शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:56 IST

पालघरमध्ये सहा तालुक्यांत दिवसभरात नवीन रुग्ण नाही

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. जिल्ह्यात आजवर ४२ हजार ८६४ लोक कोरोनाबाधित आढळल्याने आणि त्यातील एक हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवाळीआधी नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा दिवाळीनंतर मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु मंगळवारी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालघरमध्ये सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामधील रुग्णांची संख्या जास्त आहे. वसई-विरारमध्ये २८ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत, तर पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ८५८, डहाणूमध्ये २ हजार ०२२, वाडामध्ये १ हजार ८१३, जव्हारमध्ये ५८२, मोखाडामध्ये २८२, तलासरीमध्ये २५५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३५५, विक्रमगडमध्ये ५७४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली असली तरी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वसई-विरारमध्ये २६ हजारहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ६००, डहाणू तालुक्यामध्ये १ हजार ९४६, जव्हार तालुक्यामध्ये ५६९, मोखाडा तालुक्यामध्ये २७६, तलासरी तालुक्यामध्ये २५१, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३०५, विक्रमगड तालुक्यामध्ये ५६२ तर वाडा तालुक्यामध्ये १ हजार ७६५ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सध्या दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. डहाणूमध्ये ३७, जव्हारमध्ये ८, मोखाडामध्ये १, पालघरमध्ये १११, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये ४, वाडामध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीतील रुग्णांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांमध्ये सध्या १७१ रुग्णच उपचार घेत आहेत. 

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे उत्तम नियोजन पालघर जिल्ह्यामध्ये वसई आणि पालघर या दोनच तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आले. पालघर तालुक्यात पाच तर वसईमध्ये ३१ नवीन रुग्ण आढळले. यात वसईमध्ये तीन, नालासोपारामध्ये ११ तर विरारमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता सध्या वसई-विरारमध्येच सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र तेथील यंत्रणेनेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले असून सध्या फक्त ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्धपणे राबविलेल्या मोहिमेमुळेच हे यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस