शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालघरमध्ये बविआ अन् कम्युनिस्टांची मोट, भाजपाच्या पराभवाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:01 IST

भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली आहे...

मनोर/पालघर - भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाचा येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण पराभव करणे ही स्पष्ट भूमिका डोळ्यासमोर ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्र आली असून ंलोकसभेसह सर्व निवडणुका आता एकत्रपणे लढविणार असल्याची घोषणा कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ढवळे यांनी गुरु वारी मनोर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाल रंग आणि बहुजन विकास आघाडी चा पिवळा रंग या दोन रंगाचे मनोमिलन (आघाडी) कार्यक्र माचे आयोजन मनोर मध्ये करण्यात आले होते. यावेळी माकपाचे कॉम्रेड अशोक ढवळे, बारक्या मांगात तर बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर, वसई-विरारचे प्रथम महापौर राजीव पाटील, आ.विलास तरे, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, जिप सभापती दामू पाटील, बविआचे जेष्ठ नेते प्रवीण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.२०१४ च्या निवडणुकी नंतरची पाच वर्षे भाजप व शिवसेनेमध्ये एकमेकांना शिव्या देण्यातच निघून गेली असून आता पुन्हा सत्तेसाठी एकत्र आलेली आहेत. केंद्रात आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेची प्रचंड ससेहोलपट सुरू असून मागील पाच वर्षात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्के नि वाढले आहे. पालघर, नंदुरबार आदी भागात हजारोच्या संख्येने मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडली असून आजही हे मरणाचे सत्र सुरूच आहे. यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचे माकपचे ढवळे यांनी सांगितले. वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणी बाबत कुठलीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान पंतप्रधान मोदींच्या सरकारनी आपला वकील न्यायालयात उपस्थित न ठेवल्याने न्यायालयाने आदिवासी विरोधात दुर्भाग्यपूर्ण निर्णय दिल्याचेही त्यांनी सांगितले. मागील ४५ वर्षात वाढली नव्हती इतकी बेरोजगारी वाढली असून दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. उलट १ कोटी १० लाख लोकांना नोकरीवरून काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून लोकसभाच नव्हे तर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व जागा आम्ही एकत्र लढविणार असल्याचे शेवटी ढवळे यांनी सांगितले.खोटे बोला पण ठासून बोला हा भाजप चा पवित्रा राहिला असून आपला शत्रू कोण हे ओळखूनच काम करण्याचा निर्णय घेतल्याचे बविआ चे अध्यक्ष आमदार ठाकूर यांनी सांगून माकप सारखा एक चांगला मित्र आमच्या सोबत जोडला गेल्याचा मला आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची जिल्ह्यात १ लाखाच्या आसपास मते असून जी कुठेही जात नाहीत त्यामुळे लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकजुटीने काम करू असे सांगितले. मी काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे आदी सर्वच पक्षांशी चर्चा केली असून येत्या काही दिवसात हे सर्व पक्ष आमच्याशी जोडले जातील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.उमेदवारांचा निर्णय आठवडाभरात ‘या’ तडजोडीवरच झाली आघाडीगरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालघर लोकसभा निवडणूकीत कोणाचा उमेदवार निवडणूक लढवणार या बाबत निर्णय झाला नसला तरी काँग्रेसच्या वाट्याला असणाºया या क्षेत्रात काँग्रेसची ताकद नसल्याने बविआचा उमेदवारच निवडणूक लढविणार हे नक्की आहे. मात्र, त्याचा निर्णय येत्या ५-६ दिवसात आम्ही घेऊ असे आ. ठाकूर ह्यांनी सांगितले.माकप आणि बविआ यांच्या आघाडीमुळे पालघर लोकसभा व इतर निवडणुकीत बविआच्या उमेदवाराला सुमारे एक लाख मतदाराच्या मताधिक्याचे बळ मिळणार असून माकपकडून डहाणू आणि विक्रमगड विधानसभेत उमेदवार उभे करण्याची शक्यता पाहता बविआ आपली संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी करण्याची तडजोड झाली आहे.‘मी भाजपातच राहणार’- गावित, ‘ते आमच्याकडे आल्यास स्वागत’- ठाकूरपालघर लोकसभा मतदार संघ शिवसेनेला देण्यात आल्याने नाराज झालेले भाजपा चे खासदार राजेंद्र गावित हे बहुजन विकास आघाडी पक्षात प्रवेश घेत निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त पसरविण्यात आले आहे.मात्र. हे वृत्त निराधार व खोडसाळ असल्याचे गावित यांनी पत्रकारांना सांगितले. पालघर लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आमदार हितेंद्र ठाकूर अध्यक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडी पक्षात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदीं व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याने मी भाजपा पक्षातच राहणार असल्याचे गावितांनी पत्रकारांना सांगितले.मला जायचेच असेल तर मी एखाद्या राष्ट्रीय पक्षात जाईल, बहुजन विकास आघाडी सारख्या एका संघटनेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पाशर््वभूमीवर मनोर येथे झालेल्या माकप आणि बविआ यांच्या आघाडीच्या मनोमिलन कार्यक्र माच्या पत्रकार परिषदेत खासदार गावित हे आपल्या पक्षात येणार असल्याच्या वृता बाबत आमदार ठाकूर यांना छेडले असता त्यांचे स्वागत असेल असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :palgharपालघरPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक