शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 23:38 IST

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही

शौकत शेखलोकमत न्यूज नेटवर्क डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वाढवण, चंडीगाव, आसनगाव, बावडा, केतखाडी, तनाशी आदी भागात ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. येथील प्रसिद्ध ढोबळी मिरची खासकरून मुंबई, राजस्थान तसेच दिल्ली, जयपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज पाठविली जात होती. परंतु ऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे मुख्य भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही. यामुळे बागायतदारांनी ढोबळी मिरचीच्या संपूर्ण बागा मोकाट गुरे तसेच बकऱ्यांच्या हवाली केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, संचारबंदी, वाहतूकबंदी, रेल्वेबंदी, आयात-निर्यात बंदी, मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे, शाळाबंदी, व्यवसायबंदी अशा विविध उपाययोजना केल्याने त्याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील ढोबळी मिरची, भाजीपाला, चिकू, नारळ, आंबे, पेरू, लिचीबरोबरच विविध प्रकारची फुले, भात लागवड अशा कृषी उत्पादकांना बसला आहे. त्याबरोबरच शेती-बागायतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांवरदेखील उपासमारीची वेळ आलेली आहे.

येथील पश्‍चिम किनारपट्टीवर डहाणू, चिंचणी, वाणगाव भागात प्रामुख्याने रब्बी हंगामात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच नेट शेड, पॉलिहाऊसचा वापर करून व महागडी संकरित मिरची व ढोबळी मिरचीच्या बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते. ते मुंबई, दिल्ली, कोलकाता तसेच परदेशातही पाठविण्यात येते; मात्र गेल्या वर्षापासूनच्या दोन हंगामात कोरोना टाळेबंदी, वाहतूकबंदी, संचारबंदीमुळे कृषी उत्पादन होऊनही त्याला गिऱ्हाईक नसल्याने मागणीच  नाही.

व्यापाऱ्यांकडून फसवणूकnऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा अगदी अल्प किमतीने बागायतदारांना मालाची विक्री करावी लागते. आता तर दिल्लीसारख्या ठिकाणी मिरची जाणे बंद झाल्याने दहा-बारा रुपये किलोप्रमाणे मिरची, ढोबळी मिरची शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. nयामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही सुटत नाही. काही बागायतदारांनी तर मिरची बागेत गुरे, बकरी घालायला सुरुवात केली आहे. थोडीफार मिरची व्यापारी नेतात, मात्र ते अल्प भाव देऊन बागायतदारांची फसवणूक करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर