे शहरात पुरेसं पाणी असल्याचा सत्ताधारी भाजपाच्या दाव्याला गळती लागली आहे. 

शिवसेना नगरसेवकांनी शहरातील पाणी टंचाई व सूर्या योजनेचे पाणी लवकर आणा, म्हणून महापौर डिंपल मेहता यांना रिकामी घागर भेट दिली होती. भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर, नवघर भागातील महिलांनी देखील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना घेराव घातला होता . व पाणी खूपच कमी मिळत असल्या बद्दल संताप व्यक्त केला होता. काँग्रेसनेदेखील पाणी टंचाई मुळे नागरिक त्रासले असल्याच्या तक्रारी चालवल्या आहे . 

परंतु मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना पाणी पुरेसं असून पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा भाजपाच्या प्रमुख मंडळींकडून सतत केला जात होता. महापौर डिंपल मेहता यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पाणी टंचाई व सेनेच्या आंदोलना बद्दल विचारणा केली असता त्यावेळी शहरात पाणी पुरेसं येत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास नसल्याचे सांगण्यात आले होते . स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी तर पत्रकारांनाच, तुमच्याकडे आहे पाणी येतं की नाही सांगा ? असा सवाल केला होता .   

परंतु महापौर मेहता सह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या प्रभागातील हाटकेश , कनकिया ,   मंगल नगर , गौरव सिटी , रामदेव पार्क आदी भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत.  नगरसेवक संजय थेराडे , अनिता मुखर्जी व रुपाली मोदी यांनी तर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याची तक्रार वाकोडे यांना भेटून लेखी स्वरूपात केली आहे . उपमहापौर वैती यांच्या दालनातच वाकोडेंना बोलावून पाणी टंचाई वर चर्चादेखील करण्यात आली .  

२४ तासांनी येणारे पाणी आता नागरिकांना ३६ तासाने मिळत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले . या भागातील नागरिकांच्या प्रामुख्याने पाणी टंचाईच्या तक्रारी असल्याचे मांडण्यात आले .  वाकोडे यांनी पाणी टंचाई चे कारण सांगताना नदी पात्रातून पाणी उचलणारे पंप कचरा अडकून बंद पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले . येत्या काही दिवसात पाणी पुन्हा सुरळीत होईल असे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले . 

टॅग्स :Waterपाणी