शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पालघरमध्ये चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:16 IST

वनहक्क दाव्यांचा विषय पेटला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पालघर : वनहक्क कायदा संमत होऊन १२ वर्षाचा कालावधी उलटल्या नंतरही जिल्ह्यात हजारो दावे आजही प्रलंबित असून सर्वात जास्त प्रलंबित दावे असलेला जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची ओळख झाल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे असून गुरुवारी प्रलंबित मागण्यासाठी हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन पुकारीत त्यांनी पूर्ण वाहतूक बंद पाडली.

पालघर रेल्वे स्थानकापासून दुपारी १२:३० वाजता कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, मधुताई धोडी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. सातपाटी आणि पालघर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालया आधीच अडवल्या नंतर लोबो सह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकूने आदी सोबत सुमारे चार तास चर्चा केली. जिल्हा व उपविभागीय पातळीवरील समित्या वनविभागाच्या म्हणण्याच्या आधारे निर्णय घेत नाही तसेच ग्रामसभांचे निर्णय धुडकावत आहेत आणि प्रत्यक्ष वाहिवाटिखालिल क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांना मान्यता दिली जात आहे. जिल्हा समितीने असे सुमारे ५० दावे उपविभागीय समिती डहाणू कडे दुरुस्तीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे ग्रामसभांनी मान्य केलेले क्षेत्र विचारात घेऊन सामूहिक दावे मान्य करण्यात यावेत आदी वन दाव्या बाबतचे प्रश्न, चुकीचे निकाल आदीचे निवेदन ह्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर एक मुख्य बैठकीचे आयोजन १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येणार असल्याचे लेखी उत्तर मोर्चे कºयांनी हाती घेतल्यावर हे धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

आदिवासी विभागाच्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात उपविभागीय पातळीवर ८ हजार २२८ दावे प्रलंबित असून जिल्हापातळीवरील प्रलंबित दाव्यात जिल्हा तिसºया क्र मांकावर असल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे. जिल्हा पातळीवरील समिती कायद्याने आखून दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला.८ हजार २२८ दावे प्रलंबित आखून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार