शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:38 IST

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही

शौकत शेखलोकमत न्यूज नेटवर्क डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वाढवण, चंडीगाव, आसनगाव, बावडा, केतखाडी, तनाशी आदी भागात ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. येथील प्रसिद्ध ढोबळी मिरची खासकरून मुंबई, राजस्थान तसेच दिल्ली, जयपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज पाठविली जात होती. परंतु ऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे मुख्य भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही. यामुळे बागायतदारांनी ढोबळी मिरचीच्या संपूर्ण बागा मोकाट गुरे तसेच बकऱ्यांच्या हवाली केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, संचारबंदी, वाहतूकबंदी, रेल्वेबंदी, आयात-निर्यात बंदी, मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे, शाळाबंदी, व्यवसायबंदी अशा विविध उपाययोजना केल्याने त्याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील ढोबळी मिरची, भाजीपाला, चिकू, नारळ, आंबे, पेरू, लिचीबरोबरच विविध प्रकारची फुले, भात लागवड अशा कृषी उत्पादकांना बसला आहे. त्याबरोबरच शेती-बागायतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांवरदेखील उपासमारीची वेळ आलेली आहे.

येथील पश्‍चिम किनारपट्टीवर डहाणू, चिंचणी, वाणगाव भागात प्रामुख्याने रब्बी हंगामात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच नेट शेड, पॉलिहाऊसचा वापर करून व महागडी संकरित मिरची व ढोबळी मिरचीच्या बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते. ते मुंबई, दिल्ली, कोलकाता तसेच परदेशातही पाठविण्यात येते; मात्र गेल्या वर्षापासूनच्या दोन हंगामात कोरोना टाळेबंदी, वाहतूकबंदी, संचारबंदीमुळे कृषी उत्पादन होऊनही त्याला गिऱ्हाईक नसल्याने मागणीच  नाही.

व्यापाऱ्यांकडून फसवणूकnऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा अगदी अल्प किमतीने बागायतदारांना मालाची विक्री करावी लागते. आता तर दिल्लीसारख्या ठिकाणी मिरची जाणे बंद झाल्याने दहा-बारा रुपये किलोप्रमाणे मिरची, ढोबळी मिरची शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. nयामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही सुटत नाही. काही बागायतदारांनी तर मिरची बागेत गुरे, बकरी घालायला सुरुवात केली आहे. थोडीफार मिरची व्यापारी नेतात, मात्र ते अल्प भाव देऊन बागायतदारांची फसवणूक करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर