शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:06 IST

नुकसानभरपाई कोण देणार? : नालासोपारा पश्चिमेकडील पाणी ओसरेना

नालासोपारा : शनिवारी रात्रभर नालासोपारा शहराला पावसाने झोडपल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाने करोडो रुपये खर्च करून केलेली गटारे, नाले व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर या पावसाळ्यात नालासोपारकरांना दुसऱ्यांदा या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले. या पावसामुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानभरपाई कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पूर्वेकडील पाणी ओसरले असले तरी पश्चिमेकडील अनेक परिसरात आताही मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी गुडघाभर पाणी होते.कोणतीही सुविधा करण्यात आली नाहीवसई तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने ५०० ते ६०० लोकांचे स्थलांतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, एनडीआरएफची टीम, पालघर पोलीस, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अिग्नशामक दलाच्या जवानांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत केले होते पण नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर, हनुमान नगर, एस टी डेपो रोड, पाटणकर पार्क याठिकाणी परिस्थिती पाहण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी साधा फिरकलाही नाही. पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांनी रविवारची रात्र अंधारात इमारतीच्या टेरेसवर काढली पण महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थेचे अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीत मते मागणारे लोकप्रतिनिधी साधे फिरकले सुद्धा नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.वीजपुरवठा सुरळीतपणे......नालासोपारा शहरात पाणी साचल्याने अनेक परिसरातील वीज रविवारी पहाटे घालवण्यात आली होती. तर ज्या परिसरातील पावसाचे पाणी ओसरले होते त्या परिसरात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत केला होता. पश्चिमेकडील अनेक परिसरात पाण्यामुळे रविवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता पण सोमवारी सकाळी महावितरणचे वायरमन, कर्मचारी ज्या ज्या परिसरात साचलेले पाणी ओसरले त्या त्या परिसरात जाऊन बघितल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करत होते.सदर पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पावसाळ्यापूर्वी अलकापुरी येथून पाईप टाकण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील परिसरात जेथून पाणी जाते ते फुल असल्याने ते कमी झाल्यावर पश्चिमेकडील परिसरातील पावसाचे पाणी कमी होईल.- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

टॅग्स :floodपूर