शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

लॉकडाउनमुळे चिकू उत्पादकांना ७० कोटींची आर्थिक झळ; दहा हजार एकरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 06:41 IST

कोरोनामुळे झाली निर्यात ठप्प; प्रक्रिया उद्योगासह अन्य फळलागवडीचा हवा पर्याय

- अनिरुद्ध पाटील।बोर्डी : डहाणू आणि तलासरी या तालुक्यात सुमारे दहा हजार एकरवर चिकू लागवड केली जाते. येथील चिकूला प्रचंड मागणी असते. मात्र, सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे चिकू निर्यात ठप्प झाली असून बागायतदारांचे सुमारे ७० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज रुरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक प्रभाकर सावे यांनी वर्तवला आहे.

चिकू प्रक्रिया उद्योग व्यवस्था असती, तर हे आर्थिक नुकसान काही प्रमाणात टाळता आले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जून २०१९ पासून चिकू फळावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गतवर्षी पावसाचा कालावधी लांबला, चक्रीवादळामुळेही चिकूचे नुकसान झाले. नेहमी रमजान महिन्यात चिकूचा बाजारभाव हा सरासरी प्रतिकिलो २५ रुपये असतो. या वेळी कोरोनामुळे केवळ १० ते १५ टक्के मालाची विक्री आणि तीदेखील कमी दराने झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले. तर निर्यातीअभावी झाडावरील पक्व फळांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली.

पालघर जिल्ह्यात या फळासाठी प्रक्रिया उद्योग नसल्याने फळांची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. दीड वर्षापूर्वी तत्कालीन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘चिकू क्लस्टर-समूह’ गठित केला. या समूहातर्फे मोठे चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या आवाहनाला बागायतदारांचा प्रतिसाद लाभला होता. परंतु, त्यांच्या बदलीनंतर याकडे दुर्लक्ष झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. शेतकºयांना स्वत:च्या बागायतीत चिकू प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी तिचे बिगर शेतीमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र नियमांचा हवाला देऊन महसूल विभागाकडून अपेक्षित सहकार्य नसल्याचा ठपका स्थानिकांकडून ठेवला जात आहे.

अल्कोहोलिक ब्रेव्हरेज आणि इतर मद्य पदार्थ बनवण्यासाठी काही उत्पादकांनी तयारी दर्शवली. मात्र मद्यावर २० टक्के वॅट रक्कम आगाऊ जमा करण्याची अट असल्याने हे भांडवल उभारणे बागायतदारांच्या आवाक्यातील नाही. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार केल्यास या कोरोना काळात आर्थिक नुकसानीचे प्रमाण हे कोटींच्या घरात गेल्याचा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. हे येथील प्रमुख फळ असल्याने याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

यंदा चिकूसह आंबा, लिची आदीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुन्या फळझाडांचे व्यवस्थापन करून तेथे टप्प्याटप्प्याने नवीन झाडांची लागवड करणे, नवीन फळांच्या जातीची झाडे लावण्याचा प्रयोग करणे गरजेचे आहे. याकरिता प्रशिक्षण व संशोधन यंत्रणा स्थानिक पातळीवर उभारणे गरजेचे झाले आहे. त्याचबरोबरीने समूह शेती- बागायतीचे प्रयोग करणे तसेच प्रक्रिया समूह निर्माण झाल्यास चिकूला होणाºया आर्थिक संकटावर मात करता येईल. - कृषिभूषण यज्ञेश सावे (चिकू बागायतदार)

टॅग्स :Vasai Virarवसई विरार