शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून निर्माल्य म्हणून नारळ फेकला, तरुणाच्या डोक्याला लागला; दुदैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:05 IST

धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला. तो नारळ संजय याच्या डोक्याला लागला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- धावत्या लोकल मधून नारळ फेकल्याने एका तरुणाच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला होता . मुंबईत उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी मृत्यू झाला आहे. संजय भोईर (२५) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर मुंबई येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू होते.

संजय भोईर हा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पाणजू बेटावर राहतो. तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता. संजय हा शनिवारी फेरीबोट ही विलंबाने सुरू असल्याने सकाळी साडे आठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करीत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता. याच दरम्यान धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला. तो नारळ संजय याच्या डोक्याला लागला. यात तो गंभीर जखमी झाला.

याची माहिती तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर स्वरूपाची दुःखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलविण्यात आले  होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांशी संपर्क केला असता त्यांच्याकडे अजूनही अशी कोणती नोंद केली नसल्याचे त्यांनी सांगितले. या घडलेल्या घटनेमुळे पाणजू गाव परीसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बोट बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाणपूलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो. धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत गावातील दहा ते बारा नागरिक जखमी झाले असून काही वर्षांपूर्वी संजयच्या आईवडीलांचाही लाकुडफाटा आणण्यासाठी आपल्या छोट्या बोटीतून गेले असताना बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती विलास भोईर यांनी दिली. संजय याच्या पश्चात आता मोठा भाऊ कृणाल आहे. यापूर्वी वैतरणा रेल्वे खाडी पुलावर ही धावत्या लोकलमधून नारळ फेकल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.

नायगाव व भाईंदर खाडीच्या बेटावर पाणजू हे गाव आहे. या भागातील नागरिकांना पाणजू बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो. काही वेळा हवामान बदलामुळे बोट विलंबाने सुरू असते. तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते. अशा वेळी काही प्रवासी नागरिक नायगाव भाईंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करतात. लोकल मधून निर्माल्य फेकणाऱ्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी आणावी व जे निर्माल्य फेकताना दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Coconut thrown from train kills young man in tragic accident.

Web Summary : A young man, Sanjay Bhoir, died after being hit by a coconut thrown from a local train near Naigaon. He was walking on a bridge when the incident occurred. He succumbed to his injuries in a Mumbai hospital. The incident has sparked outrage, with calls for stricter action against littering from trains.
टॅग्स :Vasai Virarवसई विरारnaigaonनायगावbhayandarभाइंदर