शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 02:02 IST

महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती.

नालासोपारा : महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती. परंतु आता बिल्डरांच्या भल्यासाठी प्रशासनाकडून प्रवाशांवर कसा अन्याय केला जातो याचे जिवंत उदाहरण नालासोपारातील आचोळे चौकात बघायला मिळत आहे. बिल्डरच्या भल्यासाठी महापालिकेने चक्क आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉपच गायब केले आहेत. महानगरपालिकेचे हे कृत्य अत्यंत संतापजनक असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य नागरिकांमधून उमटत आहे. तर बसस्टॉपअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

३ आॅक्टोबर २०१२ रोजी वसई-विरार महानगरपालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरु केली होती. या वेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी सर्व मार्गिकांवर बसस्टॉप उभारण्यात आले होते. त्याच वेळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोडवरील मुख्य चौकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी बसस्टॉपची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून आचोळे चौकातील या बसस्टॉपचा प्रवाशांकडून वापर केला जात होता. परंतु काही महिन्यांपासून नियोजित जागेत असलेला हा बसस्टॉप अचानक गायब झाला आहे. बसस्टॉप नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी उन्हातान्हात उभे राहावे लागते. विशेष म्हणजे वसई-विरार परिवहन सेवेसह ठाणे मनपाची परिवहन सेवाही याच बस थांब्यावर थांबते. हा बसस्टॉप हटविण्यामागचे कारण शोधण्यासाठी अधिक खोलात गेले असता एक धक्कादायक माहिती पुढे आली की, आचोळ्यात ज्या ठिकाणी जुना बसस्टॉप होता. त्याच्या मागच्या बाजूस एक इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत आता मोठे शोरुम उघडण्यात आले आहे.

तसेच या जुन्या बस स्टॉपमुळे इमारतीची पुढची बाजु पूर्णपणे झाकली जात असल्याने या इमारतीचे मूल्य देखील शून्य होत आहे. म्हणून बिल्डरच्या भल्यासाठी महानगरपालिकेने हा बसस्टॉप हटविण्याचा घाट घातला असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिका प्रशासनाकडून आता आचोळे चौकात नवीन बसस्टॉप बांधण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे. या प्रकाराविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

त्या बसस्टॉपमुळे मोठ्या गाड्या वळवताना त्रास व्हायचा तसेच अपघात होऊ नये म्हणून तो हटवला असला तरी त्याच ठिकाणी नवीन बस स्टॉप बनणार आहे. त्या ठिकाणी साचा बनवून आरसीसी बांधकाम केलेले आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये साचा आल्यावर लगेच तिथे लावणार आहे.- भुपेन पाटील, स्थानिक नगरसेवक.सदर ठिकाणी बस स्टॉप बनवला जात होता, पण मोठ्या वाहनांना वळवताना त्रास होईल अशा तक्रारी आल्यामुळे बस स्टॉप आजूबाजूला बनवला जाणार आहे. - प्रितेश पाटील, सभापती,परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार