शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

वाढवण बंदराबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 04:17 IST

दोन दशकांहून अधिक काळ सेनेचा विरोध; विधानसभा निवडणुकीतही गाजला होता मुद्दा

- हितेन नाईक पालघर : अनेक वर्षे विरोध दर्शविणाऱ्या स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवीत अखेर केंद्र सरकारने वाढवण बंदराच्या उभारणीला हिरवा कंदील दाखवल्याने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारपुढे पेच उभा राहणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी स्थानिक जनतेला दिलेला शब्द पाळायचा की केंद्र सरकारच्या बंदर विकासाच्या भूमिकेला समर्थन द्यायचे, अशा कात्रीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. येथील स्थानिक नेहमीच शिवसेनेसोबत राहिल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

१९९६-९७ मध्ये युती सरकारच्या काळात डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराच्या उभारणीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाकडून पुढे आला होता. मात्र स्थानिक मच्छीमार, शेतकरी, डायमेकर यांचा कडवा विरोध पाहता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना परिस्थिती समजून घेण्यासाठी वाढवण येथे पाठवले होते.

हे हरित क्षेत्र आहे. आठ ते १० हजार कुटुंबे डायमेकर व्यवसायावर अवलंबून आहेत. या भागात विविध मत्स्यसंपदेचे मोठे साठे अस्तित्वात आहेत. या व्यवसायात दोन ते तीन हजार बोटी असून लाखो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले. हा पर्यावरणपूरक भाग आणि त्याच्या जपणुकीसाठी स्थानिकांकडून एकजुटीने होणारा विरोध बाळासाहेबांपर्यंत पोहोचवण्यात आला. नंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हे बंदर रद्द करण्याचे आदेश दिले होते.

रद्द करण्यात आलेल्या या बंदराने पुन्हा डोके वर काढले आणि पर्यावरण प्राधिकरणाची परवानगी न घेता ५ जून २०१५ रोजी युतीच्या सरकारने केंद्र सरकारच्या ७४ तर राज्य सरकारच्या २६ टक्के गुंतवणुकीतून जेएनपीटी आणि मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्यातून हे बंदर उभारणीचा घाट घातला होता. त्यामुळे पुन्हा स्थानिकांचा उद्रेक वाढला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या बंदराविरोधात मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उगारण्यात आले होते.

जिल्ह्यातील किनारपट्टीचा भाग हा कित्येक वर्षांपासून शिवसेना, युतीचा बालेकिल्ला आहे. २०१६ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांच्या प्रचारासाठी चिंचणी येथे झालेल्या सभेत या वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर शिवसेना स्थानिकांबरोबर असेल असे आश्वासन ठाकरे यांनी दिले होते. त्याचा पुनरूच्चार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मनोर येथील प्रचारसभेत केला होता आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने मला मुंबईत भेटावे असे निमंत्रणही दिले होते.

सर्वाेच्च न्यायालयात जाणार

डहाणू पर्यावरण प्राधिकरणाने १९९८ मध्ये सीआरझेड १, ग्रीन झोन आदी पाच मुद्दे गृहीत धरल्याने हे बंदर होऊ शकले नव्हते. वाढवणविरोधी संघर्ष समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असताना बंदराला मिळालेली मंजुरी चुकीची आहे. आम्ही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत.- वैभव वझे, सहसचिव, वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारVasai Virarवसई विरार