शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:06 IST

नुकसानभरपाई कोण देणार? : नालासोपारा पश्चिमेकडील पाणी ओसरेना

नालासोपारा : शनिवारी रात्रभर नालासोपारा शहराला पावसाने झोडपल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाने करोडो रुपये खर्च करून केलेली गटारे, नाले व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर या पावसाळ्यात नालासोपारकरांना दुसऱ्यांदा या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले. या पावसामुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानभरपाई कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पूर्वेकडील पाणी ओसरले असले तरी पश्चिमेकडील अनेक परिसरात आताही मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी गुडघाभर पाणी होते.कोणतीही सुविधा करण्यात आली नाहीवसई तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने ५०० ते ६०० लोकांचे स्थलांतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, एनडीआरएफची टीम, पालघर पोलीस, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अिग्नशामक दलाच्या जवानांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत केले होते पण नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर, हनुमान नगर, एस टी डेपो रोड, पाटणकर पार्क याठिकाणी परिस्थिती पाहण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी साधा फिरकलाही नाही. पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांनी रविवारची रात्र अंधारात इमारतीच्या टेरेसवर काढली पण महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थेचे अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीत मते मागणारे लोकप्रतिनिधी साधे फिरकले सुद्धा नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.वीजपुरवठा सुरळीतपणे......नालासोपारा शहरात पाणी साचल्याने अनेक परिसरातील वीज रविवारी पहाटे घालवण्यात आली होती. तर ज्या परिसरातील पावसाचे पाणी ओसरले होते त्या परिसरात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत केला होता. पश्चिमेकडील अनेक परिसरात पाण्यामुळे रविवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता पण सोमवारी सकाळी महावितरणचे वायरमन, कर्मचारी ज्या ज्या परिसरात साचलेले पाणी ओसरले त्या त्या परिसरात जाऊन बघितल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करत होते.सदर पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पावसाळ्यापूर्वी अलकापुरी येथून पाईप टाकण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील परिसरात जेथून पाणी जाते ते फुल असल्याने ते कमी झाल्यावर पश्चिमेकडील परिसरातील पावसाचे पाणी कमी होईल.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :floodपूर