शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:27 IST

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही,

बोईसर : ज्यात नागरिकांचा, कामगारांचा जीव जातो, असे उद्योग उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचे धोकादायक रासायनिक कारखाने सुरू ठेवायचे की नाहीत, याचा एकदाच काय तो निर्णय आता घ्यावा लागणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, त्यात काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तारापूरच्या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी दुपारी तारापूर औद्योगिक वसाहतीत जाऊन स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. ही दुर्घटना धक्कादायक असून, माझी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल आम्हाला मिळाला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. ती वरिष्ठ पातळीवरून होईल. त्यात जे जे जबाबदार असतील, मग ते कुठल्याही खात्याचे असोत, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतले जातील, असे देसाई यांनी सांगितले.

वसईचे कार्यालय तारापूरलामहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांचा आधार घेत, येथील कारखान्यात उत्पादन सुरू केले जाते. मात्र, ज्या उत्पादनासाठी परवानगी घेतली जाते, त्याऐवजी वेगळे उत्पादन घेतले जात असल्याची बाब यावेळी देसाई यांच्या निदर्शनास आणण्यात आली. असे धोकादायक उत्पादन घेणाऱ्या कारखान्याची जी नियमित तपासणी करण्याची गरज आहे, ती अपुºया अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे होत नाही. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय वसईऐवजी तारापूरला आणावे, अशा सूचना केल्यानंतर देसाई यांनी कार्यालय त्वरित तारापूरला आणले जाईल, असे जाहीर केले, तसेच ज्या खात्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यांना ते तत्काळ वाढवून दिले जाईल. यात विलंब होणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे