शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

थंडी वाढल्याने डहाणूत आंबा कलमे मोहरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:17 IST

पोषक वातावरण : कृषी विभाग मोहर संवर्धन कार्यक्र म आखणार

अनिरु द्ध पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : तालुक्याील वातावरणात थंडीची तीव्रता वाढत असल्याने आंबा कलम मोहरण्यास प्रारंभ झाला आहे. लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळाच्या प्रभावाने मोहोरावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असताना अनुभवी बागायतदारांनी डिसेंबरच्या मध्यावर मोहर येण्याची शक्यता वर्तवली होती. त्याचबरोबर कृषी विभागाकडून ‘मोहर संवर्धन’ कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे. दरम्यान, यंदाही पोषक वातावरण मिळाल्यास ३० एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवड्यात बाजारात फळे येण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.उत्तर कोकणातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यांमध्ये डिसेंबर प्रारंभापासून आंबा कलम मोहरण्यास सुरुवात होते. यंदा लांबलेला पाऊस आणि चक्रीवादळामुळे आंबा मोहरावर परिणाम होऊन मोहरण्याची क्रिया उशिरा सुरू होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र सीमा भागातील या तालुक्यांमध्ये आंबा कलमे मोहरलेली दिसत आहेत. दरम्यान बोर्डी नजीकच्या अस्वाली धरणाच्या पायथ्याशी नोव्हेंबरच्या प्रारंभापासून काही कलमे मोहरली होती. आता तेथे वाटाण्याच्या आकारातील फळे धरली आहेत.हा परिसर समुद्र किनाऱ्यापासून सुमारे पंधरा कि.मी. असून पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये आहे. येथे ८ एकर क्षेत्रावर सुमारे २५० केशर, पायरी, राजापुरी या जातींच्या कलमांची लागवड केल्याची माहिती नंदकुमार दिनकर राऊत या बागायतदाराने दिली. या बागेला १५ नोव्हेंबर रोजी पाणी दिले होते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहर येण्यास सुरुवात झाली आहे.तुडतुडा, विविध किडजन्य रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता बागेची नांगरट केली असून मोहराच्या संवर्धनासाठी फवारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.काही दिवसांपासून तालुक्यातील तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता जाणवू लागली आहे. कलम मोहरण्यास हे अनुकूल वातावरण असून थंडी कायम राहिल्यास डिसेंबर अखेरीस सर्व झाडे मोहरतील असे आंबा बागायतदारांचे म्हणणे आहे. जानेवारी मध्यापर्यंत झाडे मोहरली आणि पोषक वातावरण मिळाल्यास मागील वर्षीप्रमाणेच यंदाही एप्रिल अखेरीस ते मे मध्यावर तयार फळे मिळतील, अशी शक्यता अनुभवी बागायतदारांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या मंडळातील एकूण तालुक्यात ८४४.२१ हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीचे आहे. तालुका कृषी विभागातर्फे आंबा मोहर संरक्षणाबाबत लवकरच कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे तर कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.यंदा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मोहरावर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे परिणाम जाणवला होता. मात्र उत्तर कोकणात नेहमीपेक्षा लवकर झाडे मोहरली आहेत. त्यामुळे बाजारात फळे लवकर येऊन चांगला भाव मिळू शकतो. दोन वर्षांपासून या भागात काही कलमे लवकर मोहरण्याची प्रक्रि या घडत असून यंदाही तीच परिस्थिती दिसल्याने कृषी विभागाने त्याचा अभ्यास केल्यास उत्पादन लवकर येऊन बागायतदारांना आर्थिक फायदा होऊ शकतो. यामुळे आंबा बागायतदारांमध्ये समाधान दिसून येत आहे.