शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दिलासादायक! पालघरच्या ६ तालुक्यात कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात पुन्हा यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:56 IST

पालघरमध्ये सहा तालुक्यांत दिवसभरात नवीन रुग्ण नाही

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये मध्यंतरीच्या काळात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती. जिल्ह्यात आजवर ४२ हजार ८६४ लोक कोरोनाबाधित आढळल्याने आणि त्यातील एक हजार १५७ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवाळीआधी नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा दिवाळीनंतर मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढला होता. परंतु मंगळवारी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे.

पालघरमध्ये सर्वाधिक रुग्ण वसई-विरार महापालिका हद्दीमध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामधील रुग्णांची संख्या जास्त आहे. वसई-विरारमध्ये २८ हजार १५४ रुग्ण आढळले आहेत, तर पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ८५८, डहाणूमध्ये २ हजार ०२२, वाडामध्ये १ हजार ८१३, जव्हारमध्ये ५८२, मोखाडामध्ये २८२, तलासरीमध्ये २५५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३५५, विक्रमगडमध्ये ५७४ रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळली असली तरी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वसई-विरारमध्ये २६ हजारहून जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.पालघर तालुक्यामध्ये ७ हजार ६००, डहाणू तालुक्यामध्ये १ हजार ९४६, जव्हार तालुक्यामध्ये ५६९, मोखाडा तालुक्यामध्ये २७६, तलासरी तालुक्यामध्ये २५१, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३०५, विक्रमगड तालुक्यामध्ये ५६२ तर वाडा तालुक्यामध्ये १ हजार ७६५ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात केली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सध्या दाखल असलेल्या रुग्णांची संख्याही नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. डहाणूमध्ये ३७, जव्हारमध्ये ८, मोखाडामध्ये १, पालघरमध्ये १११, वसई ग्रामीणमध्ये १, विक्रमगडमध्ये ४, वाडामध्ये ९ रुग्ण उपचार घेत आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीतील रुग्णांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य सात तालुक्यांमध्ये सध्या १७१ रुग्णच उपचार घेत आहेत. 

प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे उत्तम नियोजन पालघर जिल्ह्यामध्ये वसई आणि पालघर या दोनच तालुक्यांमध्ये मंगळवारी दिवसभरात नवीन रुग्ण आढळून आले. पालघर तालुक्यात पाच तर वसईमध्ये ३१ नवीन रुग्ण आढळले. यात वसईमध्ये तीन, नालासोपारामध्ये ११ तर विरारमध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता सध्या वसई-विरारमध्येच सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र तेथील यंत्रणेनेही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले असून सध्या फक्त ५४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने नियोजनबद्धपणे राबविलेल्या मोहिमेमुळेच हे यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस