शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

बोर्डीमध्ये गणवेश घोटाळा, केंद्र शाळेतील प्रकार : शासनाकडून १.८४ कोटी व्यवस्थापनाकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:57 IST

आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो.

अनिरुद्ध पाटील बोर्डी : आदिवासी भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी व विकासाच्या मुख्य धारेत त्यांना आणता यावे यासाठी शासनाकडून त्यांना गणवेश अनुदान निधी दिला जातो. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित असतांना बोर्डी येथील केंद्र शाळेमध्ये ती पालकांकडूनच वसूल केल्याचा प्रकार समोर येत आहे. हा प्रकार शासन निर्णया विरुद्ध असल्याने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांच्या दोन गणवेशाचे चारशे रु पये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या नुसार या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६ केंद्रातील ४६२ शाळांमधील पहिली ते नववीच्या ४५,९२५ विद्यार्थ्यांच्या गणवेश अनुदान प्रती विद्यार्थी ४०० रु पये या प्रमाणे १ कोटी ८४ लाख एवढा निधी शासनाकडून जमा झाला होता. पैकी १ कोटी ८३ लक्ष ७० हजार इतकी रक्कम या शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती तालुक्याच्या सर्व शिक्षा अभियान या विभागाकडून देण्यात आली. मात्र, पालघर या आदिवासी जिल्ह्यात पालकांचे अज्ञान आणि बँकेत शुन्य बॅलन्सची खाती उघडण्यात येत असलेल्या अडचणी या मुळे अनेक विद्यार्थ्यांची खातीच उघडलेली नाहीत. ज्या पालकांनी पदरमोड करून पाल्यासाठी दोन गणवेश शिवून घेतले त्याची रक्कम चारशे पेक्षा अधिक झाली. तथापी चारशे रु पयांचे बील द्यायला शिंपी तयार नसून पालकही ते घ्यायला राजी नाहीत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा अंतिम टप्यात हा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.पालकांवर आर्थिक व मानसिक दडपण-शासनाच्या या नव्या धोरणामुळे पालकांना गणवेश निधिचा आर्थिक भुर्दंड सोसावा तर लागलाच. शिवाय ही योजना पूर्णत्वास नेताना शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ते मानिसक दडपणाखाली आहेत. परंतु ही कोंडी सोडवताना बोर्डी केंद्र शाळेत पालकांकडून प्रती विद्यार्थी चारशे रु पये रोख रक्कम घेतले आहेत. त्यानंतर एका स्थानिक ठेकेदारांकडून दोन गणवेश घेऊन त्याच्याकडून बील घेण्यात येणार आहे.या शाळेत ज्या पालकांचे दोन ते तीन पाल्य शिक्षण घेत आहेत त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शाळेने केलेल्या या व्यवहाराला अज्ञान व अशिक्षतिपणामुळे प्रतिउत्तर देण्याची ताकद पालकांकडे नसल्याने शाळेचे फावले आहे. मात्र या बद्दल चौकशी समिती नेमून संबंधीत केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. हा प्रकार जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांच्या वार्डात झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा