शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:56 IST

पालघरमध्ये सहा तालुक्यांत दिवसभरात नवीन रुग्ण नाही

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. जिल्ह्यात आजवर ४२ हजार ८६४ लोक कोरोनाबाधित आढळल्याने आणि त्यातील एक हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवाळीआधी नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा दिवाळीनंतर मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु मंगळवारी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालघरमध्ये सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामधील रुग्णांची संख्या जास्त आहे. वसई-विरारमध्ये २८ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत, तर पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ८५८, डहाणूमध्ये २ हजार ०२२, वाडामध्ये १ हजार ८१३, जव्हारमध्ये ५८२, मोखाडामध्ये २८२, तलासरीमध्ये २५५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३५५, विक्रमगडमध्ये ५७४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली असली तरी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वसई-विरारमध्ये २६ हजारहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ६००, डहाणू तालुक्यामध्ये १ हजार ९४६, जव्हार तालुक्यामध्ये ५६९, मोखाडा तालुक्यामध्ये २७६, तलासरी तालुक्यामध्ये २५१, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३०५, विक्रमगड तालुक्यामध्ये ५६२ तर वाडा तालुक्यामध्ये १ हजार ७६५ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सध्या दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. डहाणूमध्ये ३७, जव्हारमध्ये ८, मोखाडामध्ये १, पालघरमध्ये १११, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये ४, वाडामध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीतील रुग्णांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांमध्ये सध्या १७१ रुग्णच उपचार घेत आहेत. 

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे उत्तम नियोजन पालघर जिल्ह्यामध्ये वसई आणि पालघर या दोनच तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आले. पालघर तालुक्यात पाच तर वसईमध्ये ३१ नवीन रुग्ण आढळले. यात वसईमध्ये तीन, नालासोपारामध्ये ११ तर विरारमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता सध्या वसई-विरारमध्येच सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र तेथील यंत्रणेनेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले असून सध्या फक्त ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्धपणे राबविलेल्या मोहिमेमुळेच हे यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस