शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:06 IST

नुकसानभरपाई कोण देणार? : नालासोपारा पश्चिमेकडील पाणी ओसरेना

नालासोपारा : शनिवारी रात्रभर नालासोपारा शहराला पावसाने झोडपल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाने करोडो रुपये खर्च करून केलेली गटारे, नाले व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर या पावसाळ्यात नालासोपारकरांना दुसऱ्यांदा या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले. या पावसामुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानभरपाई कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पूर्वेकडील पाणी ओसरले असले तरी पश्चिमेकडील अनेक परिसरात आताही मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी गुडघाभर पाणी होते.कोणतीही सुविधा करण्यात आली नाहीवसई तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने ५०० ते ६०० लोकांचे स्थलांतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, एनडीआरएफची टीम, पालघर पोलीस, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अिग्नशामक दलाच्या जवानांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत केले होते पण नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर, हनुमान नगर, एस टी डेपो रोड, पाटणकर पार्क याठिकाणी परिस्थिती पाहण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी साधा फिरकलाही नाही. पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांनी रविवारची रात्र अंधारात इमारतीच्या टेरेसवर काढली पण महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थेचे अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीत मते मागणारे लोकप्रतिनिधी साधे फिरकले सुद्धा नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.वीजपुरवठा सुरळीतपणे......नालासोपारा शहरात पाणी साचल्याने अनेक परिसरातील वीज रविवारी पहाटे घालवण्यात आली होती. तर ज्या परिसरातील पावसाचे पाणी ओसरले होते त्या परिसरात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत केला होता. पश्चिमेकडील अनेक परिसरात पाण्यामुळे रविवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता पण सोमवारी सकाळी महावितरणचे वायरमन, कर्मचारी ज्या ज्या परिसरात साचलेले पाणी ओसरले त्या त्या परिसरात जाऊन बघितल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करत होते.सदर पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पावसाळ्यापूर्वी अलकापुरी येथून पाईप टाकण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील परिसरात जेथून पाणी जाते ते फुल असल्याने ते कमी झाल्यावर पश्चिमेकडील परिसरातील पावसाचे पाणी कमी होईल.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :floodपूर