शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:27 IST

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही,

बोईसर : ज्यात नागरिकांचा, कामगारांचा जीव जातो, असे उद्योग उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचे धोकादायक रासायनिक कारखाने सुरू ठेवायचे की नाहीत, याचा एकदाच काय तो निर्णय आता घ्यावा लागणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, त्यात काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तारापूरच्या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी दुपारी तारापूर औद्योगिक वसाहतीत जाऊन स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. ही दुर्घटना धक्कादायक असून, माझी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल आम्हाला मिळाला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. ती वरिष्ठ पातळीवरून होईल. त्यात जे जे जबाबदार असतील, मग ते कुठल्याही खात्याचे असोत, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतले जातील, असे देसाई यांनी सांगितले.

वसईचे कार्यालय तारापूरलामहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांचा आधार घेत, येथील कारखान्यात उत्पादन सुरू केले जाते. मात्र, ज्या उत्पादनासाठी परवानगी घेतली जाते, त्याऐवजी वेगळे उत्पादन घेतले जात असल्याची बाब यावेळी देसाई यांच्या निदर्शनास आणण्यात आली. असे धोकादायक उत्पादन घेणाऱ्या कारखान्याची जी नियमित तपासणी करण्याची गरज आहे, ती अपुºया अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे होत नाही. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय वसईऐवजी तारापूरला आणावे, अशा सूचना केल्यानंतर देसाई यांनी कार्यालय त्वरित तारापूरला आणले जाईल, असे जाहीर केले, तसेच ज्या खात्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यांना ते तत्काळ वाढवून दिले जाईल. यात विलंब होणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे