शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

मीरारोडमध्ये पाणी टंचाई असल्याच्या भाजपा नगरसेवकांनीच केल्या तक्रारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2018 16:55 IST

शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे.

मीरारोड - शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. त्यामुळे शहरात पुरेसं पाणी असल्याचा सत्ताधारी भाजपाच्या दाव्याला गळती लागली आहे. 

शिवसेना नगरसेवकांनी शहरातील पाणी टंचाई व सूर्या योजनेचे पाणी लवकर आणा, म्हणून महापौर डिंपल मेहता यांना रिकामी घागर भेट दिली होती. भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर, नवघर भागातील महिलांनी देखील शिवसेनेच्या नगरसेविका नीलम ढवण यांच्या नेतृत्वाखाली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना घेराव घातला होता . व पाणी खूपच कमी मिळत असल्या बद्दल संताप व्यक्त केला होता. काँग्रेसनेदेखील पाणी टंचाई मुळे नागरिक त्रासले असल्याच्या तक्रारी चालवल्या आहे . 

परंतु मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना पाणी पुरेसं असून पाण्याची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा भाजपाच्या प्रमुख मंडळींकडून सतत केला जात होता. महापौर डिंपल मेहता यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पाणी टंचाई व सेनेच्या आंदोलना बद्दल विचारणा केली असता त्यावेळी शहरात पाणी पुरेसं येत असून नागरिकांना पाण्यासाठी त्रास नसल्याचे सांगण्यात आले होते . स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांनी तर पत्रकारांनाच, तुमच्याकडे आहे पाणी येतं की नाही सांगा ? असा सवाल केला होता .   

परंतु महापौर मेहता सह उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या प्रभागातील हाटकेश , कनकिया ,   मंगल नगर , गौरव सिटी , रामदेव पार्क आदी भागातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत.  नगरसेवक संजय थेराडे , अनिता मुखर्जी व रुपाली मोदी यांनी तर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाई सहन करावी लागत असल्याची तक्रार वाकोडे यांना भेटून लेखी स्वरूपात केली आहे . उपमहापौर वैती यांच्या दालनातच वाकोडेंना बोलावून पाणी टंचाई वर चर्चादेखील करण्यात आली .  

२४ तासांनी येणारे पाणी आता नागरिकांना ३६ तासाने मिळत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात आले . या भागातील नागरिकांच्या प्रामुख्याने पाणी टंचाईच्या तक्रारी असल्याचे मांडण्यात आले .  वाकोडे यांनी पाणी टंचाई चे कारण सांगताना नदी पात्रातून पाणी उचलणारे पंप कचरा अडकून बंद पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले . येत्या काही दिवसात पाणी पुन्हा सुरळीत होईल असे आश्वासन त्यांनी नगरसेवकांना दिले . 

टॅग्स :Waterपाणी