शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 02:02 IST

महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती.

नालासोपारा : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती. परंतु आता बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनाकडून प्रवाशांवर कसा अन्याय केला जातो याचे जिवंत उदाहरण नालासोपारातील आचोळे चौकात बघायला मिळत आहे. बिल्डरच्या भल्यासाठी महापालिकेने चक्क आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉपच गायब केले आहेत. महानगरपालिकेचे हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. तर बसस्टॉपअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

३ आॅक्टोबर २०१२ रोजी वसई-विरार महानगरपालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केली होती. या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिकांवर बसस्टॉप उभारण्यात आले होते. त्याच वेळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील मुख्य चौकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी बसस्टॉपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून आचोळे चौकातील या बसस्टॉपचा प्रवाशांकडून वापर केला जात होता. परंतु काही महिन्यांपासून नियोजित जागेत असलेला हा बसस्टॉप अचानक गायब झाला आहे. बसस्टॉप नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागते. विशेष म्हणजे वसई-विरार परिवहन सेवेसह ठाणे मनपाची परिवहन सेवाही याच बस थांब्यावर थांबते. हा बसस्टॉप हटविण्यामागचे कारण शोधण्यासाठी अधिक खोलात गेले असता एक धक्कादायक माहिती पुढे आली की, आचोळ्यात ज्या ठिकाणी जुना बसस्टॉप होता. त्याच्या मागच्या बाजूस एक इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत आता मोठे शोरुम उघडण्यात आले आहे.

तसेच या जुन्या बस स्टॉपमुळे इमारतीची पुढची बाजु पूर्णपणे झाकली जात असल्याने या इमारतीचे मूल्य देखील शून्य होत आहे. म्हणून बिल्डरच्या भल्यासाठी महानगरपालिकेने हा बसस्टॉप हटविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका प्रशासनाकडून आता आचोळे चौकात नवीन बसस्टॉप बांधण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

त्या बसस्टॉपमुळे मोठ्या गाड्या वळवताना त्रास व्हायचा तसेच अपघात होऊ नये म्हणून तो हटवला असला तरी त्याच ठिकाणी नवीन बस स्टॉप बनणार आहे. त्या ठिकाणी साचा बनवून आरसीसी बांधकाम केलेले आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये साचा आल्यावर लगेच तिथे लावणार आहे.- भुपेन पाटील, स्थानिक नगरसेवक.सदर ठिकाणी बस स्टॉप बनवला जात होता, पण मोठ्या वाहनांना वळवताना त्रास होईल अशा तक्रारी आल्यामुळे बस स्टॉप आजूबाजूला बनवला जाणार आहे. - प्रितेश पाटील, सभापती,परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार