शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 07:25 IST

कोरोनाचा मृतदेह वसईत आला खरा ; मात्र वसई पोलिसांनी हरकत नोंदवून तो पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला !

आशिष राणे,वसई

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूचा ससंर्ग झाल्याने  मृत्यू झाला आहे.

हा तरूण वसईच्या पापडी परिसरातला होता मात्र मागील दोन महिन्यांपासून मुंबईतच राहात असल्याचे समजते.

दरम्यान या तरुणाला ब्लड कँसर झाल्यानं तो दि.19 मार्च पासून मुंबईत खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होता.

तसेच गुरुवारी या तरुणाची दाखल रुग्णालयात जेव्हा कोरोना संदर्भातील तपासणी केली असता त्याचा कोरोनाचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.

परिणामी शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू ही झाला.

धक्कादायक म्हणजे या कोरोनाने मृत्यू झालेल्या या तरुणाचा मृतदेह चक्क या मुंबईतील खाजगी रुग्णालयाने त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करून तो वसईत अंत्यविधीसाठी शुक्रवारी आणला गेला.

मात्र शुक्रवारी वसईत आलेला हा कोरोनाचा मृतदेह व त्याचा अंत्यविधी वसईत करण्यास वसई पोलिसांनी गंभीर हरकत नोंदवून हा मृतदेह आल्या पावली पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमत ला दिली.

याउलट कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहासाठी मुंबईत विशेष व्यवस्था असताना किंवा कोरोनाचा मृतदेह हा नातेवाईकांना सोपवलाच कसा आणि तो रुग्णालयाने वसईत पाठवलाच कसा ? असे अनेक प्रश्न वसई पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी उपस्थित केले आहेत.

वसई विरार क्षेत्रात आतापर्यंत 32 कोरोना बाधित रुगणाची संख्या झाली असून, यात आता चार मृत्यू झाले असून 

पालघर जिल्हयात आता क़ोरोना बाधितांचा आकडा हा 34 वर गेला आहे.

 

कोरोनाच्या मृतदेहाचा हा मुंबई ते वसई- पापडी प्रवास कसा होऊ शकतो ?

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संखोल चौकशी करावी !

कोरोना च्या जीवघेण्या विषाणूने सर्वत्र जगात हाहाकार माजला आहे, त्यातच कॊरोनाने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार कसे व किती वेळात कुठे करायचे याबाबत (WHO) "जागतिक आरोग्य संघटने"च्या वतीने काही गंभीर मार्गदर्शक तत्वे दिली आहेत,आणि ती संपूर्ण जगातील देशात असलेल्या त्या सरकारी आरोग्य यंत्रणा व त्यांच्या डॉक्टरांनी सक्त पाळावयाच्या आहेत,असे असतानाही मुंबईत देखील कोरोना ने मृत्यु झालेल्या मृतदेहासाठी स्वतंत्र व वेगळी स्मशान भूमी आहे, तर कोरोनाने मृत्यु झालेल्या त्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील तो मृतदेह ताब्यात देता येत नाही,तर  मुंबई ते वसई पापडी हा कोरोना चा मृतदेह प्रवास कसा होऊ शकतो ? या वसईत घडलेल्या या गंभीर प्रकाराची आरोग्य मंत्र्यांनी सखोल चौकशी करावी  अशी मागणी पुढे येत आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस