शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:54 IST

खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

वाडा: कोरोना विषाणूचा फटका तालुक्यातील मिरची शेतीला बसला आहे. येथील शेतकऱ्यांनी परदेशात जाणारी दर्जेदार हिरव्या मिरचीची शेती केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लागू झालेल्या संचारबंदीमुळे हिरवी मिरची धुळीस मिळाली असून खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तालुक्यातील देवघर येथील आदर्श शेतकरी किशोर पाटील हे दरवषी आपल्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती करून दर्जेदार पिके घेत असतात. यावषी त्यांनी प्रथमच मल्चिंग आणि ठिबक पद्धतीने ९१७ जातीच्या हिरव्या मिरचीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. मिरचीही अगदी बहरून आली आहे. या मिरचीला परदेशात खूप मागणी आहे. मात्र मिरची तयार झाली आणि कोरोना व्हायरसचे संकट आल्याने मिरचीचा भाव गडाडला व संचारबंदीमुळे मिरची बाहेर नेऊ शकत नसल्याने हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.किशोर पाटील यांनी दीड एकर जागेत नारायण गांव येथून ९१७या वाणाची परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या रोपांची लागवड केली असून त्यासाठी तब्बल अडीच लाख रूपये खर्च  केला आहे. खरंतर त्यांना २० टन माल निघण्याची अपेक्षा होती. त्यातून ६ लाख रूपये  मिळतील अशी त्यांना आशा होती. त्यातून खर्च काढून काही तरी फायदा मिळेल या आशेवर ते होते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजार बंद झाल्याने त्यांच्या आशा मावळल्या. त्यांनी पिकासाठी सेवा सहकारी सोसायटीकडून घेतले होते. ते कर्ज फेडणाचे कसे आणि कुटुंब चालवायचे कसे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

लॉकडाऊनमुळे मोठे नुकसानमागील २० वर्षांपासून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती करतो. मात्र या वषी पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली असून कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून त्यातून बाहेर येण्यासाठी सरकारने मदत करावी हीच अपेक्षा.- किशोर पाटील, मिरची उत्पादक शेतकरी, देवघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस