शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 07:25 IST

कोरोनाचा मृतदेह वसईत आला खरा ; मात्र वसई पोलिसांनी हरकत नोंदवून तो पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला !

आशिष राणे,वसई

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूचा ससंर्ग झाल्याने  मृत्यू झाला आहे.

हा तरूण वसईच्या पापडी परिसरातला होता मात्र मागील दोन महिन्यांपासून मुंबईतच राहात असल्याचे समजते.

दरम्यान या तरुणाला ब्लड कँसर झाल्यानं तो दि.19 मार्च पासून मुंबईत खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता.

तसेच गुरुवारी या तरुणाची दाखल रुग्णालयात जेव्हा कोरोना संदर्भातील तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.

परिणामी शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू ही झाला.

धक्कादायक म्हणजे या कोरोनाने मृत्यू झालेल्या या तरुणाचा मृतदेह चक्क या मुंबईतील खाजगी रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करून तो वसईत अंत्यविधीसाठी शुक्रवारी आणला गेला.

मात्र शुक्रवारी वसईत आलेला हा कोरोनाचा मृतदेह व त्याचा अंत्यविधी वसईत करण्यास वसई पोलिसांनी गंभीर हरकत नोंदवून हा मृतदेह आल्या पावली पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला दिली.

याउलट कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहासाठी मुंबईत विशेष व्यवस्था असताना किंवा कोरोनाचा मृतदेह हा नातेवाईकांना सोपवलाच कसा आणि तो रुग्णालयाने वसईत पाठवलाच कसा ? असे अनेक प्रश्न वसई पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी उपस्थित केले आहेत.

वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 32 कोरोना बाधित रुगणाची संख्या झाली असून, यात आता चार मृत्यू झाले असून 

पालघर जिल्हयात आता क़ोरोना बाधितांचा आकडा हा 34 वर गेला आहे.

 

कोरोनाच्या मृतदेहाचा हा मुंबई ते वसई- पापडी प्रवास कसा होऊ शकतो ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संखोल चौकशी करावी !

कोरोना च्या जीवघेण्या विषाणूने सर्वत्र जगात हाहाकार माजला आहे, त्यातच कॊरोनाने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार कसे व किती वेळात कुठे करायचे याबाबत (WHO) "जागतिक आरोग्य संघटने"च्या वतीने काही गंभीर मार्गदर्शक तत्वे दिली आहेत,आणि ती संपूर्ण जगातील देशात असलेल्या त्या सरकारी आरोग्य यंत्रणा व त्यांच्या डॉक्टरांनी सक्त पाळावयाच्या आहेत,असे असतानाही मुंबईत देखील कोरोना ने मृत्यु झालेल्या मृतदेहासाठी स्वतंत्र व वेगळी स्मशान भूमी आहे, तर कोरोनाने मृत्यु झालेल्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तो मृतदेह ताब्यात देता येत नाही,तर  मुंबई ते वसई पापडी हा कोरोना चा मृतदेह प्रवास कसा होऊ शकतो ? या वसईत घडलेल्या या गंभीर प्रकाराची आरोग्य मंत्र्यांनी सखोल चौकशी करावी  अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस