शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

CoronaVirus: कोरोनाचा फटका वाड्यातील मिरची उत्पादकांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:54 IST

खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला

वाडा: कोरोना विषाणूचा फटका तालुक्यातील मिरची शेतीला बसला आहे. येथील शेतकऱ्यांनी परदेशात जाणारी दर्जेदार हिरव्या मिरचीची शेती केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात लागू झालेल्या संचारबंदीमुळे हिरवी मिरची धुळीस मिळाली असून खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.तालुक्यातील देवघर येथील आदर्श शेतकरी किशोर पाटील हे दरवषी आपल्या शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला शेती करून दर्जेदार पिके घेत असतात. यावषी त्यांनी प्रथमच मल्चिंग आणि ठिबक पद्धतीने ९१७ जातीच्या हिरव्या मिरचीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले आहे. मिरचीही अगदी बहरून आली आहे. या मिरचीला परदेशात खूप मागणी आहे. मात्र मिरची तयार झाली आणि कोरोना व्हायरसचे संकट आल्याने मिरचीचा भाव गडाडला व संचारबंदीमुळे मिरची बाहेर नेऊ शकत नसल्याने हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.किशोर पाटील यांनी दीड एकर जागेत नारायण गांव येथून ९१७या वाणाची परदेशात एक्सपोर्ट होणाऱ्या रोपांची लागवड केली असून त्यासाठी तब्बल अडीच लाख रूपये खर्च  केला आहे. खरंतर त्यांना २० टन माल निघण्याची अपेक्षा होती. त्यातून ६ लाख रूपये  मिळतील अशी त्यांना आशा होती. त्यातून खर्च काढून काही तरी फायदा मिळेल या आशेवर ते होते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजार बंद झाल्याने त्यांच्या आशा मावळल्या. त्यांनी पिकासाठी सेवा सहकारी सोसायटीकडून घेतले होते. ते कर्ज फेडणाचे कसे आणि कुटुंब चालवायचे कसे असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.

लॉकडाऊनमुळे मोठे नुकसानमागील २० वर्षांपासून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती करतो. मात्र या वषी पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली असून कोरोना विषाणूमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असून त्यातून बाहेर येण्यासाठी सरकारने मदत करावी हीच अपेक्षा.- किशोर पाटील, मिरची उत्पादक शेतकरी, देवघर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस