शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

आदिवासींना सडके तांदूळ, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 01:54 IST

Mokhada News : कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल ७ महिन्यानंतर प्रति कुटुंब २० किलोग्रॅम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते.

मोखाडा : आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासींना देण्यात येत असलेल्या सडक्या तांदळाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून असा तांदूळ वाटप करण्याचे तातडीने बंद करून दर्जेदार तांदूळ देण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

कोरोना महामारीमुळे रोजगार हरवलेल्या आदिम कातकरी बांधवांना तातडीची मदत म्हणून तब्बल ७ महिन्यानंतर प्रति कुटुंब २० किलोग्रॅम तांदूळ वाटप करण्याचे काम आदिवासी विकास महामंडळाने सुरू केले होते. हे तांदूळ अत्यंत निकृष्ट आणि सडके असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी २० दिवसांपूर्वी शासनाच्या निदर्शनास आणले होते. हे तांदूळ २०१४-१५ वर्षातील शिल्लक तांदूळ असून त्यांची विक्री होत नसल्याने ते आदिवासींना वाटप करण्यात येत आहेत, हे अधिकाऱ्यांनी श्रमजीवीच्या आंदोलनात कबुल केले होते. याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना प्रत्यक्ष भेटून विवेक पंडित यांनी हे सडके तांदूळ त्यांना दाखवले होते. मात्र तरीही बुधवारी हेच तांदूळ पुन्हा पॉलिश करून वाटप करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आदिवासी विकास महामंडळ अधिकाऱ्यांचा डाव श्रमजीवी संघटनेने हाणून पाडला.रायगड जिल्ह्यातील     वाकडी आणि पालघर जिल्ह्यातील भिनार या ठिकाणी या तांदळाच्या गाड्या श्रमजीवी कार्यकर्त्यांनी पकडल्या. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पंडित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी  भेट घेतली. 

या वेळी एका अधिकाऱ्याने आदिवासी तांदूळ घेतात, मग विरोध कशाला करता? असे सांगताच संतप्त होऊन पंडित यांनी त्या अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी केली. आदिवासी माणसे आहेत,जनावरे नाहीत, असे सांगत हे आम्ही खपवून घेणार नाही, असे स्पष्ट सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने हे वाटप बंद करण्याचे आदेश दिले. 

मूलभूत प्रश्न सोडवण्याबाबत कटिबद्धश्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थान येथे भेट घेतली. श्रमजीवी शिष्टमंडळाने आदिवासींच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे या वेळी लक्ष वेधले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी आहे, त्यापूर्वीच आदिवासींच्या किमान मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या दारात स्वातंत्र्याचा प्रकाश पोहोचवण्याबाबत कटिबद्द राहणार असल्याचे आश्वासक विधान या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

टॅग्स :palgharपालघर