शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पालघरमध्ये चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:16 IST

वनहक्क दाव्यांचा विषय पेटला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर : वनहक्क कायदा संमत होऊन १२ वर्षाचा कालावधी उलटल्या नंतरही जिल्ह्यात हजारो दावे आजही प्रलंबित असून सर्वात जास्त प्रलंबित दावे असलेला जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची ओळख झाल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे असून गुरुवारी प्रलंबित मागण्यासाठी हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन पुकारीत त्यांनी पूर्ण वाहतूक बंद पाडली.

पालघर रेल्वे स्थानकापासून दुपारी १२:३० वाजता कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, मधुताई धोडी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. सातपाटी आणि पालघर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालया आधीच अडवल्या नंतर लोबो सह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकूने आदी सोबत सुमारे चार तास चर्चा केली. जिल्हा व उपविभागीय पातळीवरील समित्या वनविभागाच्या म्हणण्याच्या आधारे निर्णय घेत नाही तसेच ग्रामसभांचे निर्णय धुडकावत आहेत आणि प्रत्यक्ष वाहिवाटिखालिल क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांना मान्यता दिली जात आहे. जिल्हा समितीने असे सुमारे ५० दावे उपविभागीय समिती डहाणू कडे दुरुस्तीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे ग्रामसभांनी मान्य केलेले क्षेत्र विचारात घेऊन सामूहिक दावे मान्य करण्यात यावेत आदी वन दाव्या बाबतचे प्रश्न, चुकीचे निकाल आदीचे निवेदन ह्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर एक मुख्य बैठकीचे आयोजन १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याचे लेखी उत्तर मोर्चे कºयांनी हाती घेतल्यावर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

आदिवासी विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात उपविभागीय पातळीवर ८ हजार २२८ दावे प्रलंबित असून जिल्हापातळीवरील प्रलंबित दाव्यात जिल्हा तिसºया क्र मांकावर असल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे. जिल्हा पातळीवरील समिती कायद्याने आखून दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला.८ हजार २२८ दावे प्रलंबित आखून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार