शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कार मनी कंपनीकडून अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 03:41 IST

वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात.

वसई  - वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात. त्यातलाच एक मार्ग म्हणजे, गाडी कंपनीला लावून पैसे कमवायचे. पैसे कमवण्याची जणू हि नवी संकल्पनाच उदयास आली आहे. नालासोपाऱ्यात अशाच एका कार मनी नावाच्या कंपनीकडून अनेक ग्राहकांची फसवणूक होऊन कोट्यावधीचा घोटाळा समोर आला आहे.आनंद विश्वकर्मा या तरुणाने आपली वॅगनआर कार १ एप्रिल २०१८ रोजी कार मनी या कंपनीचे प्रोपरायटर निलेश तोंडकर यांना १७ हजार रुपये दर महा भाड्याने दिली होती आणि निलेश यांनी १७ हजारांचा चेक देखील आनंद यांना दिला होता. मात्र चेक बाउंस झाला त्यामुळे आनंदने निलेश यांच्याशी संपर्क साधला व विचारणा केली असता, निलेश ने उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आनंदने कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला, तेव्हा त्याचसारखेच अजून ३०-३५ जण त्या कार्यालयाबाहेर असल्याचे आनंदच्या लक्षात आले.तेव्हा हा सर्व फसवणूकिचा प्रकार आनंदच्या लक्षात आला व त्याने लगेच पोलीस ठाणे गाठून हा घोटाळा उघडकीस आणला.कंपनीने गुंडाळला गाशादरमहा पंधरा ते वीस हजार रु पये देण्याचे आमिष दाखवून नालासोपार्यातील कार मनी कंपनीने अनेक चार चाकी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. कार मालकांना कंपनीने भाडे तर वेळेवर दिले नाहीच शिवाय त्यांच्या गाड्या देखील गायब केल्याचे समोर आले आहे. आता तर या कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने कार मालक देखील हवालदिल झाले आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजीnewsबातम्या